शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितच धोक्यात

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

रंग राजकारणाचे

इतक्या कोटींची कामे केली, तितके कोटी खर्च केले, अशा जाहिराती करणारे लोकप्रतिनिधीच आताच्या निवडणुकीत धोक्यात आलेले दिसत आहेत. त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी मतदार संघांमधील चित्र पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे आणि त्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वसाधारणपणे निवडणुकांना सामोरे जाताना जो आमदार असतो, त्याचे पारडे थोडे जड असते. आमदारकी असल्यामुळे वार्षिक निधी खर्च करून काही विकासकामे केलेली असतात, इतर कुठल्या ना कुठल्या योजनेचा निधी आणून लोकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या असतात. सरकार दरबारी अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी आमदारकी हा एक हुकमी एक्का हातात असतो. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना निवडणूक तशी सोपी जाते. त्यांच्याच पक्षातील एखादा ताकदवान पदाधिकारी बंडखोरी करत नाही, तोपर्र्यंंत त्यांना धोका नसतो. पण अलिकडच्या काळात कोट्यवधींची कामे केल्याच्या जाहिराती केल्या तरी त्याला लोक फारसं विचारत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात दोन मंत्री पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यापैकी रत्नागिरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि पालकमंत्री असलेले उदय सामंत आता शिवसेनेत गेले आहेत. त्यांनी आपल्या एका प्रचार पत्रकावर २२५ कोटींची कामे केल्याची माहिती दिली आहे. खरं तर इतकी कामे केल्यानंतर प्रचाराची गरजच पडायला नको. पण, त्यांच्या प्रचारासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच रत्नागिरीत आले. उदय सामंत यांचे शिवसेनेत जाणे राष्ट्रवादीतील (अजून राष्ट्रवादीत असलेल्या) कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारे ठरले आहे. सामंत यांनी आपल्याला का सोडले, हेच त्यांना अजून कळलेले नाही. काहीशी अशीच बाब शिवसेनेतूनही पुढे येत आहे. आदेश हेच आमचं सर्वस्व आहे, असं मानणारे लोकही अचानक पक्षात येऊन उमेदवारी दिली गेल्याच्या प्रक्रियेबाबत नापसंती व्यक्त करत आहेत. अशा सर्वांनाच प्रचाराच्या प्रवाहात आणणे ही बाब काहीशी अवघड ठरली आहे. त्यामुळे प्रस्थापित आमदार असूनही, सामंत यांची वाट सोपी नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत अंतर्गत स्तरावर विरोधाचे वातावरण आहे. ते गुहागरमधील विद्यमान आमदार असले तरी पक्षांतर्गत नाराजीचा त्रास त्यांना होणार आहे. आपल्या मतदारसंघात कोणीही प्रचाराला येण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आपला मतदारसंघ सांभाळून ते दापोलीच्या उमेदवाराच्या प्रचारातही सहभागी झाले आहेत. त्यांनीही आमदार झाल्यापासून अनेक कामे केली आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांनी विरोधकांची संख्याही वाढवली आहे. गतवेळी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार तुल्यबळ होते आणि ही मतांची विभागणी भास्कर जाधव यांच्या पथ्यावर पडली. पण, यावेळी शिवसेनेकडून रामदास कदम यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार दोन असले तरी मतविभागणी खरोखरच होईल का, असा प्रश्न आहे. आमचा शत्रू राष्ट्रवादी आहे, हे खासदार अनंत गीते यांचे विधान काही संकेत देणारे आहे का, असा प्रश्नही आहे. काँग्रेसची जी काही मते आहेत, ती गतवेळी भास्कर जाधव यांना मिळाली होती. यावेळी ती त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे मावळलेल्या सरकारमधील दोन मंत्र्यांची वाट प्रस्थापित असूनही काहीशी बिकट झाली आहे, असे चित्र दिसत आहे.मनोज मुळ्ये