शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

हे धनदांडग्यांचे सरकार : जयंद्रथ खताते

By admin | Updated: December 2, 2015 00:40 IST

राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत.

चिपळूण : राज्य शासनाने घरपट्टीवरील स्थगिती उठवताना नवीन धोरणानुसार जी घरपट्टी आकारणी सुचविली आहे ती सर्वसामान्य माणसावर अन्याय करणारी आहे. ही घरपट्टी भांडवली मूल्यांवर आधारित होणार आहे, पण आता दर कमी केले आहेत. टोलमाफी करुन श्रीमंतांचे चोचले पुरवणारे हे सरकार सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडत आहे. हे सरकार धनदांडग्यांचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकारने घरपट्टी आकारणीवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, घरपट्टीवादावर अधिसूचनेचा तोडगा काढण्यात आला आहे. भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत खताते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार १ हजार रुपयांवर ३० पैसे किमान व कमाल २ रुपयापर्यंत कर आकारणी केली जाणार आहे. जुन्या अधिसूचनेत १०० रुपयांवर कर आकारण्यात येणार होता. त्याला ग्रामपंचायतीकडून विरोध झाल्याने नवीन अधिसूचना काढून भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी पद्धतीत बदल केला आहे. यामुळे कराची रक्कम कमी होईल. तरीही वार्षिक घरपट्टी किमान ४०० रुपयांनी वाढणार आहे. राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत. याचा विचार सर्व ग्रामपंचायतींनी करुन आपल्या हरकती नोंदवायला हव्यात, असेही खताते यांनी स्पष्ट केले. या सरकारला शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे व सामान्य माणसांशी काही देणेघेणे नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता पाग महिला विद्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम व जिल्हाध्यक्ष शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)