शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

भुसभुशीत माती असते तेथेच घुशी घुसतात

By admin | Updated: June 30, 2015 00:16 IST

राज ठाकरेंचा सावधानतेचा इशारा : दोडामार्गात मनसेचा कार्यकर्ता मेळावा

दोडामार्ग : मुंबईत उपऱ्यांच्या घुसखोरीमुळे जशी परिस्थिती निर्माण झाली, तीच परिस्थिती दोडामार्ग तालुक्याचीदेखील आहे. केरळीयनांची घुसखोरी याठिकाणी वाढली आहे. पण लक्षात ठेवा, जिथे भुसभुशीत माती असते, त्याचठिकाणी घुशी घुसतात. त्यामुळे जर महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर कातळासारखे, खडकासारखे घट्ट बना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीयाविरोधात नेहमी तुमच्या पाठीशी राहील, असे उद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोडामार्ग येथे काढले. दोडामार्ग येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष संतोष आईर, दीपक गवस, श्रेया देसाई उपस्थित होती. ठाकरे पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे. आतापर्यंत याठिकाणी हत्तींचा हैदोस असल्याचे ऐकले होते. मात्र, याठिकाणी आल्यावर केरळीयनांचे प्रताप वाढल्याचे कळले. आज जी परिस्थिती मुंबईत आहे, तीच याठिकाणी सुध्दा आहे. मुंबईत उपऱ्यांचे काय झाले, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे याठिकाणची भूमी जर वाचवायची असेल, तर परप्रांतीयांना धडा शिकवलाच पाहिजे. कुठून कुठच्या लुंगीत येतात आणि जमिनी बळकावतात. यांना गप्प राहता कामा नये. नाहीतर एक दिवस रडत बसण्याची वेळ येईल. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी भुसभुशीत जमीन असते, तेथेच घुशी घुसतात आणि ज्या ठिकाणी कातळ जमीन असते, त्याठिकाणी घुसखोरी होत नाही. त्यामुळे आपली भूमी आणि महाराष्ट्राला वाचवायचे असेल, तर कातळाप्रमाणे खडकाळ बना. या परप्रांतीयांना धडा शिकवा. आज आपल्यासारखी परिस्थिती इतर राज्यात नाही. इतर राज्यांमध्ये आपल्याच माणसाची बाजू तिथली राज्य सरकारे, पोलीस यंत्रणा घेत असतात. फक्त आपल्या माणसाची परिस्थिती आहे. आपलीच लोक परप्रांतीयांना प्रोत्साहन देत आहेत. हे पूर्णत: चुकीचे आहे. त्यामुळे जर आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर आपल्या या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना गप्प बसता कामा नये. मी आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तुमच्या पाठीशी उभी आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)