शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून कोकणवर अन्याय

By admin | Updated: December 14, 2014 23:51 IST

हुस्नबानू खलिफे : शेतकरी नुकसान प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज उठविणार

राजापूर : शासनाने दुष्काळग्रस्तांना सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. कोकणात भातपिकासह आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही शासनाने मदत जाहीर करताना कोकणचे नावही काढलेले नाही. शासनाची ही भूमिका कोकणातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून, हा अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दिला आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यानंतर शासनाने दुष्काळी भागासाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच सावकारमुक्त शेतकरी आणि तीन महिन्यांचे वीजबिल माफ अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्याप्रमाणेच कोकणातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लहरी हवामानामुळे आंबा, काजूसह अन्य फळबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामानाचा फटका बसून कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेल असताना दुष्काळग्रस्तांना पॅकेल जाहीर करताना कोकणचा उल्लेखही करण्यात आला नाही. याबाबत खलिफे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शासनाने सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आणि मंजूर झालेले पॅकेज यांचा विचार करता शेतकऱ्याला हेक्टरी अवघे १२५० रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. अशी तुटपूंजी भरपाई देऊन शासनाने एकप्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे खलिफे यांनी सांगितले. पॅकेज जाहीर करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी किंवा नातेवाईक यांना मदत देण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही. तसेच शेतकरी सावकारांचे कर्ज कसे फेडणार याचे नियोजनही शासनाकडे नाही. त्यामुळे शासन शेतकऱ्यांची केवळ दिशाभूल करण्याचे काम करत असल्याची टीका खलिफे यांनी केली आहे. नुकसान भरपाई देताना शासन कोकणाकडे डोळेझाक करुन कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. हा अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही खलिफे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)