शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

वाहतूक कोेंडी : व्यापाऱ्यांना बसण्यास जागा नाही

रामचंद्र कुडाळकर- तळवडे -वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे बाजारपेठ ही सावंतवाडी संस्थान काळापासून सुरू झालेली बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडा बाजार भरतो; परंतु आठवडा बाजारादिवशी होणारी वाहतूक कोंडी, व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता, ग्राहकांच्या सोयीसुविधांची वानवा आदी अनेक समस्यांमुळे होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. आठवडा बाजार म्हटला की, ग्रामीण भागातील लोकांच्या खरेदी-विक्रीचा, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा दिवस. संस्थानकाळापासून अस्तित्वात असलेल्या होडावडा बाजारपेठेत होडावडे दशक्रोशीतील लोक खरेदी-विक्री तसेच शेतीतून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी येतात. आठवडा बाजारामुळे ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येतात. होडावडे बाजारपेठ ही जरी लहान असली, तरी मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे या गावाचे आणि ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे. मातोंड, पेंडुर, नेमळे, वजराठ, तळवडे, तुळस, पाल, अणसूर-पाल, निरवडे, न्हावेली तसेच कोल्हापूर, बेळगाव आदी भागांतूनही लोक येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. वाहतूक कोंडीहोडावडे आठवडा बाजारात दशक्रोशीसह परगावातूनही लोक येत असल्यामुळे येथे व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांची गर्दी होते. परंतु जागेअभावी दुकानदारांची अर्धिअधिक दुकाने रस्त्यावर येत असल्याने आठवडा बाजारादिवशी येथे वाहतूक कोंडीही नेहमीचीच समस्या झाली आहे. त्यातच ही बाजारपेठ सावंतवाडी-वेंगुर्ले रस्त्यानजीकच असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचीही त्यात भर पडते. याचा त्रास ग्राहकांना आणि वाहनचालकांनाही सहन करावा लागतो. यासाठी विक्रेत्यांना ठराविक जागेत दुकान थाटण्यासाठी निर्बंध लादणे महत्त्वाचे आहे. आठवडा बाजार वगळता ग्राहकांची वानवाहोडावडे बाजारपेठेत काळानुरूप बदल होत असला, तरी मंगळवारचा आठवडा बाजार सोडून इतर दिवशी येथे ग्राहकांचे प्रमाण फारच कमी असते. याचा फटका दुकानदार, व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग वाढविण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासकीय योजनांचा फायदा घेऊन तसेच ग्रामपंचायत आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. जागेची अनुपलब्धता होडावडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता भासत आहे. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी येणारे व्यापारी, दुकानदार आपली दुकाने रस्त्याच्या दुतर्फा थाटतात. यातून काहीवेळा दुकानदारांमध्ये आपापसात वाद-भांडणेही उद्भवतात. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे जागेच्या व्यवस्थापनाबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन गरजेचे आठवडा बाजाराला येणारे भाजी तसेच अन्य विक्रे ते कचरा तसाच टाकून जातात. त्यामुळे स्वच्छता निर्माण होते. यासाठी बाजारादिवशी सायंकाळी सर्व विक्रेत्यांनी आपापला कचरा कचराकुं डीत टाकण्याची सक्ती करणे आवश्यक आहे.