शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
6
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
7
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
8
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
9
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
10
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
11
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
12
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
13
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
14
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
15
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
16
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
17
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
18
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
19
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
20
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  

प्रस्थापितच धोक्यात

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

रंग राजकारणाचे

इतक्या कोटींची कामे केली, तितके कोटी खर्च केले, अशा जाहिराती करणारे लोकप्रतिनिधीच आताच्या निवडणुकीत धोक्यात आलेले दिसत आहेत. त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी मतदार संघांमधील चित्र पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे आणि त्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वसाधारणपणे निवडणुकांना सामोरे जाताना जो आमदार असतो, त्याचे पारडे थोडे जड असते. आमदारकी असल्यामुळे वार्षिक निधी खर्च करून काही विकासकामे केलेली असतात, इतर कुठल्या ना कुठल्या योजनेचा निधी आणून लोकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या असतात. सरकार दरबारी अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी आमदारकी हा एक हुकमी एक्का हातात असतो. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना निवडणूक तशी सोपी जाते. त्यांच्याच पक्षातील एखादा ताकदवान पदाधिकारी बंडखोरी करत नाही, तोपर्र्यंंत त्यांना धोका नसतो. पण अलिकडच्या काळात कोट्यवधींची कामे केल्याच्या जाहिराती केल्या तरी त्याला लोक फारसं विचारत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात दोन मंत्री पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यापैकी रत्नागिरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि पालकमंत्री असलेले उदय सामंत आता शिवसेनेत गेले आहेत. त्यांनी आपल्या एका प्रचार पत्रकावर २२५ कोटींची कामे केल्याची माहिती दिली आहे. खरं तर इतकी कामे केल्यानंतर प्रचाराची गरजच पडायला नको. पण, त्यांच्या प्रचारासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच रत्नागिरीत आले. उदय सामंत यांचे शिवसेनेत जाणे राष्ट्रवादीतील (अजून राष्ट्रवादीत असलेल्या) कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारे ठरले आहे. सामंत यांनी आपल्याला का सोडले, हेच त्यांना अजून कळलेले नाही. काहीशी अशीच बाब शिवसेनेतूनही पुढे येत आहे. आदेश हेच आमचं सर्वस्व आहे, असं मानणारे लोकही अचानक पक्षात येऊन उमेदवारी दिली गेल्याच्या प्रक्रियेबाबत नापसंती व्यक्त करत आहेत. अशा सर्वांनाच प्रचाराच्या प्रवाहात आणणे ही बाब काहीशी अवघड ठरली आहे. त्यामुळे प्रस्थापित आमदार असूनही, सामंत यांची वाट सोपी नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत अंतर्गत स्तरावर विरोधाचे वातावरण आहे. ते गुहागरमधील विद्यमान आमदार असले तरी पक्षांतर्गत नाराजीचा त्रास त्यांना होणार आहे. आपल्या मतदारसंघात कोणीही प्रचाराला येण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आपला मतदारसंघ सांभाळून ते दापोलीच्या उमेदवाराच्या प्रचारातही सहभागी झाले आहेत. त्यांनीही आमदार झाल्यापासून अनेक कामे केली आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांनी विरोधकांची संख्याही वाढवली आहे. गतवेळी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार तुल्यबळ होते आणि ही मतांची विभागणी भास्कर जाधव यांच्या पथ्यावर पडली. पण, यावेळी शिवसेनेकडून रामदास कदम यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार दोन असले तरी मतविभागणी खरोखरच होईल का, असा प्रश्न आहे. आमचा शत्रू राष्ट्रवादी आहे, हे खासदार अनंत गीते यांचे विधान काही संकेत देणारे आहे का, असा प्रश्नही आहे. काँग्रेसची जी काही मते आहेत, ती गतवेळी भास्कर जाधव यांना मिळाली होती. यावेळी ती त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे मावळलेल्या सरकारमधील दोन मंत्र्यांची वाट प्रस्थापित असूनही काहीशी बिकट झाली आहे, असे चित्र दिसत आहे.मनोज मुळ्ये