शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या पाणी योजनेवरून ग्रामसभा गाजली

By admin | Updated: December 3, 2015 23:53 IST

संगमेश्वर तालुका : वायंगणेतील पाणी योजना साडेतीन वर्षे रखडली; योजना ताब्यात घेण्यास नकार

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे ग्रामपंचायतीची सभा साडेतीन वर्षे रेंगाळलेल्या पाणी योजनेवरून चांगलीच गाजली. यावेळी ग्रामस्थांनी पाणीपुरवठा समितीला चांगलेच धारेवर धरले. यानंतर देवरूखच्या गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी गावाला भेट देत ही योजना नव्या सरपंचांना ताब्यात घेण्यास सांगितले. मात्र, नव्या सरपंचानी ही पाणी योजना ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावात पेयजल योजनेंतर्गत लोटणकरवाडी, घडशीवाडी आणि बौद्धवाडी या तीन वाड्यांसाठी ही ३६ लाखांची योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, ही योजना गेल्या साडेतीन वर्षांपासून अपूर्ण आहे. घडशीवाडीतील ग्रामस्थांना या योजनेचा फायदा होतो. मात्र, मागासवर्गीयांसाठी असलेल्या या पाणी योजनेपासून बौद्धवाडी आणि लोटणकरवाडी ग्रामस्थ वंचित आहेत. त्यामुळे केवळ घडशीवाडीलाच पाणीपुरवठा कसा होतो? असा सवालही या ग्रामस्थांकडून केला जात आहे.पाणी समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांची निवड गेली कित्येक वर्षे झालेली नाही. अध्यक्षांचे वास्तव्य कायम मुंबईतच असते. त्यामुळे या योजनेबाबत त्यांना सुताराम कल्पना नाही. आधीच्या सरपंचाच्या कालावधीत पाणी योजनेसाठी २८ लाख रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही महिन्याप्ांूर्वी या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची मुदत संपल्याने नवनिर्वाचित सरपंचांकडे ग्रामपंचायतीचा कारभार सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी योजनेतील आधीच्या गैरव्यवहाराचा या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पाढा वाचला. यावेळी पाणी समितीला पेचात पकडण्यात आले. मात्र, नेहमीप्रमाणे अध्यक्ष मुंबईत असल्याने सचिवांना याप्रकरणी सामोरे जावे लागले. आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून सचिवांनी वेळ मारून नेली. पाणी समिती बदलण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नवनिर्वाचित सरपंच सुरेश घडशी यांच्या विनंतीवरून गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी गटविस्तार अधिकारी पी. एम. सुर्वे यांच्यासह वायंगणे गावाला भेट देऊन या योजनेची पाहणी केली. यावेळी आम्हाला तुमची पाणी योजनाच नको, आम्हाला टँकरने पाणी द्या, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांची पाण्याबाबतची समस्या सोडवण्यासाठी गटविकास अधिकारी पवार यांनी ही योजना नूतन सरपंचांना ताब्यात घेण्यास सांगितले. पाणी योजनेत भ्रष्टाचार असल्याने नव्या सरपंचांनी ती ताब्यात घेण्यास नकार दिला. या ग्रामपंचायतीत होणारे भ्रष्टाचार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले आहेत. ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेऊन या ग्रामपंचायतीचे दोन वर्षानंतर लेखापरीक्षणही करण्यात आले. या लेखापरीक्षणातही अनेक त्रुटी दाखविण्यात आल्या होत्या. यासंदर्भात कागदोपत्री अनेक पुरावे असूनही तालुका गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)