शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा

By admin | Updated: November 11, 2015 23:52 IST

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओरोस : अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी नैराश्येपोटी आत्महत्या केली आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेच्यातीने निषेध नोंदवण्यात आला.याचबरोबर मु्ख्याध्यापक आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत का पोहचले? याची चौकशी करावी तसेच या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्राथमिक शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, अशी मागणी समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शिक्षक समितीच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर, राज्यविभाग प्रमुख नामदेव जांभवडे, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, कुडाळ तालुका अध्यक्ष नंदकु मार राणे, आदी उपस्थित होते. पंचायत राज समितीने अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना चिखलदरा तालुक्यातील समाडोह या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता शालेय पोषण आहारातील ३० किलो तांदूळ कमी, मसाला, मिरची पूड आणि कडधान्ये निकृष्ट दर्जाची आढळली. याला संबंधित शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांना जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे आपल्याला निलंबित केले जाणार याचा मानसिक दबाव घेत नैराश्येपोटी विजय नकाशे यांनी आत्महत्या केली. जगाच्यादृष्टीने ही घटना क्षुल्लक असली, तरी नकाशे यांच्या कुटुंबीयांवर हा मोठा आघात आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने या घटनेचा निषेध केला आहे.सेमाडोह शाळेत निकृष्ट कडधान्य व मसाला मिळाला याला केवळ मुख्याध्यापक जबाबदार नाही, तर पुरवठादारसुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे सेमाडोह येथील मुख्याध्यापक नकाशे हे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत का पोहोचले? याची चौकशी करावी व त्यांंच्या कुटुुंबीयांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे आत्महत्येसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आजही शिक्षक वर्ग शैक्षणिक कामाबरोबरच शासनाची कामेही प्रामाणिकपणे करीत असल्याचे यात स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)संघटनांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष२६ फेब्रुवारी २०१३ ला शासन निर्णयानुसार सर्व प्राथमिक शिक्षकांना शालेय पोषण आहार जबाबदारीतून मुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत; परंतु मुख्याध्यापकांना पोषण आहार जबाबदारीतून पूर्णपणे अद्याप मुक्त करण्यात आलेले नाही. पुरवठादार शाळांना निकृष्ट दर्जाचा माल पुरवितो. याबाबत संघटनांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांची दखल घेतली जात नाही.