शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून कोकणवर अन्याय

By admin | Updated: December 14, 2014 23:51 IST

हुस्नबानू खलिफे : शेतकरी नुकसान प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज उठविणार

राजापूर : शासनाने दुष्काळग्रस्तांना सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. कोकणात भातपिकासह आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही शासनाने मदत जाहीर करताना कोकणचे नावही काढलेले नाही. शासनाची ही भूमिका कोकणातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून, हा अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दिला आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यानंतर शासनाने दुष्काळी भागासाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच सावकारमुक्त शेतकरी आणि तीन महिन्यांचे वीजबिल माफ अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्याप्रमाणेच कोकणातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लहरी हवामानामुळे आंबा, काजूसह अन्य फळबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामानाचा फटका बसून कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेल असताना दुष्काळग्रस्तांना पॅकेल जाहीर करताना कोकणचा उल्लेखही करण्यात आला नाही. याबाबत खलिफे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शासनाने सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आणि मंजूर झालेले पॅकेज यांचा विचार करता शेतकऱ्याला हेक्टरी अवघे १२५० रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. अशी तुटपूंजी भरपाई देऊन शासनाने एकप्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे खलिफे यांनी सांगितले. पॅकेज जाहीर करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी किंवा नातेवाईक यांना मदत देण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही. तसेच शेतकरी सावकारांचे कर्ज कसे फेडणार याचे नियोजनही शासनाकडे नाही. त्यामुळे शासन शेतकऱ्यांची केवळ दिशाभूल करण्याचे काम करत असल्याची टीका खलिफे यांनी केली आहे. नुकसान भरपाई देताना शासन कोकणाकडे डोळेझाक करुन कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. हा अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही खलिफे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)