शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

तापसरीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

By admin | Updated: August 27, 2015 23:46 IST

उपाययोजना घेतल्या हाती : गावागावात सर्वेक्षण सुरु

कणकवली : अधून मधून पडणारा पाऊस तसेच कडक ऊन यामुळे कणकवली तालुक्यात तापसरीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तापसरीचे जास्त रुग्ण आढळलेल्या गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण हाती घेतले असून खबरदारीच्या उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहेत.बदलत्या वातावरणामुळे अनेकांच्या प्रकृतीमध्ये बदल घडत आहेत. काही गावात दूषित पाण्यामुळे काविळीसारख्या साथी पसरत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र ग्रामस्थांनी घाबरून जावू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे, शिरवल, साकेडी आदी गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे. आरोग्यसेवक तसेच अन्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरही ग्रामस्थाना मार्गदर्शन करीत आहेत. पाणी उकळून तसेच गाळून पिण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मेडिक्युअरचे ड्रॉप पुरवून त्याचा एक थेंब पाण्यात टाकण्याबाबत सांगण्यात आले आहे. दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दर दिवशी दोनशे ते अडिचशे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यापैकी किमान ५0 रुग्ण तापसरीचे असतात. मात्र किरकोळ ताप येणाऱ्या रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात येते. तसेच प्रकृतीची काळजी घेण्याविषयी त्यांना सूचना देण्यात येत असते. त्यामुळे तापसरीला घाबरून न जाता शासकीय रूग्णालयांमध्ये योग्य उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (वार्ताहर)जिल्ह्याबाहेर अन्य ठिकाणी गेलेल्या काही जणांना डेंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाहेर गावी जावून आलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ताप येत असेल तर शासकीय रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत. अशा रुग्णाना औषधे कमी पडू नयेत, यादृष्टीनेही नियोजन केले आहे.- डॉ. कुबेर मिठारी, तालुका आरोग्य अधिकारीडासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहनघराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून कोणताही ताप असला तरी रुग्णांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात यावे,असे आवाहन केले आहे. पावसाचे पाणी साचल्याने डासांची पैदास जास्त होते. या डासांमुळे अनेक साथी पसरत असतात.त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याबाबतही ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. चार दिवसांहून अधिक काळ ताप येत असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे प्लेटलेटची संख्या कमी असलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातही पाठविले जात आहे. - डॉ. श्रीधर जाधव, प्रभारी वैद्यकीय अधिकारी