शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कणकवलीत रोज पाच टन कचरा

By admin | Updated: August 19, 2015 22:56 IST

व्यवस्थापन आवश्यक : गार्बेज डेपोची मर्यादा संपणार लवकरच

कणकवली : वेगाने विकसित होणाऱ्या कणकवली शहरात कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. सुमारे १७ हजार लोकसंख्येच्या या शहरात रोज पाच टन कचरा गोळा होत आहे. हा कचरा शहराबाहेरील कचरा डेपोत सध्या फक्त टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया न झाल्यास लवकरच कचरा डेपोची मर्यादा संपणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच पावले उचलावी लागणार आहेत. कणकवली शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील कचरा गोळा केला जातो. १२ घंटागाड्या घरोघरचा कचरा गोळा करतात. कचरा गोळा करण्याच्या कामी नगरपंचायतीचे नियमित १० कर्मचारी आणि कंत्राटी ३० कर्मचारी असे एकूण ४० कर्मचारी राबतात. त्याशिवाय कायझन गाड्या फिरवल्या जातात.शहरात प्रभागनिहाय कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ३१ कचरा पेट्यांमध्ये शहरातील कचरा गोळा होतो. ट्रॅक्टरमधून हा कचरा शहराबाहेर नागवे गावच्या सीमेलगत असलेल्या कचरा डेपोत टाकला जातो. शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा कचरा डेपो आहे. कचरा डेपो पाच एकर जागेत आहे. सध्या कोणतीही प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढिग येथे जमा होत आहेत. प्रक्रिया न करता येथे असाच कचरा टाकत राहिल्यास सुमारे पाच वर्षांतच कचरा डेपोची मर्यादा संपुष्टात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा ठाकणार आहे. विकसीत होणाऱ्या शहरांसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन ही डोकेदुखी होत आहे. रोज टनावरी गोळा होणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय? हा प्रश्न शहरांना भेडसावत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा रोजच्या रोज उचलून अन्यत्र टाकणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये गुंतवणुकीची गरज असते. तसेच तो चालवण्यासाठीही शहर प्रशासन सक्षम असावी लागते. सध्या कणकवली नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे परवडणारे नाही. (प्रतिनिधी)वस्ती वाढल्यास कचरा वाढणारशहरात आता नोंदणीनुसार सुमारे १७ हजार लोकसंख्या आहे. मात्र दिवसेंदिवस शहरवासीयांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे कचरा समस्येवर तातडीने पावले उचलावी लागतील. प्रक्रिया केल्यास २५ वर्षांची मर्यादाकणकवली शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केल्यास कचरा डेपो २५ वर्षे वापरला जाऊ शकतो. अन्यथा लवकरच हा डेपो वापरण्याची मर्यादा संपुष्टात येईल.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीचा विचार नगरपंचायतीने केला होता. मात्र, हा प्रकल्प उभारणीसाठी कोट्यवधींचा निधी लागेलच. त्याचबरोबर प्रकल्प चालवण्यासाठी छोट्या स्तरावरील नगरपंचायत सक्षम नाही. कचरा व्यवस्थापनासंदर्भात आयआयटी पवईमध्ये संशोधन झालेले मॉडेल पाहून त्याचा कणकवलीसाठी विचार केला जाणार आहे.-अवधूत तावडे, मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत.