शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मालवणात मासेमारीचे अर्थकारण कोलमडले

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

आचरा संघर्ष प्रकरण : नौका किनारीच; अटकेच्या भीतीने मच्छिमार भूमिगत

मालवण : आचरा बंदर येथील अनधिकृत मिनीपर्ससीन व पारंपरिक मच्छिमार यांच्यातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील मासेमारी गेले चार दिवस कोलमडली आहे. पोलिसांनी २५० मच्छिमारांवर गुन्हे दाखल केल्यानंतर अटकेची कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून धरपकड मोहीम सुरू असल्याने किनारपट्टीवरील शेकडो मच्छिमार भूमिगत आहेत. त्यामुळे मासेमारी नौका किनाऱ्यावर उभ्या असल्याने मासेमारीच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. पोलिसांच्या अटकेच्या कारवाईमुळे मच्छिमार कुटुंबे धास्तावली आहेत. अटक होईल या भीतीने मालवण दांडी, वायरी, तळाशील, धुरीवाडा, आचरा आदी किनारपट्टीवरील भूमिगत अवस्थेत गेले आहेत. रोज शेकडोंच्या संख्येने समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या मच्छिमारांच्या नौका किनाऱ्यावरच उभ्या असून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ट्रॉलर्स तसेच अन्य पद्धतीने उपलब्ध होणारी मासळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. मात्र, लिलाव पद्धतीने मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून होणारी खरेदी व जिल्ह्याबाहेर होणारी माशांची वाहतूक आवक घटल्याने ठप्प झाली आहे. त्यामुळे दिवसाला सुमारे लाखो रुपयांची उलाढाल होणारा मासळी व्यवसाय गेले चार दिवस ठप्प झाला आहे. मच्छिमारांतील संघर्ष असाच सुरू राहिल्यास व दिवाळी पर्यटन हंगाम पाहता मासळीचे दरही गगनाला भिडण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)