शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

हापूस आंबा पडणार लांबणीवर!

By admin | Updated: December 3, 2015 23:50 IST

हवामानात बदल : कलमे पालवीने बहरली; बागायतदार, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

प्रसाद बागवे -- कुणकेश्वर-आंबा उत्पादनात ‘देवगड’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. किंबहुना आंबा उत्पादनात देवगड तालुका नेहमी अग्रेसर असतो. तसेच विविध बाजारपेठांत हापूसला चांगली मागणी असते; परंतु चालू वर्षी डिसेंबर उजाडला तरी कलमांना मोहोर नाही. प्रतिवर्षी कलमांना सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात मोहोर येऊ लागतो. परंतु बदलत्या हवामानामुळे आंबा पिकासाठी पोषक हवामान तयार होत नसल्यामुळे तालुक्यातील आंबा बागायतदार व व्यावसायिक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. गतवर्षी आंबा बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते.त्यामध्ये अवकाळी झालेला पाऊस, तुडतुडा, ध्रिप्ससारख्या रोगांवर न होणारा औषधांचा परिणाम तसेच पावसामुळे आंब्यावर आलेले काळे डाग आदी कारणांमुळे आलेला अवाढव्य खर्च यामुळे अगोदरच गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या डोेक्यावर आहे. तरीसुद्धा निसर्ग साथ देईल या आशेने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. विशेषकरून दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीला दोन दिवस वातावरणात गारवा मोठ्या प्रमाणात झाला होता. परंतु लगेच वातावरणात पुन्हा बदल झाला. त्याचा परिणाम पिकावर होताना दिसून येतो. संपूर्ण तालुक्यात कलमांनी पालवी धारण केल्याचे चित्र दिसते. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक लवकर हातात येण्यासाठी कल्टारचा वापर करूनही कलमांना अजून मोहोर आलेला नाही. त्यामुळे आंबा पीक हाती येण्याआधीच नुकसानीची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. अजून मोहोर नसल्याने आंबा पिकाचा पहिला टप्पा संपला आहे.जर येत्या काही दिवसांत थंडी वाढली तर कलमे एकाचवेळी मोहोर धारण करतील व एकाचवेळी उत्पादन झाल्याने आंबा तोडणीमध्ये टप्पे करता येणार नाही.परिणामी एकाचवेळी उत्पादन झाल्यामुळे विक्रीचे दरही घसरण्याची भीतीही बागायतदार व अडतदार यांच्यामधून व्यक्त होत आहे. गतवर्षी झालेले नुकसान व यावर्षीही सुरुवातीस होणारी कसरत यामुळे शेतकरी उदास झाला असून निसर्गाकडे याचना करत आहे.