शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

वाहतूक कोेंडी : व्यापाऱ्यांना बसण्यास जागा नाही

रामचंद्र कुडाळकर- तळवडे -वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे बाजारपेठ ही सावंतवाडी संस्थान काळापासून सुरू झालेली बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडा बाजार भरतो; परंतु आठवडा बाजारादिवशी होणारी वाहतूक कोंडी, व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता, ग्राहकांच्या सोयीसुविधांची वानवा आदी अनेक समस्यांमुळे होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. आठवडा बाजार म्हटला की, ग्रामीण भागातील लोकांच्या खरेदी-विक्रीचा, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा दिवस. संस्थानकाळापासून अस्तित्वात असलेल्या होडावडा बाजारपेठेत होडावडे दशक्रोशीतील लोक खरेदी-विक्री तसेच शेतीतून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी येतात. आठवडा बाजारामुळे ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येतात. होडावडे बाजारपेठ ही जरी लहान असली, तरी मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे या गावाचे आणि ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे. मातोंड, पेंडुर, नेमळे, वजराठ, तळवडे, तुळस, पाल, अणसूर-पाल, निरवडे, न्हावेली तसेच कोल्हापूर, बेळगाव आदी भागांतूनही लोक येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. वाहतूक कोंडीहोडावडे आठवडा बाजारात दशक्रोशीसह परगावातूनही लोक येत असल्यामुळे येथे व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांची गर्दी होते. परंतु जागेअभावी दुकानदारांची अर्धिअधिक दुकाने रस्त्यावर येत असल्याने आठवडा बाजारादिवशी येथे वाहतूक कोंडीही नेहमीचीच समस्या झाली आहे. त्यातच ही बाजारपेठ सावंतवाडी-वेंगुर्ले रस्त्यानजीकच असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचीही त्यात भर पडते. याचा त्रास ग्राहकांना आणि वाहनचालकांनाही सहन करावा लागतो. यासाठी विक्रेत्यांना ठराविक जागेत दुकान थाटण्यासाठी निर्बंध लादणे महत्त्वाचे आहे. आठवडा बाजार वगळता ग्राहकांची वानवाहोडावडे बाजारपेठेत काळानुरूप बदल होत असला, तरी मंगळवारचा आठवडा बाजार सोडून इतर दिवशी येथे ग्राहकांचे प्रमाण फारच कमी असते. याचा फटका दुकानदार, व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग वाढविण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासकीय योजनांचा फायदा घेऊन तसेच ग्रामपंचायत आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. जागेची अनुपलब्धता होडावडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता भासत आहे. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी येणारे व्यापारी, दुकानदार आपली दुकाने रस्त्याच्या दुतर्फा थाटतात. यातून काहीवेळा दुकानदारांमध्ये आपापसात वाद-भांडणेही उद्भवतात. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे जागेच्या व्यवस्थापनाबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन गरजेचे आठवडा बाजाराला येणारे भाजी तसेच अन्य विक्रे ते कचरा तसाच टाकून जातात. त्यामुळे स्वच्छता निर्माण होते. यासाठी बाजारादिवशी सायंकाळी सर्व विक्रेत्यांनी आपापला कचरा कचराकुं डीत टाकण्याची सक्ती करणे आवश्यक आहे.