शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

हे धनदांडग्यांचे सरकार : जयंद्रथ खताते

By admin | Updated: December 2, 2015 00:40 IST

राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत.

चिपळूण : राज्य शासनाने घरपट्टीवरील स्थगिती उठवताना नवीन धोरणानुसार जी घरपट्टी आकारणी सुचविली आहे ती सर्वसामान्य माणसावर अन्याय करणारी आहे. ही घरपट्टी भांडवली मूल्यांवर आधारित होणार आहे, पण आता दर कमी केले आहेत. टोलमाफी करुन श्रीमंतांचे चोचले पुरवणारे हे सरकार सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडत आहे. हे सरकार धनदांडग्यांचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकारने घरपट्टी आकारणीवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, घरपट्टीवादावर अधिसूचनेचा तोडगा काढण्यात आला आहे. भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत खताते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार १ हजार रुपयांवर ३० पैसे किमान व कमाल २ रुपयापर्यंत कर आकारणी केली जाणार आहे. जुन्या अधिसूचनेत १०० रुपयांवर कर आकारण्यात येणार होता. त्याला ग्रामपंचायतीकडून विरोध झाल्याने नवीन अधिसूचना काढून भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी पद्धतीत बदल केला आहे. यामुळे कराची रक्कम कमी होईल. तरीही वार्षिक घरपट्टी किमान ४०० रुपयांनी वाढणार आहे. राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत. याचा विचार सर्व ग्रामपंचायतींनी करुन आपल्या हरकती नोंदवायला हव्यात, असेही खताते यांनी स्पष्ट केले. या सरकारला शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे व सामान्य माणसांशी काही देणेघेणे नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता पाग महिला विद्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम व जिल्हाध्यक्ष शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)