शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला ‘बाल महोत्सवा’चा विसर

By admin | Updated: November 11, 2015 23:47 IST

राज्य क्रीडा मेळावा : निरीक्षणगृह, बालगृहातील बालके यावर्षीही वंचित

रत्नागिरी : निरीक्षणगृहातील बालकांसाठी राज्यस्तरीय क्रीडा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय २०१२ साली झाला होता. त्यात बदल करून ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ असे त्याचे नामकरण करण्यात आले होते. मात्र, शासनाला या महोत्सवाचा विसर पडला असून, गेल्या वर्षीपासून हा महोत्सव झालाच नाही. निरीक्षणगृह आणि बालगृह संस्थेतील बालकांसाठी राज्यस्तरीय क्रीडा मेळावा घ्यावा, असा निर्णय २००२ साली घेण्यात आला होता. त्यावेळी या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी केवळ दोन लाख रुपये अनुदान मिळत होते.या तूटपुंज्या अनुदानात राज्यस्तरावर मेळावा आयोजित करण्यात अडचणी होत्या. पण, निरीक्षणगृह आणि बालगृहातील मुला-मुलींच्या या आनंदात भर घालण्यासाठी २०१२ साली तत्कालीन आघाडी सरकारने शासन निर्णयात महत्त्वपूर्ण बदल केला. त्यानुसार या मेळाव्याचे ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ असे नामकरण करण्यात आले.हा महोत्सव जिल्हा आणि विभागस्तरावर घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हास्तरावर पाच लाख रुपये आणि विभाग स्तरावरदेखील पाच लाख रुपये अनुदान वितरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या मुला-मुलींच्या दृष्टिकोनातून हा महोत्सव त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा ठरत आहे. सन २०१२मध्ये शासन निर्णय झाल्यानंतर २०१३ला हा बाल महोत्सव साजरा केला झाला. पण, राज्यात शासनकर्ते बदलल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या युती शासनाला मात्र या महोत्सवाचा विसर पडलेला दिसतो. युतीचे शासन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर हा बाल महोत्सव साजरा झालेला नाही. २०१५मध्ये हा बाल महोत्सव साजरा होईल की नाही, याबाबत शंका आहे. कारण नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव साजरा होणे शासन निर्णयात अपेक्षित आहे. अद्याप शासनाने यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता यावर्षीही चाचा नेहरू बाल महोत्सव होण्याची शक्यता धूसर झाली आहे. (प्रतिनिधी) आभास फाऊंडेशनच्या वतीने आम्ही मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी निवेदन दिले आहे, मात्र, येत्या विधिमंडळ अधिवेशन काळात हा मुद्दा सभागृहात मांडणे आवश्यक असून, त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.- अतुल देसाई, आभास फाऊंडेशन, कोल्हापूर.