शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तापसरीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

By admin | Updated: August 27, 2015 23:46 IST

उपाययोजना घेतल्या हाती : गावागावात सर्वेक्षण सुरु

कणकवली : अधून मधून पडणारा पाऊस तसेच कडक ऊन यामुळे कणकवली तालुक्यात तापसरीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तापसरीचे जास्त रुग्ण आढळलेल्या गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण हाती घेतले असून खबरदारीच्या उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहेत.बदलत्या वातावरणामुळे अनेकांच्या प्रकृतीमध्ये बदल घडत आहेत. काही गावात दूषित पाण्यामुळे काविळीसारख्या साथी पसरत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र ग्रामस्थांनी घाबरून जावू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे, शिरवल, साकेडी आदी गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे. आरोग्यसेवक तसेच अन्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरही ग्रामस्थाना मार्गदर्शन करीत आहेत. पाणी उकळून तसेच गाळून पिण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मेडिक्युअरचे ड्रॉप पुरवून त्याचा एक थेंब पाण्यात टाकण्याबाबत सांगण्यात आले आहे. दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दर दिवशी दोनशे ते अडिचशे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यापैकी किमान ५0 रुग्ण तापसरीचे असतात. मात्र किरकोळ ताप येणाऱ्या रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात येते. तसेच प्रकृतीची काळजी घेण्याविषयी त्यांना सूचना देण्यात येत असते. त्यामुळे तापसरीला घाबरून न जाता शासकीय रूग्णालयांमध्ये योग्य उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (वार्ताहर)जिल्ह्याबाहेर अन्य ठिकाणी गेलेल्या काही जणांना डेंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाहेर गावी जावून आलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ताप येत असेल तर शासकीय रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत. अशा रुग्णाना औषधे कमी पडू नयेत, यादृष्टीनेही नियोजन केले आहे.- डॉ. कुबेर मिठारी, तालुका आरोग्य अधिकारीडासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहनघराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून कोणताही ताप असला तरी रुग्णांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात यावे,असे आवाहन केले आहे. पावसाचे पाणी साचल्याने डासांची पैदास जास्त होते. या डासांमुळे अनेक साथी पसरत असतात.त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याबाबतही ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. चार दिवसांहून अधिक काळ ताप येत असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे प्लेटलेटची संख्या कमी असलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातही पाठविले जात आहे. - डॉ. श्रीधर जाधव, प्रभारी वैद्यकीय अधिकारी