शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १० ची लढत लक्षवेधी

By admin | Updated: October 30, 2015 22:45 IST

भाजप शहराध्यक्षांसमोर तिघांचे तगडे आव्हान

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. १० मध्ये चौरंगी लढत होत असून, येथून भाजपचे शहराध्यक्ष चेतन चव्हाण निवडणूक लढवित असल्याने भाजपसाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला आहे. तर काँग्रेसचे प्रवीण झालबा यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. मात्र, असे असले तरी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार पांडुरंग तळणकर व मनसेचे जीवन सावंत यांनी निवडणुकीच्या रिंंगणात एन्ट्री केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे तळणकर आणि सावंत यांना मिळणाऱ्या मतांच्या बेरीज-वजाबाकीवरच चव्हाण व झालबा यांचे भवितव्य अवलंबून आहे.ओंकार कॉलनी आणि हनुमान कॉलनीचा समावेश प्रभाग क्र. १० मध्ये आहे. याठिकाणी पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना एकसंघ असलेल्या प्रभागातून भाजपाच्या उमेदवार म्हणून चेतन चव्हाण यांच्या मातोश्री मनीषा चव्हाण ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रभाग रचना बदलल्याने ओंकार कॉलनी व हनुमान कॉलनी असा नवीन प्रभाग निर्माण झाला. त्यामुळे या प्रभागातून भाजपाचे शहराध्यक्ष चेतन चव्हाण निवडणूक लढवित आहेत. एक तरूण व तडफदार कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे शहराध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. युवा वर्गात नेहमी सहभागी होणारा चेहरा अशी त्यांची ओळख असल्याने चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे या जनसंपर्काचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर काँग्रेसचे प्रवीण झालबा हे राजकारणात नवखे आहेत. परंतु तरीसुध्दा काँग्रेसचे सर्व ताकदीनीशी पाठबळ त्यांना लाभल्याने आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत त्यांचा व्यवसाय असल्याने त्याचा फायदा त्यांना येथे होऊ शकतो. याचठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार पांडुरंग तळणकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. ते पेशाने शिक्षक असल्याने त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. प्रभाग क्र. १० मध्ये शिक्षक, डॉक्टर असा बुध्दजीवी मतदार वर्ग आहे. त्यामुळे त्यांना कॅपचर करण्यात तळणकर यांना यश येऊ शकेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. तर मनसेचे जीवन सावंत हे सुध्दा नवखे असले, तरी शिवसेनेत असताना याच प्रभागात त्यांनी अंतर्गत रस्त्यासाठी निधी आणून मतदारांचे लक्ष स्वत:वर केंद्रीत करून घेतले आहे. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)