शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पदाधिकाऱ्यांचा घरोघरी प्रचारावर भर

By admin | Updated: April 15, 2016 00:41 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : शेवटचा टप्पा, प्रचारामधील रंगत आणखीनच वाढणार--कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम -- कुडाळ  नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून आपल्या उमेदवाराचा व पक्षाचाच विजय व्हावा यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत असल्याचे चित्र कुडाळ शहरात दिसत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी कुडाळात दाखल झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात येथील प्रचाराची रंगत आणखीनच जोरदार वाढणार हे निश्चित.कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची १७ एप्रिल ही तारीख आता जवळ येत असून केवळ आजचा एकच दिवस प्रचार करण्यासाठी राहिला आहे. त्यामुळे शेवटच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे हे प्रमुख पाच राजकीय पक्ष उतरले आहेत तसेच या ठिकाणी अपक्षही मोठ्या प्रमाणात आहेत. १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात आहेत. पदाधिकारीही क्रियाशील केवळ नेते मंडळीच नव्हे तर कुडाळ शहरातील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा व पक्षाचा विजय करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात क्रियाशील झाले असून तेही ठाण मांडून कुडाळमध्ये बसून प्रचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जान्हवी सावंत व अन्य पदाधिकारी यांचा समावेश आहे. प्रचाराची रंगत वाढलीदरम्यान, मतदानाची तारीख जसजशी जवळ यायला लागली आहे तसतशी प्रचाराची रंगत वाढली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहचता येईल याकडे सर्वजण प्रामुख्याने लक्ष देत आहेत.प्रचाराच्या अनेक कल्पना निवडणुकीच्या प्रचारासाठी फलक लावणे, भित्तीपत्रक, जाहीरनामे यांचे वाटप करणे असे प्रकार सुरु असून शेवटच्या टप्प्यात आता चारचाकी गाड्या सजवून त्याच्यावर स्पीकर लावून तसेच शहरात ठिकठिकाणी मोटारसायकल रॅली काढून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. तर काहिंनी आपल्या बॅनरवर लावलेल्या घोषवाक्यांमुळेही ते उमेदवार खास करून लक्षात राहत आहेत. मात्र सर्व ठिकाणी प्रचार शांततेत नेहमी शांत असणारे कुडाळचे वातावरण या वाढत्या गरमीबरोबरच या निवडणुकीत तप्त होते की काय? असे सर्वांना वाटत होते. मात्र, या आतापर्यंतच्या काळात कोणताही प्रकारचा गोंधळ, भांडणे झाली नाहीत व एकंदरीत सर्वच प्रचार हा शांततेत पार पडला हे विशेष होय. प्रचार १५ एप्रिलला संपत असला तरी कंदील प्रचार सुरु राहणार असून आता प्रत्येकाचे लक्ष १७ एप्रिलवर आहे.आघाडी आहे युती नाही या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून ही निवडणूक लढवित आहे. याविरुद्ध सत्तेत युती करून सरकार चालविणारे शिवसेना व भाजप हे मात्र या ठिकाणी युती न करता स्वतंत्र लढत आहेत तर मनसेनेही आपले सहा उमेदवार उभे करीत या निवडणुकीत जोरदार उडी मारली आहे.सुरुवातीला संथगतीने निवडणुकीला उभे राहिल्यानंतर उमेदवाराला विजयासाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रचार. याठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात अत्यंत संथगतीने प्रचार सर्वजण करीत होते. त्यामुळे याठिकाणी निवडणुकीचे तेवढे वातावरण वाटत नव्हते.प्रचाराला दिवस कमी सदरच्या या निवडणुकीचा कार्यक्रम पाहिला असता अत्यंत कमी वेळ प्रचाराला मिळालेला दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तारीख ही ४ एप्रिल होती व १५ एप्रिल रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे म्हणजे म्हटले तर ११ ते १२ दिवस एवढाच वेळ प्रचाराला मिळाला.नेते, पदाधिकारी प्रचारातसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे व मध्यवर्ती असणारे कुडाळ हे प्रमुख शहर व आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका यामुळे कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व राजकीय पटलावर प्राप्त झाले असून याठिकाणी आपल्या पक्षाचा विजय व्हावा असे प्रत्येक पक्षाला वाटत असून विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वच प्रमुख नेते, पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत व प्रचारात भाग घेत आहेत.एकच सर्वांचे लक्ष संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळची ही एकच निवडणूक असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निवडणुकीत विजय कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. मोठे नेतेही प्रचारातविशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, भाजपकडून कल्याण डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, माधव भंडारी, शिवसेनेकडून पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, उदय सामंत असे राज्यातील मोठे नेतेही प्रचारात उतरले असून तेही कॉर्नर सभा तसेच घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देता आहेत. विकासाचा जाहीरनामा या प्रचारादरम्यान सर्वच पक्षाच्या वतीने कुडाळ वासियांसमोर कुडाळ शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा जाहीरनामा ठेवला असून कुडाळ शहर विकासाचे आयडॉल म्हणून आणणार असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे कुडाळवासीय कोणाच्या बाजूने कौल देतात हेही पाहावे लागणार आहे.