शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

आता मागेल त्याला एस. टी.!

By admin | Updated: November 18, 2014 23:29 IST

परिवहन महामंडळ : प्रवासीवाढीसाठी पुन्हा एकदा सज्जता...

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ‘मागेल त्याला एस. टी. व मागेल तेथून एस. टी.’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असून, यापुढे रस्त्यावर ब्रेक डाऊन एस. टी. दिसणार नाही. डिसेंबरमध्ये रत्नागिरी विभागाला २५ नवीन गाड्या उपलब्ध होणार आहेत. चालकांचे प्रशिक्षण सुरू असून, नवीन चालक मिळणार आहेत. त्यामुळे यापुढे गावच्या सरपंचाला एस. टी. मागणीबाबत विचारण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रत्नागिरी विभागात ७९० गाड्या असून, मार्चअखेर १०० नवीन गाड्या प्राप्त होणार आहेत. पैकी १३ गाड्या प्राप्त झाल्या असून, रत्नागिरी विभागात त्या प्रत्येक आगाराला देण्यात आल्या आहेत. डिसेंबरअखेर २५ नवीन गाड्या उपलब्ध होणार आहेत. शाळांसाठी, गावासाठी एस. टी. फेऱ्यांच्या मागणीसंदर्भात सरपंचाला विचारण्यात येणार आहे. मागणीप्रमाणे एस. टी. पुरविण्यात येणार आहे. विभागातील नऊ आगारांमध्ये दररोज एकूण ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो. दररोज विभागाला ५०,००० लीटर डिझेल लागते. विभागात १४७३ चालक असून, १६०० वाहक आहेत. वाहकांच्या तुलनेत चालकांची संख्या कमी आहे. परिणामी चालकांना दुहेरी ड्युटी करावी लागते. सध्या २४० चालकांचे प्रशिक्षण सुरू असून, महिनाभरात नवीन चालक रूजू होणार आहेत. नवीन चालकांची प्रत्येक आगारात आवश्यक तितक्या जागेवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात चालकाअभावी फेरी रद्द करण्याची वेळ यापुढे येणार नाही. विभागीय कार्यशाळेत एस. टी.ची दुरूस्ती करण्यात येते. कार्यशाळेत पर्यवेक्षकांची पाच पदे मंजूर असून, चार नियुक्त आहेत. प्रमुख कारागीर पदे १२ मंजूर असून, सर्व पदे भरलेली आहेत. कनिष्ठ कारागीर १५०पैकी ७७, तर सहाय्यक कारागीर ६४ पैकी ३४, सहाय्यक १३३ पैकी ७५ आहेत. कनिष्ठ व सहाय्यक कारागिरांची संख्या मंजूर पदापेक्षा निम्मी असली तरी लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात रस्त्यात बंद पडलेली एस. टी., किंवा ब्रेकडाऊन झालेली एस. टी. दिसणार नाही, असा दावा विभाग नियंत्रक देशमुख यांनी केला आहे. ग्रामस्थ व प्रवाशांकडून येणाऱ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. रात्रवस्तीच्या गाड्या घेऊन जाणाऱ्या चालक - वाहकांना शौचालयाचा उद्भवणारा प्रश्न जिल्हा प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने सोडविण्यात येणार आहे. याबाबत सतत पाठपुरावा सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या वाडीवस्तीवर विखुरला आहे. एस. टी.मुळे ग्रामीण भाग शहराजवळ आला आहे. एकूणच ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे एस्. टी.चे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणारे काम झाले तर महामंडळाला कधीच तोटा पाहावा लागणार नाही. सर्वसामान्य प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देऊन जोडून ठेवणे, असाच आम्हा सर्वांचा प्रयत्न असेल. - के. बी. देशमुख, विभाग नियंत्रक, रत्नागिरी