शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

'गृहरक्षक दलाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 30, 2015 23:11 IST

केंद्राचे धोरण : जातीय दंगे थोपविण्यासाठीच होता प्रयत्न

संजय सुर्वे - शिरगांव --१९४७ साली सुरु झालेल्या जातीय दंगली शमवण्यासाठी समाजातील सेवाभावी प्रतिष्ठितांनी सहभाग घेतला. तत्कालीन स्थितीत मोरारजी देसाई यांनी गृहरक्षक दलाची स्थापना केली. आजवर वसंतदादा पाटील, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही या दलात अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. असा गौरवशाली इतिहास असणाऱ्या गृहरक्षक दलावर भाजप सरकारने वक्रदृष्टी फिरवली आहे. नव्या धोरणांमुळे यापुढे या दलात जवान येतील, अशी शक्यताच धूसर बनली आहे. पोलीस महासंचालक व पोलीस महासमादेशक यांच्या एकत्रित निर्णयानुसार राज्यातील ५६,००० जवानांची दर रविवारी होणारी परेड बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९०० जवान यापुढे केवळ पोलीस यंत्रणेला आवश्यक वाटल्यास बंदोबस्तात दिसणार आहेत. अधिकारी व जवान यांच्यात समन्वय रहावा, समाजसेवेचे काम करताना सुसंवाद, शारीरिक तंदुरुस्ती अशा बाजूने ही परेड महत्त्वपूर्ण मानली जात होती. या परेडला हजर राहणाऱ्या जवानास भत्ता म्हणून ९० रुपये अदा करण्यात येत होते. कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास मोलाची मदत करणारे पोलीसांसारखे प्रशिक्षण घेतलेल्या जवानांसाठी पोलीस, सेनादलात आरक्षणाची तरतूद यापूर्वीच्या शासनाने केली आहे. त्या ठिकाणीही या जवानांना सापत्नपणाची वागणूक दिल्याचे अनुभव अनेकांना आले असतानाच, संघटनेच्या मूळ संकल्पनेलाच धक्का देणाऱ्या शासन निर्णयाचा दलातून धिक्कार होत आहे. याबाबत जिल्हा गृहरक्षक दलाचे समादेशक महेश घोसाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण व्यक्तीश: शासनविरोधात जनहित याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी विविध मार्ग असू शकतात. निष्काम सेवेचे ब्रीद जोपाासत दलात कार्यरत असणाऱ्या जवानांचे यामुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे. यापुढे गृहरक्षक दलात भरतीही होईल अशी शक्यता दिसत नाही. भाजप सरकारने मूळ संकल्पनेचा, जवानांच्या त्यागाचा विचार केला नाही हे अतिशय निंदनीय असल्याचे जिल्हा समादेशक महेश घोसाळकर यांनी सांगितले. मदतीची अपेक्षा सेवाभावी प्रतिष्ठितांनी एकत्र येऊन शांततेसाठी गृहरक्षक दलाची स्थापना केली. मात्र, मान्यवर नेत्यांनी अशा स्थितीत स्थापन केलेल्या या दलाला सध्या नव्या धोरणांमुळे आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्षात मात्र, अशा सेवाभावी कार्याला शासनकर्त्यांनीही मदत करावी .