शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

'गृहरक्षक दलाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 30, 2015 23:11 IST

केंद्राचे धोरण : जातीय दंगे थोपविण्यासाठीच होता प्रयत्न

संजय सुर्वे - शिरगांव --१९४७ साली सुरु झालेल्या जातीय दंगली शमवण्यासाठी समाजातील सेवाभावी प्रतिष्ठितांनी सहभाग घेतला. तत्कालीन स्थितीत मोरारजी देसाई यांनी गृहरक्षक दलाची स्थापना केली. आजवर वसंतदादा पाटील, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही या दलात अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. असा गौरवशाली इतिहास असणाऱ्या गृहरक्षक दलावर भाजप सरकारने वक्रदृष्टी फिरवली आहे. नव्या धोरणांमुळे यापुढे या दलात जवान येतील, अशी शक्यताच धूसर बनली आहे. पोलीस महासंचालक व पोलीस महासमादेशक यांच्या एकत्रित निर्णयानुसार राज्यातील ५६,००० जवानांची दर रविवारी होणारी परेड बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९०० जवान यापुढे केवळ पोलीस यंत्रणेला आवश्यक वाटल्यास बंदोबस्तात दिसणार आहेत. अधिकारी व जवान यांच्यात समन्वय रहावा, समाजसेवेचे काम करताना सुसंवाद, शारीरिक तंदुरुस्ती अशा बाजूने ही परेड महत्त्वपूर्ण मानली जात होती. या परेडला हजर राहणाऱ्या जवानास भत्ता म्हणून ९० रुपये अदा करण्यात येत होते. कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास मोलाची मदत करणारे पोलीसांसारखे प्रशिक्षण घेतलेल्या जवानांसाठी पोलीस, सेनादलात आरक्षणाची तरतूद यापूर्वीच्या शासनाने केली आहे. त्या ठिकाणीही या जवानांना सापत्नपणाची वागणूक दिल्याचे अनुभव अनेकांना आले असतानाच, संघटनेच्या मूळ संकल्पनेलाच धक्का देणाऱ्या शासन निर्णयाचा दलातून धिक्कार होत आहे. याबाबत जिल्हा गृहरक्षक दलाचे समादेशक महेश घोसाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण व्यक्तीश: शासनविरोधात जनहित याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी विविध मार्ग असू शकतात. निष्काम सेवेचे ब्रीद जोपाासत दलात कार्यरत असणाऱ्या जवानांचे यामुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे. यापुढे गृहरक्षक दलात भरतीही होईल अशी शक्यता दिसत नाही. भाजप सरकारने मूळ संकल्पनेचा, जवानांच्या त्यागाचा विचार केला नाही हे अतिशय निंदनीय असल्याचे जिल्हा समादेशक महेश घोसाळकर यांनी सांगितले. मदतीची अपेक्षा सेवाभावी प्रतिष्ठितांनी एकत्र येऊन शांततेसाठी गृहरक्षक दलाची स्थापना केली. मात्र, मान्यवर नेत्यांनी अशा स्थितीत स्थापन केलेल्या या दलाला सध्या नव्या धोरणांमुळे आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्षात मात्र, अशा सेवाभावी कार्याला शासनकर्त्यांनीही मदत करावी .