शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

तापसरीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

By admin | Updated: August 27, 2015 23:46 IST

उपाययोजना घेतल्या हाती : गावागावात सर्वेक्षण सुरु

कणकवली : अधून मधून पडणारा पाऊस तसेच कडक ऊन यामुळे कणकवली तालुक्यात तापसरीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तापसरीचे जास्त रुग्ण आढळलेल्या गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण हाती घेतले असून खबरदारीच्या उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहेत.बदलत्या वातावरणामुळे अनेकांच्या प्रकृतीमध्ये बदल घडत आहेत. काही गावात दूषित पाण्यामुळे काविळीसारख्या साथी पसरत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र ग्रामस्थांनी घाबरून जावू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे, शिरवल, साकेडी आदी गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे. आरोग्यसेवक तसेच अन्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरही ग्रामस्थाना मार्गदर्शन करीत आहेत. पाणी उकळून तसेच गाळून पिण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मेडिक्युअरचे ड्रॉप पुरवून त्याचा एक थेंब पाण्यात टाकण्याबाबत सांगण्यात आले आहे. दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दर दिवशी दोनशे ते अडिचशे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यापैकी किमान ५0 रुग्ण तापसरीचे असतात. मात्र किरकोळ ताप येणाऱ्या रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात येते. तसेच प्रकृतीची काळजी घेण्याविषयी त्यांना सूचना देण्यात येत असते. त्यामुळे तापसरीला घाबरून न जाता शासकीय रूग्णालयांमध्ये योग्य उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (वार्ताहर)जिल्ह्याबाहेर अन्य ठिकाणी गेलेल्या काही जणांना डेंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाहेर गावी जावून आलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ताप येत असेल तर शासकीय रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत. अशा रुग्णाना औषधे कमी पडू नयेत, यादृष्टीनेही नियोजन केले आहे.- डॉ. कुबेर मिठारी, तालुका आरोग्य अधिकारीडासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहनघराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून कोणताही ताप असला तरी रुग्णांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात यावे,असे आवाहन केले आहे. पावसाचे पाणी साचल्याने डासांची पैदास जास्त होते. या डासांमुळे अनेक साथी पसरत असतात.त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याबाबतही ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. चार दिवसांहून अधिक काळ ताप येत असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे प्लेटलेटची संख्या कमी असलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातही पाठविले जात आहे. - डॉ. श्रीधर जाधव, प्रभारी वैद्यकीय अधिकारी