शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By admin | Updated: June 17, 2014 01:15 IST

झाराप पत्रादेवी बायपास : सहा महिन्यात पंधरा जणांनी गमावला जीव

रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातून गेलेला झाराप- पत्रादेवी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दर महिन्याला दोन ते तीन जणांचा मृत्यू या भागात होत असून गेल्या तीन-चार महिन्यात तर येथील अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या भागात पंधरा जणांना जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची जनावरेही बळी पडल्याने हा रस्ता म्हणजे शाप की वरदान, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. झाराप-पत्रादेवी महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नेमळे, मळगाव, वेत्ये गावातील ग्रामस्थांमध्ये उत्साह होता. महामार्गामुळे या भागाचा कायापालट होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती आणि तसे झालेही. महामार्गानंतर येथील जमिनींचे दर वाढले. काही विकास कामे झाली. लहान- मोठ्या व्यावसायिकांना रोजगार मिळाला. परंतु कालांतराने या महामार्गावरील वाहतूक वाढताना अपघातांचे प्रमाणही वाढले. महिन्याच्या अंतराने होणाऱ्या अपघातांमुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला आणि या रस्त्याची भीषणता समोर आली. मळगाव गावातून गेलेला हा चार पदरी महामार्ग धोकादायक बनत चालला आहे. हा महामार्ग उंच-सखल आहे. संबंधित कंपनीकडून चांगल्या दर्जाचे काम झालेले नाही. मळगाव ब्रिजकडे खचलेल्या रस्त्यावरून हे सहज लक्षात येते. यासह या पूर्ण मार्गावर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा मळगाव ग्रामस्थांचा आरोप आहे. गोवा व मुंबईच्या दिशेने जाणारे वाहन चालक या महामार्गावर अतिवेगात गाड्या चालवितात. परंतु या महामार्गावर कुठे बायपास आहे, कुठे ओव्हरब्रिज आहे याची त्यांना कल्पना नसते. या मार्गाला जोडलेले बायपास रस्ते उंचावरुन खाली येणारे किंवा सखल भागातून महामार्गाला मिळत असल्याने महामार्गावरुन अति वेगात येणाऱ्या गाड्यांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार, रिक्षाचालक किंवा पादचारी यांचे अपघातात मृत्यू होत आहेत. नेमळे-मळगाव-व्येत्ये या आठ किलोमीटरच्या भागात आतापर्यंत वीस जणांचे मृत्यू झाले आहेत. याला जबाबदार कोण? गेल्या पाच-सहा महिन्यात वीस जणांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तर पुढे पावसाळ्याच्या हंगामात काय? अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. अपघातातील कारणांचा विचार करता, या महामार्गावर कुठेही वेग मर्यादेचे ठळक बोर्ड नाहीत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा आरटीओ प्रशासन अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत नाही. या महामार्गावरील झाराप तिठ्यावर कधीतरी पोलीस पथक तैनात असते. परंतु हे पोलीस कर्मचारी केवळ दुचाकीस्वारांची कागदपत्रे तपासून कारवाई करण्यात धन्यता मानतात. अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांवर मात्र दुर्लक्ष केला जातो. या महामार्गावरील बायपासच्या ठिकाणी वेगमर्यादा फलक लावणे गरजेचे आहे. सावंतवाडी इन्सुली आरटीओ चेक नाका ते झाराप तिठा या ठिकाणच्या मार्गावर गाड्या सुसाट वेगात चालविल्या जातात. समोरच्या महामार्गाची कल्पना नसूनही पर्यटक लवकर पाहोचण्यासाठी सुसाट गाड्या सोडतात. त्यामुळे अपघात होत आहेत. तसेच अतिवेगातील वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढतच राहील, यात शंका नाही. हे सर्व अपघात नेमळे-मळगाव-वेत्ये या भागातच झाले आहेत. याशिवाय स्त्यापलिकडे असलेल्या शेतीकडे जाणाऱ्या बऱ्याच गुरांचाही मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गही चिंताग्रस्त आहे. तसेच या भागातून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्याही सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असल्याने शासन याबाबत कोणती उपाययोजना करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.