शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे सरकारच विकास करेल

By admin | Updated: November 2, 2015 00:27 IST

आशिष शेलार : नारायण राणे हेच खरे थापाडे; आघाडी सरकारच भ्रष्टाचारी व घोटाळ्याचे

कुडाळ : आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी, घोटाळ्याचे होते. आमचे सरकार हे भ्रष्टाचारमुक्त व लोकोपयोगी असून, शिवसेनेबरोबर युती करूनच हे सरकार पुढील चार वर्षांत महाराष्ट्राचा विकास करेल, असे प्रतिपादन कुडाळ येथील लोकसंवाद कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी करीत आमच्या मुख्यमंत्र्यांना थापाड्या म्हणणारे नारायण राणे हेच खरे थापाडे असल्याची टीका त्यांनी राणेंवर केली. कुडाळ येथील ओंकार डिलक्स सभागृहात युती सरकार स्थापनेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सुराज्याची वचनपूर्ती लोकसंवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, भाजप उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ, नियोजन सदस्य काका कुडाळकर, चारूदत्त देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष शिरसाट, दीपक शिरोडकर, विजय मराठे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शेलार म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेऊन काँग्रेसने फक्त राजकारण केले. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन सरकार स्थापनेपासून एका वर्षाच्या आत केले. काँग्रेसने याच स्मारकाच्या स्थापनेसाठी १२ वर्षे घालविली. यावेळी राजन तेली म्हणाले की, सरकारच्या वर्षपूर्तीच्या उत्सवासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले नसून, वर्षभरात सरकारने घेतलेले विकासात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व लोकसंवाद साधण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यास आम्ही कमी पडत आहोत. अनेक प्रश्न या सरकारने सोडविले व अजूनही सोडविणार आहे. वाळू, चिरे, मच्छिमारविषयी प्रश्न भाजपच्या मंत्र्यांनी सोडविले. एकीकडे सरकार चांगले निर्णय घेत असतानाच घाई मारून कोणी समुद्र्रात, तर अन्य ठिकाणी उपोषणास बसत आहेत. जरा धीर धरा, आमच्या सरकारच्या कामाचे चांगले निकाल लवकरच दिसतील. सर्व गोष्टींना विरोध केला तर कोकणचा विकास कसा होणार? विरोध करू नका, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)