शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देवगडात पालकमंत्र्यांचा काँग्रेसकडून निषेध

By admin | Updated: October 24, 2015 23:31 IST

मंत्रालय बैठक : स्थानिक आमदारांना बोलावले नसल्याने नाराजी

देवगड : देवगडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात बैठक लावली. मात्र, ती केवळ दिखावा असून स्थानिक आमदारांना या बैठकीला बोलावले नाही. या कृतीचा देवगड तालुका काँग्रेसने निषेध नोंदविला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देवगडचा पाणीप्रश्न ज्वलंत आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यात लक्ष घालून तो सोडविण्याची गरज होती. मात्र, तो प्रलंबित ठेवला. शासनस्तरावर या प्रश्नासाठी केवळ श्रेय घेण्यासाठी स्थानिक आमदार नीतेश राणे यांना बोलावले जात नाही. वास्तविक, पाणीप्रश्नात राजकारण आणू नका, पाणीप्रश्न हा जनतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे वारंवार आमदार नीतेश राणे म्हणाले आहेत. असे असताना पालकमंत्री दीपक केसरकर हे यामध्ये श्रेयवादाचे राजकारण आणत आहेत. मुळातच पालकमंत्री केसरकर व प्रमोद जठार यांना पाणीप्रश्न कळलेलाच नाही. पालकमंत्री केसरकर हे तिलारीहून पाणी आणण्याची योजना आखत आहेत, तर प्रमोद जठार नाधवड्याच्या धरणावरून पाणी आणू, असे सांगत होते. आता शासन आल्यावर याबाबत काहीच बोलत नाहीत. कोणत्याही उपायाने पाणी आणा अशी देवगडच्या जनतेची भूमिका आहे. यासाठी आमदार नीतेश राणे यांनी तातडीने या गावांसाठी पाणी योजना करा, अथवा पाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी पैसे द्या, अशी भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका योग्य आहे. काँग्रेसचे आंदोलन श्रेयवादासाठी नाही, तर पाणी मिळावे यासाठी आहे. ज्या ज्या पातळीवर आंदोलन केले पाहिजे ते करून पाणी मिळेपर्यंत सरकारला धारेवर धरण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबाबत आता आमदार नीतेश राणे यांनी रणशिंग फुंकले असून ६ नोव्हेंबरला ‘आर या पार’ची लढाई काँग्रेस लढणार आहे. (प्रतिनिधी)