शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा

By admin | Updated: November 11, 2015 23:52 IST

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओरोस : अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी नैराश्येपोटी आत्महत्या केली आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेच्यातीने निषेध नोंदवण्यात आला.याचबरोबर मु्ख्याध्यापक आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत का पोहचले? याची चौकशी करावी तसेच या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्राथमिक शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, अशी मागणी समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शिक्षक समितीच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर, राज्यविभाग प्रमुख नामदेव जांभवडे, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, कुडाळ तालुका अध्यक्ष नंदकु मार राणे, आदी उपस्थित होते. पंचायत राज समितीने अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना चिखलदरा तालुक्यातील समाडोह या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता शालेय पोषण आहारातील ३० किलो तांदूळ कमी, मसाला, मिरची पूड आणि कडधान्ये निकृष्ट दर्जाची आढळली. याला संबंधित शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांना जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे आपल्याला निलंबित केले जाणार याचा मानसिक दबाव घेत नैराश्येपोटी विजय नकाशे यांनी आत्महत्या केली. जगाच्यादृष्टीने ही घटना क्षुल्लक असली, तरी नकाशे यांच्या कुटुंबीयांवर हा मोठा आघात आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने या घटनेचा निषेध केला आहे.सेमाडोह शाळेत निकृष्ट कडधान्य व मसाला मिळाला याला केवळ मुख्याध्यापक जबाबदार नाही, तर पुरवठादारसुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे सेमाडोह येथील मुख्याध्यापक नकाशे हे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत का पोहोचले? याची चौकशी करावी व त्यांंच्या कुटुुंबीयांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे आत्महत्येसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आजही शिक्षक वर्ग शैक्षणिक कामाबरोबरच शासनाची कामेही प्रामाणिकपणे करीत असल्याचे यात स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)संघटनांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष२६ फेब्रुवारी २०१३ ला शासन निर्णयानुसार सर्व प्राथमिक शिक्षकांना शालेय पोषण आहार जबाबदारीतून मुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत; परंतु मुख्याध्यापकांना पोषण आहार जबाबदारीतून पूर्णपणे अद्याप मुक्त करण्यात आलेले नाही. पुरवठादार शाळांना निकृष्ट दर्जाचा माल पुरवितो. याबाबत संघटनांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांची दखल घेतली जात नाही.