शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

शासनाला ‘बाल महोत्सवा’चा विसर

By admin | Updated: November 11, 2015 23:47 IST

राज्य क्रीडा मेळावा : निरीक्षणगृह, बालगृहातील बालके यावर्षीही वंचित

रत्नागिरी : निरीक्षणगृहातील बालकांसाठी राज्यस्तरीय क्रीडा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय २०१२ साली झाला होता. त्यात बदल करून ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ असे त्याचे नामकरण करण्यात आले होते. मात्र, शासनाला या महोत्सवाचा विसर पडला असून, गेल्या वर्षीपासून हा महोत्सव झालाच नाही. निरीक्षणगृह आणि बालगृह संस्थेतील बालकांसाठी राज्यस्तरीय क्रीडा मेळावा घ्यावा, असा निर्णय २००२ साली घेण्यात आला होता. त्यावेळी या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी केवळ दोन लाख रुपये अनुदान मिळत होते.या तूटपुंज्या अनुदानात राज्यस्तरावर मेळावा आयोजित करण्यात अडचणी होत्या. पण, निरीक्षणगृह आणि बालगृहातील मुला-मुलींच्या या आनंदात भर घालण्यासाठी २०१२ साली तत्कालीन आघाडी सरकारने शासन निर्णयात महत्त्वपूर्ण बदल केला. त्यानुसार या मेळाव्याचे ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ असे नामकरण करण्यात आले.हा महोत्सव जिल्हा आणि विभागस्तरावर घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हास्तरावर पाच लाख रुपये आणि विभाग स्तरावरदेखील पाच लाख रुपये अनुदान वितरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या मुला-मुलींच्या दृष्टिकोनातून हा महोत्सव त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा ठरत आहे. सन २०१२मध्ये शासन निर्णय झाल्यानंतर २०१३ला हा बाल महोत्सव साजरा केला झाला. पण, राज्यात शासनकर्ते बदलल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या युती शासनाला मात्र या महोत्सवाचा विसर पडलेला दिसतो. युतीचे शासन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर हा बाल महोत्सव साजरा झालेला नाही. २०१५मध्ये हा बाल महोत्सव साजरा होईल की नाही, याबाबत शंका आहे. कारण नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव साजरा होणे शासन निर्णयात अपेक्षित आहे. अद्याप शासनाने यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता यावर्षीही चाचा नेहरू बाल महोत्सव होण्याची शक्यता धूसर झाली आहे. (प्रतिनिधी) आभास फाऊंडेशनच्या वतीने आम्ही मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी निवेदन दिले आहे, मात्र, येत्या विधिमंडळ अधिवेशन काळात हा मुद्दा सभागृहात मांडणे आवश्यक असून, त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.- अतुल देसाई, आभास फाऊंडेशन, कोल्हापूर.