शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

वाहतूक कोेंडी : व्यापाऱ्यांना बसण्यास जागा नाही

रामचंद्र कुडाळकर- तळवडे -वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे बाजारपेठ ही सावंतवाडी संस्थान काळापासून सुरू झालेली बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडा बाजार भरतो; परंतु आठवडा बाजारादिवशी होणारी वाहतूक कोंडी, व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता, ग्राहकांच्या सोयीसुविधांची वानवा आदी अनेक समस्यांमुळे होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. आठवडा बाजार म्हटला की, ग्रामीण भागातील लोकांच्या खरेदी-विक्रीचा, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा दिवस. संस्थानकाळापासून अस्तित्वात असलेल्या होडावडा बाजारपेठेत होडावडे दशक्रोशीतील लोक खरेदी-विक्री तसेच शेतीतून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी येतात. आठवडा बाजारामुळे ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येतात. होडावडे बाजारपेठ ही जरी लहान असली, तरी मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे या गावाचे आणि ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे. मातोंड, पेंडुर, नेमळे, वजराठ, तळवडे, तुळस, पाल, अणसूर-पाल, निरवडे, न्हावेली तसेच कोल्हापूर, बेळगाव आदी भागांतूनही लोक येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. वाहतूक कोंडीहोडावडे आठवडा बाजारात दशक्रोशीसह परगावातूनही लोक येत असल्यामुळे येथे व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांची गर्दी होते. परंतु जागेअभावी दुकानदारांची अर्धिअधिक दुकाने रस्त्यावर येत असल्याने आठवडा बाजारादिवशी येथे वाहतूक कोंडीही नेहमीचीच समस्या झाली आहे. त्यातच ही बाजारपेठ सावंतवाडी-वेंगुर्ले रस्त्यानजीकच असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचीही त्यात भर पडते. याचा त्रास ग्राहकांना आणि वाहनचालकांनाही सहन करावा लागतो. यासाठी विक्रेत्यांना ठराविक जागेत दुकान थाटण्यासाठी निर्बंध लादणे महत्त्वाचे आहे. आठवडा बाजार वगळता ग्राहकांची वानवाहोडावडे बाजारपेठेत काळानुरूप बदल होत असला, तरी मंगळवारचा आठवडा बाजार सोडून इतर दिवशी येथे ग्राहकांचे प्रमाण फारच कमी असते. याचा फटका दुकानदार, व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग वाढविण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासकीय योजनांचा फायदा घेऊन तसेच ग्रामपंचायत आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. जागेची अनुपलब्धता होडावडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता भासत आहे. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी येणारे व्यापारी, दुकानदार आपली दुकाने रस्त्याच्या दुतर्फा थाटतात. यातून काहीवेळा दुकानदारांमध्ये आपापसात वाद-भांडणेही उद्भवतात. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे जागेच्या व्यवस्थापनाबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन गरजेचे आठवडा बाजाराला येणारे भाजी तसेच अन्य विक्रे ते कचरा तसाच टाकून जातात. त्यामुळे स्वच्छता निर्माण होते. यासाठी बाजारादिवशी सायंकाळी सर्व विक्रेत्यांनी आपापला कचरा कचराकुं डीत टाकण्याची सक्ती करणे आवश्यक आहे.