शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

‘त्या’ निधीची तपासणी करा

By admin | Updated: July 29, 2014 23:00 IST

परूळेकर यांची मागणी : दीपक केसरकरांवर टीका

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रातून जो निधी आणून विकास केला, तो निधी कधी आणि कुठे खर्च झाला याची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी केली आहे. तसेच विठ्ठल कामतांसारखा चांगला उद्योजक सावंतवाडीतून का गेला, याचा शोधही जनतेने घ्यावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. परूळेकर म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांना अचानक दहशतवाद दिसायचा बंद कसा झाला? असा सवाल करून, ते ज्या शिवसेनेत चालले आहेत, त्या शिवसेनेबाबत त्यांनी केलेली वक्तव्ये आम्ही लवकरच बाहेर काढू, असे सांगितले. आमदार केसरकर हे नारायण राणे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार होते. त्याचे काय झाले, याचेही उत्तर केसरकरांनी द्यावे आणि लवकरात लवकर हा दावा दाखल करावा. म्हणजे आम्हाला सर्व पुरावे समोर आणता येतील, असे डॉ. परूळेकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीचा विकास केला अशी बतावणी करणाऱ्या केसरकर यांनी केंद्राचा निधी कुठे आणि कसा खर्ची घातला, याचे उत्तर द्यावे. पालिकेच्या अनेक प्रकल्पांवर निधी खर्ची घातला. पण त्याचा पुढे काय उपयोग झाला? यात मोठ्या प्रमाणात अनियमिता दिसून येत आहे, असा आरोप करून या सर्व निधीची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. परूळेकर यांनी केली. यावेळी डॉ. परूळेकर यांनी, सावंतवाडीच्या विकासाबाबत काही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, हा तलावाभोवतीचा विकास आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याबाबत कुणाला काळजी नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच ज्याने संपूर्ण देशात शेकडो हॉटेल्स उभारली, त्या विठ्ठल कामतांसारख्या उद्योजकाने सावंतवाडी व वेंगुर्ले येथून काढता पाय का घेतला, याचा शोधही येथील जनतेने घ्यावा, अशी मागणीही केली. (प्रतिनिधी)