शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By admin | Updated: June 17, 2014 01:15 IST

झाराप पत्रादेवी बायपास : सहा महिन्यात पंधरा जणांनी गमावला जीव

रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातून गेलेला झाराप- पत्रादेवी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दर महिन्याला दोन ते तीन जणांचा मृत्यू या भागात होत असून गेल्या तीन-चार महिन्यात तर येथील अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या भागात पंधरा जणांना जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची जनावरेही बळी पडल्याने हा रस्ता म्हणजे शाप की वरदान, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. झाराप-पत्रादेवी महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नेमळे, मळगाव, वेत्ये गावातील ग्रामस्थांमध्ये उत्साह होता. महामार्गामुळे या भागाचा कायापालट होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती आणि तसे झालेही. महामार्गानंतर येथील जमिनींचे दर वाढले. काही विकास कामे झाली. लहान- मोठ्या व्यावसायिकांना रोजगार मिळाला. परंतु कालांतराने या महामार्गावरील वाहतूक वाढताना अपघातांचे प्रमाणही वाढले. महिन्याच्या अंतराने होणाऱ्या अपघातांमुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला आणि या रस्त्याची भीषणता समोर आली. मळगाव गावातून गेलेला हा चार पदरी महामार्ग धोकादायक बनत चालला आहे. हा महामार्ग उंच-सखल आहे. संबंधित कंपनीकडून चांगल्या दर्जाचे काम झालेले नाही. मळगाव ब्रिजकडे खचलेल्या रस्त्यावरून हे सहज लक्षात येते. यासह या पूर्ण मार्गावर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा मळगाव ग्रामस्थांचा आरोप आहे. गोवा व मुंबईच्या दिशेने जाणारे वाहन चालक या महामार्गावर अतिवेगात गाड्या चालवितात. परंतु या महामार्गावर कुठे बायपास आहे, कुठे ओव्हरब्रिज आहे याची त्यांना कल्पना नसते. या मार्गाला जोडलेले बायपास रस्ते उंचावरुन खाली येणारे किंवा सखल भागातून महामार्गाला मिळत असल्याने महामार्गावरुन अति वेगात येणाऱ्या गाड्यांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार, रिक्षाचालक किंवा पादचारी यांचे अपघातात मृत्यू होत आहेत. नेमळे-मळगाव-व्येत्ये या आठ किलोमीटरच्या भागात आतापर्यंत वीस जणांचे मृत्यू झाले आहेत. याला जबाबदार कोण? गेल्या पाच-सहा महिन्यात वीस जणांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तर पुढे पावसाळ्याच्या हंगामात काय? अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. अपघातातील कारणांचा विचार करता, या महामार्गावर कुठेही वेग मर्यादेचे ठळक बोर्ड नाहीत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा आरटीओ प्रशासन अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत नाही. या महामार्गावरील झाराप तिठ्यावर कधीतरी पोलीस पथक तैनात असते. परंतु हे पोलीस कर्मचारी केवळ दुचाकीस्वारांची कागदपत्रे तपासून कारवाई करण्यात धन्यता मानतात. अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांवर मात्र दुर्लक्ष केला जातो. या महामार्गावरील बायपासच्या ठिकाणी वेगमर्यादा फलक लावणे गरजेचे आहे. सावंतवाडी इन्सुली आरटीओ चेक नाका ते झाराप तिठा या ठिकाणच्या मार्गावर गाड्या सुसाट वेगात चालविल्या जातात. समोरच्या महामार्गाची कल्पना नसूनही पर्यटक लवकर पाहोचण्यासाठी सुसाट गाड्या सोडतात. त्यामुळे अपघात होत आहेत. तसेच अतिवेगातील वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढतच राहील, यात शंका नाही. हे सर्व अपघात नेमळे-मळगाव-वेत्ये या भागातच झाले आहेत. याशिवाय स्त्यापलिकडे असलेल्या शेतीकडे जाणाऱ्या बऱ्याच गुरांचाही मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गही चिंताग्रस्त आहे. तसेच या भागातून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्याही सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असल्याने शासन याबाबत कोणती उपाययोजना करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.