शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत रोज पाच टन कचरा

By admin | Updated: August 19, 2015 22:56 IST

व्यवस्थापन आवश्यक : गार्बेज डेपोची मर्यादा संपणार लवकरच

कणकवली : वेगाने विकसित होणाऱ्या कणकवली शहरात कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. सुमारे १७ हजार लोकसंख्येच्या या शहरात रोज पाच टन कचरा गोळा होत आहे. हा कचरा शहराबाहेरील कचरा डेपोत सध्या फक्त टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया न झाल्यास लवकरच कचरा डेपोची मर्यादा संपणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच पावले उचलावी लागणार आहेत. कणकवली शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील कचरा गोळा केला जातो. १२ घंटागाड्या घरोघरचा कचरा गोळा करतात. कचरा गोळा करण्याच्या कामी नगरपंचायतीचे नियमित १० कर्मचारी आणि कंत्राटी ३० कर्मचारी असे एकूण ४० कर्मचारी राबतात. त्याशिवाय कायझन गाड्या फिरवल्या जातात.शहरात प्रभागनिहाय कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ३१ कचरा पेट्यांमध्ये शहरातील कचरा गोळा होतो. ट्रॅक्टरमधून हा कचरा शहराबाहेर नागवे गावच्या सीमेलगत असलेल्या कचरा डेपोत टाकला जातो. शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा कचरा डेपो आहे. कचरा डेपो पाच एकर जागेत आहे. सध्या कोणतीही प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढिग येथे जमा होत आहेत. प्रक्रिया न करता येथे असाच कचरा टाकत राहिल्यास सुमारे पाच वर्षांतच कचरा डेपोची मर्यादा संपुष्टात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा ठाकणार आहे. विकसीत होणाऱ्या शहरांसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन ही डोकेदुखी होत आहे. रोज टनावरी गोळा होणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय? हा प्रश्न शहरांना भेडसावत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा रोजच्या रोज उचलून अन्यत्र टाकणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये गुंतवणुकीची गरज असते. तसेच तो चालवण्यासाठीही शहर प्रशासन सक्षम असावी लागते. सध्या कणकवली नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे परवडणारे नाही. (प्रतिनिधी)वस्ती वाढल्यास कचरा वाढणारशहरात आता नोंदणीनुसार सुमारे १७ हजार लोकसंख्या आहे. मात्र दिवसेंदिवस शहरवासीयांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे कचरा समस्येवर तातडीने पावले उचलावी लागतील. प्रक्रिया केल्यास २५ वर्षांची मर्यादाकणकवली शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केल्यास कचरा डेपो २५ वर्षे वापरला जाऊ शकतो. अन्यथा लवकरच हा डेपो वापरण्याची मर्यादा संपुष्टात येईल.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीचा विचार नगरपंचायतीने केला होता. मात्र, हा प्रकल्प उभारणीसाठी कोट्यवधींचा निधी लागेलच. त्याचबरोबर प्रकल्प चालवण्यासाठी छोट्या स्तरावरील नगरपंचायत सक्षम नाही. कचरा व्यवस्थापनासंदर्भात आयआयटी पवईमध्ये संशोधन झालेले मॉडेल पाहून त्याचा कणकवलीसाठी विचार केला जाणार आहे.-अवधूत तावडे, मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत.