शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

हापूस आंबा पडणार लांबणीवर!

By admin | Updated: December 3, 2015 23:50 IST

हवामानात बदल : कलमे पालवीने बहरली; बागायतदार, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

प्रसाद बागवे -- कुणकेश्वर-आंबा उत्पादनात ‘देवगड’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. किंबहुना आंबा उत्पादनात देवगड तालुका नेहमी अग्रेसर असतो. तसेच विविध बाजारपेठांत हापूसला चांगली मागणी असते; परंतु चालू वर्षी डिसेंबर उजाडला तरी कलमांना मोहोर नाही. प्रतिवर्षी कलमांना सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात मोहोर येऊ लागतो. परंतु बदलत्या हवामानामुळे आंबा पिकासाठी पोषक हवामान तयार होत नसल्यामुळे तालुक्यातील आंबा बागायतदार व व्यावसायिक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. गतवर्षी आंबा बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते.त्यामध्ये अवकाळी झालेला पाऊस, तुडतुडा, ध्रिप्ससारख्या रोगांवर न होणारा औषधांचा परिणाम तसेच पावसामुळे आंब्यावर आलेले काळे डाग आदी कारणांमुळे आलेला अवाढव्य खर्च यामुळे अगोदरच गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या डोेक्यावर आहे. तरीसुद्धा निसर्ग साथ देईल या आशेने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. विशेषकरून दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीला दोन दिवस वातावरणात गारवा मोठ्या प्रमाणात झाला होता. परंतु लगेच वातावरणात पुन्हा बदल झाला. त्याचा परिणाम पिकावर होताना दिसून येतो. संपूर्ण तालुक्यात कलमांनी पालवी धारण केल्याचे चित्र दिसते. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक लवकर हातात येण्यासाठी कल्टारचा वापर करूनही कलमांना अजून मोहोर आलेला नाही. त्यामुळे आंबा पीक हाती येण्याआधीच नुकसानीची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. अजून मोहोर नसल्याने आंबा पिकाचा पहिला टप्पा संपला आहे.जर येत्या काही दिवसांत थंडी वाढली तर कलमे एकाचवेळी मोहोर धारण करतील व एकाचवेळी उत्पादन झाल्याने आंबा तोडणीमध्ये टप्पे करता येणार नाही.परिणामी एकाचवेळी उत्पादन झाल्यामुळे विक्रीचे दरही घसरण्याची भीतीही बागायतदार व अडतदार यांच्यामधून व्यक्त होत आहे. गतवर्षी झालेले नुकसान व यावर्षीही सुरुवातीस होणारी कसरत यामुळे शेतकरी उदास झाला असून निसर्गाकडे याचना करत आहे.