शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

हे धनदांडग्यांचे सरकार : जयंद्रथ खताते

By admin | Updated: December 2, 2015 00:40 IST

राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत.

चिपळूण : राज्य शासनाने घरपट्टीवरील स्थगिती उठवताना नवीन धोरणानुसार जी घरपट्टी आकारणी सुचविली आहे ती सर्वसामान्य माणसावर अन्याय करणारी आहे. ही घरपट्टी भांडवली मूल्यांवर आधारित होणार आहे, पण आता दर कमी केले आहेत. टोलमाफी करुन श्रीमंतांचे चोचले पुरवणारे हे सरकार सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडत आहे. हे सरकार धनदांडग्यांचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकारने घरपट्टी आकारणीवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, घरपट्टीवादावर अधिसूचनेचा तोडगा काढण्यात आला आहे. भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत खताते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार १ हजार रुपयांवर ३० पैसे किमान व कमाल २ रुपयापर्यंत कर आकारणी केली जाणार आहे. जुन्या अधिसूचनेत १०० रुपयांवर कर आकारण्यात येणार होता. त्याला ग्रामपंचायतीकडून विरोध झाल्याने नवीन अधिसूचना काढून भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी पद्धतीत बदल केला आहे. यामुळे कराची रक्कम कमी होईल. तरीही वार्षिक घरपट्टी किमान ४०० रुपयांनी वाढणार आहे. राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत. याचा विचार सर्व ग्रामपंचायतींनी करुन आपल्या हरकती नोंदवायला हव्यात, असेही खताते यांनी स्पष्ट केले. या सरकारला शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे व सामान्य माणसांशी काही देणेघेणे नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता पाग महिला विद्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम व जिल्हाध्यक्ष शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)