शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

सिंधुदुर्ग गुंडगिरीमुक्त करण्यासाठी सत्ता द्या

By admin | Updated: October 30, 2015 23:25 IST

विनोद तावडे : सत्तेच्या माध्यमातून वैभववाडी, दोडामार्ग विकसित करु

वैभववाडी : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुती जुटली आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्ग दादागिरी व गुंडगिरीमुक्त बनविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता महायुतीच्या हाती द्यावी. आम्ही केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून दोन्ही शहरे विकसित करुन दाखवू, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केले.नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी शिक्षणमंत्री तावडे व पालकमंत्री दीपक केसरकर वैभववाडीत आले होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयेंद्र्र रावराणे, अशोक रावराणे, सदा ओगले, राजन चिके, सुहास सावंत, संजय रावराणे आदी उपस्थित होते.तावडे पुढे म्हणाले, वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची पहिली सत्ता चांगल्या लोकांच्या हातात मिळाली तरच शहरांच्या विकासाची पट्टी नीट चालेल. सुरुवातीलाच गडबड झाली तर मात्र ही चूक लवकर दुरूस्त होणार नाही याची दक्षता मतदारांनी घ्यावी. कारण पालकमंत्री युतीचे, राज्य आणि केंद्रात सत्ताही युतीचीच आहे. जनतेचे प्रश्न सत्तेशीच निगडीत असतात. त्यामुळे सत्तेतील माणसे निवडून दिली तर जनतेचे प्रश्न भराभर सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना, भाजप, आरपीआयच्या हातात सत्ता द्यावी, असे आवाहन तावडे यांनी केले.काँग्रेसने सत्तेत असताना किती घरातील तरुणांना नोकरी दिली. येथील जनतेने भाच्यावर विश्वास दाखवत नगरपंचायतीची सत्ता आमच्या हाती द्यावी, आम्ही प्रत्येक घरात रोजगार देऊ. जिल्'ाचे पालकमंत्री केसरकर आहेत. तरीही वैभववाडीचा अतिरिक्त पालकमंत्री म्हणून शहराच्या विकासाची जबाबदारी मी स्विकारत आहे. काँग्रेस १५ वर्षात जे करू शकली नाही ते आम्ही एक वर्षात करुन दाखवलंय. त्यामुळे युतीवर विश्वास दाखवून आजोळच्या विकासाची भाच्याला संधी द्यावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)राणेंचा विकास थांबला : केसरकरसिंधुदुर्गच्या विकासाला वर्षभरात गती आली आहे. सत्ता गेल्यामुळे नारायण राणेंचे जमिनींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळेच त्यांना विकास थांबल्याचा भास होतोय अशी खिल्ली उडवत राणेंच्या ताटाखालचे मांजर असणारे अधिकारी बदलल्यामुळे जिल्ह्यात सक्षम प्रशासन आले आहे. त्यामुळे विकास झपाट्याने सुरु आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.काँग्रेसमुळे वैभववाडी बदनाम : तावडेवैभववाडीचा मतदार विकला जातो, अशी काँग्रेसने सर्वत्र बदनामी केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी इथला मतदार विकला जात नाही, तर तो भावी पिढीच्या भवितव्यासाठी मतदान करतो हे दाखवून द्यावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे वैभववाडीवासीयांना केले आहे.