शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

आय. टी. आय.मध्ये प्रमुख अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त

By admin | Updated: December 30, 2015 00:46 IST

रत्नागिरी जिल्हा : लोकसेवा आयोगाची यादी जाऊनही भरतीबाबत शासनस्तरावर उदासीनताच

शोभना कांबळे--रत्नागिरी --व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांची १७पैकी १३ पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्यांना एकापेक्षा अधिक पदांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे शिस्त आणि योजनांची अंमलबजावणी यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ही पदे भरण्याबाबत शासन उदासीन असून, लोकप्रतिनिधीही अनभिज्ञ आहेत. केंद्र सरकारने कौशल्य विकास आणि उद्योजकता हे नवीन खाते निर्माण केले. महाराष्ट्रातही हे खाते सुरू झाले. रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. मात्र, सध्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचीच पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. जिल्ह्यातील काही संस्था तर प्राचार्याविना काम करीत आहेत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांच्या शिरावर दिला असल्याने आपली जबाबदारी सांभाळून कशीबशी ही जबाबदारीही हे अधिकारी पेलवत आहेत. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात नऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. राजापूर, खेड, रत्नागिरी या ठिकाणी तर तांत्रिक विद्यालयेही आहेत. मात्र, या सर्व संस्थांमध्ये मिळून १ व २ श्रेणी अधिकाऱ्यांची सध्या १७ पदे रिक्त आहेत. त्यात लांजा, रत्नागिरी, गुहागर आणि दापोलीवगळता सर्वत्र प्राचार्य व प्रशिक्षणार्थी सल्लागार अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी हे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही सध्या प्राचार्याविना सुरू आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यही आता जानेवारीमध्ये सेवानिवृत्त होणार असून, ते दीर्घकालीन रजेवर गेले आहेत. त्यामुळे कित्येक महिन्यांचा कार्यभार द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहे.राज्यातील अनुशेष व चालू पदे भरण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी लेखी परीक्षा व मुलाखत प्रक्रिया पार पडून यादी शासनाकडेही पाठविण्यात आली आहे. मात्र, पदे भरण्याची प्रक्रिया थंडच आहे. आय. टी. आय. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर कौशल्य विकासाचे मार्गदर्शन कंपनीकडून दिले जाते. त्यामध्ये समन्वयकाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार ही पदे राज्यात रिक्त आहेत. त्यामुळे औद्योगिक संस्थांची अवस्था भरकटलेल्या जहाजाप्रमाणे झाली आहे.कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचे ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता’ हे खाते मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. यापूर्वी आय. टी. आय. व तंत्रशाळा उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडे होत्या. आता या खात्याशी संलग्न असलेल्या खात्याचे मंत्रीपद रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे आहे.रोजगार मिळवून देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व उपप्राचार्य पदे भरण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जाणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी पालकमंत्री, आमदार, विरोधी पक्ष यांची आहे. मात्र, त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचा खासगी तसेच शासकीय संस्थांवर अकुंश असतो. मात्र, या विभागालाच गेल्या तीन वर्षांपासून अधिकारी नसल्याने इतर संस्थांच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे.