शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘जलयुक्त शिवार’ची उच्चस्तरीय चौकशी व्हावी

By admin | Updated: December 5, 2015 00:20 IST

धोंडी चिंदरकर साशंक : चिंदरमध्ये चार लाखांचे बंधारे पूर्ण?

मालवण : मालवण चिंदर गावातील जलयुक्त शिवार अभियान कामांबाबत माजी सभापती धोंडी चिंदरकर यांनी साशंकता व्यक्त केली आहे. चिंदरमध्ये जलयुक्त शिवार योजनेचे एकही काम झालेले नसताना चार लाख १८ हजार रुपये खर्च झालाच कसा? असा सवाल उपस्थित करत संबंधित कामाची आणि संबंधित विभागाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही चिंदरकर यांनी केली आहे. दरम्यान, तालुका कृषी विभागाने चिंदर गावात जलयुक्त शिवार योजनेखाली चार लहान माती बंधारे १५ मे ते २७ मे २०१५ या बारा दिवसांच्या कालावधीत पूर्ण झाल्याचे म्हटले असून याकामी चार लाख १८ हजार प्रत्यक्षात खर्चही झाला असल्याची माहिती ‘कृषी’कडून प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीकडे माहिती उपलब्ध नाहीकेंद्र शासनाच्या पाणलोट योजनेखाली यापूर्वी गावात बंधाऱ्यांची कामे झाली. मात्र, नव्या सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचे कामच झाले नसून याबाबत आपण ग्रामसभेत प्रश्नही उपस्थित केला. मात्र, जलयुक्त शिवारची कामे झाल्याबाबत माहिती मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले. चिंदर गावातील या कामाच्या योजनेच्या कामाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे माहिती विचारली असता, नेमकी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे योजनेतील कामांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेचे कामच झाले नाहीमालवण तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेखाली चार गावांची निवड करण्यात आली. यात कुणकवळे, कर्लाचा व्हाळ, चुनवरे, चिंदर या गावांचा समावेश आहे. या चार गावांत योजनेची २२ कामे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात पूर्ण झाली असून, ५७ बंधारे बांधण्यात आले आहेत. याकामी ५६ लाख ९७ हजार रुपये खर्चही झाल्याचे तालुका कृषी विभागाने स्पष्ट केले. असे असताना चिंदर गावचे रहिवासी व माजी सभापती धोंडी चिंदरकर यांनी चिंदर गावात या योजनेखाली कामच झाले नाही, असे सांगत चार लाख रुपये खर्च दाखवून कोणते चार बंधारे बांधले गेले? असा सवाल उपस्थित केला आहे.