शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कॉफी टेबल बुकवर ३२ लाख खर्च कसे पडले ?

By admin | Updated: August 26, 2015 23:31 IST

परशुराम उपरकर यांचा सवाल : कोणतीही निविदा प्रक्रिया झाली नसल्याचा दावा

सावंतवाडी : शासनाच्यावतीने सिंधुदुर्गमध्ये घेण्यात आलेला पर्यटन महोत्सव वादात सापडला असून, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पर्यटन महोत्सवात वाटलेल्या कॉफी टेबल बुकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या पुस्तकावर कोणतीही निविदा न काढता ३२ लाख रुपये कसे खर्च करण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पूर्वीचा विरोधी पक्ष जसा आंदोलन करीत होता, तशीच आंदोलने आताचा विरोधी पक्ष करीत आहे. चेहरे फक्त बदलेले आहेत, अशी जोरदार टीका सत्ताधारी व विरोधकांवर केली.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष गुरू गवंडे, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, रमाकांत सावंत, आदी उपस्थित होते. माजी आमदार उपरकर म्हणाले, मागच्या काळात आताचे सत्ताधारी डॉक्टर तसेच रस्त्यावरील खड्डे यासाठी सतत उपोषण आंदोलन करीत असत. पण, ही परिस्थिती काही बदलली नसून आताचे विरोधी पक्षही तेच करीत आहेत. चेहरे बदलले, पण समस्या त्याच आहेत. यावर मार्ग काढणारे कोण नाहीत. पालकमंत्र्यांचा धाकच राहिला नाही. अधिकारी पालकमंत्र्यांवर वरचढ झाले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेले रस्ते लगेच खराब कसे होतात, अधिकारी व ठेकेदार यांच्यात काही साटेलोटे आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. मनसे यावर आवाज उठविणार असून, नवीन शासनाने एक रस्ता पाच वर्षे तरी टिकला पाहिजे, अन्यथा त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार, असे म्हटले होते. पण, सिंधुदुर्गात हा नियम लावल्यास अनेक ठेकेदार काळ्या यादीत जातील. त्यात जिल्हा परिषद व बांधकाम विभागाचेही यातून सुटणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन महोत्सवामध्ये कॉफी टेबल बुक वाटण्यात आली. पण, ही पुस्तके छापण्यात आली, त्यांची साधी निविदाही काढण्यात आली नाही. तसेच या पुस्तकावर खर्च घालण्यात आला तो डोळे दीपवणारा असून, ३२ लाख रुपयांमध्ये पर्यटनाची मोठी वास्तू उभी राहिली असती. मात्र, कॉफी टेबल बुक काढून ते कोणाला बघायलाही मिळाले नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचे माजी आमदार उपरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ंसातार्डा सातोसे रस्त्याबाबत सीईआेंना भेटणारउत्तम स्टील कंपनीने ४ कोटी रुपये जिल्हा परिषदकडे वर्ग केले आहेत. तो रस्ता दर्जेदार करायला हवा होता; पण तो निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी साईडपट्ट्याच करण्यात आल्या नसून, धोकादायक वळणे काढण्यात यावीत, यासाठी आम्ही लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांची भेट घेणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.