शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

गाडगेबाबांनी स्वच्छता समाजात रुजविली : विनायक होमकळस

By admin | Updated: December 23, 2014 23:49 IST

पुण्यतिथीचे औचित्य : विठ्ठल मंदिरात झाला कार्यक्रम

चिपळूण : संत गाडगेबाबांनी गृहत्याग करुन संन्यास घेतला. तीर्थाटन, भ्रमंती करताना वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. लोकांना मदत करुन कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते निघून जात म्हणून ते कर्मयोगी होते. ते ज्या गावात जात ते गाव स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता व अंधश्रध्दा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वत: सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, भोळ्या समजूती, अनिष्ठ रुढी, परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, असे प्रतिपादन प्रा. विनायक होमकळस यांनी केले. चिपळूण पेठमाप, परिट आळी विठ्ठल मंदिरात संत गाडगेबाबा परिट समाज संस्था, जिल्हा रत्नागिरी शाखा, चिपळूणतर्फे गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तराम महाडिक, तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटेकर यांनी प्रतिमा पूजन केले. माजी आमदार रमेश कदम, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लालमन नारोळे, परिट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कदम, डॉ. संतोषकुमार निगडी, डॉ. संतोषकुमार हंकारे, डॉ. सतीश गरळे, डॉ. गुलाबसिंग सोळंके, डॉ. सुनील कोतकुंडे, डॉ. प्रमोदकुमार वर्मा, डॉ. पराग कर्नाड, डॉ. पल्लवी कर्नाड, डॉ. दरवाजकर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी व जयंती सर्व शाळांमध्ये साजरी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल सभापती घोसाळकर यांचा, तर समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या माजी आमदार कदम, नगराध्यक्ष होमकळस यांचा विषेश सत्कार करण्यात आला. प्रा. होमकळस यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबा श्रोत्यांशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधत. त्यांना अज्ञानाची, त्यांच्यातील दुर्गुणांची जाणीव करुन देत. व्यसनाच्या आहारी जाऊ नका, कर्ज काढू नका, देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करु नका, जातीभेद व अस्पृश्यता मानू नका, असा उपदेशही ते करीत, असे होमकळस यांनी सांगितले.यावेळी झालेल्या आरोग्य शिबिराचा २०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. त्यांना औषधेही देण्यात आली. उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालय, आप्पा होमकळस, किशोर पिंपळे, राजू विखारे, दीपक आंबुर्ले यांनी सहकार्य केले. संस्थेचे जिल्हा सचिव दीपक कदम यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष संतोष कदम यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)