शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग गुंडगिरीमुक्त करण्यासाठी सत्ता द्या

By admin | Updated: October 30, 2015 23:25 IST

विनोद तावडे : सत्तेच्या माध्यमातून वैभववाडी, दोडामार्ग विकसित करु

वैभववाडी : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुती जुटली आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्ग दादागिरी व गुंडगिरीमुक्त बनविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता महायुतीच्या हाती द्यावी. आम्ही केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून दोन्ही शहरे विकसित करुन दाखवू, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केले.नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी शिक्षणमंत्री तावडे व पालकमंत्री दीपक केसरकर वैभववाडीत आले होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयेंद्र्र रावराणे, अशोक रावराणे, सदा ओगले, राजन चिके, सुहास सावंत, संजय रावराणे आदी उपस्थित होते.तावडे पुढे म्हणाले, वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची पहिली सत्ता चांगल्या लोकांच्या हातात मिळाली तरच शहरांच्या विकासाची पट्टी नीट चालेल. सुरुवातीलाच गडबड झाली तर मात्र ही चूक लवकर दुरूस्त होणार नाही याची दक्षता मतदारांनी घ्यावी. कारण पालकमंत्री युतीचे, राज्य आणि केंद्रात सत्ताही युतीचीच आहे. जनतेचे प्रश्न सत्तेशीच निगडीत असतात. त्यामुळे सत्तेतील माणसे निवडून दिली तर जनतेचे प्रश्न भराभर सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना, भाजप, आरपीआयच्या हातात सत्ता द्यावी, असे आवाहन तावडे यांनी केले.काँग्रेसने सत्तेत असताना किती घरातील तरुणांना नोकरी दिली. येथील जनतेने भाच्यावर विश्वास दाखवत नगरपंचायतीची सत्ता आमच्या हाती द्यावी, आम्ही प्रत्येक घरात रोजगार देऊ. जिल्'ाचे पालकमंत्री केसरकर आहेत. तरीही वैभववाडीचा अतिरिक्त पालकमंत्री म्हणून शहराच्या विकासाची जबाबदारी मी स्विकारत आहे. काँग्रेस १५ वर्षात जे करू शकली नाही ते आम्ही एक वर्षात करुन दाखवलंय. त्यामुळे युतीवर विश्वास दाखवून आजोळच्या विकासाची भाच्याला संधी द्यावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)राणेंचा विकास थांबला : केसरकरसिंधुदुर्गच्या विकासाला वर्षभरात गती आली आहे. सत्ता गेल्यामुळे नारायण राणेंचे जमिनींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळेच त्यांना विकास थांबल्याचा भास होतोय अशी खिल्ली उडवत राणेंच्या ताटाखालचे मांजर असणारे अधिकारी बदलल्यामुळे जिल्ह्यात सक्षम प्रशासन आले आहे. त्यामुळे विकास झपाट्याने सुरु आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.काँग्रेसमुळे वैभववाडी बदनाम : तावडेवैभववाडीचा मतदार विकला जातो, अशी काँग्रेसने सर्वत्र बदनामी केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी इथला मतदार विकला जात नाही, तर तो भावी पिढीच्या भवितव्यासाठी मतदान करतो हे दाखवून द्यावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे वैभववाडीवासीयांना केले आहे.