शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

माणसी १५ किलो अन्नधान्याचा पुरवठा हवा

By admin | Updated: July 3, 2014 23:58 IST

दक्षता समिती सभेत ठराव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना

देवगड : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य पुरवठ्यामध्ये सुधारणा करून माणसी १० किलो तांदुळ व ५ किलो गहू असे १५ किलो धान्य देण्याची सुधारणा कायद्यात करा, अशी मागणी करणारा ठराव दक्षता समिती अध्यक्ष आमदार प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीच्या बैठकीत बुधवारी दुपारी तहसीलदार कार्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी अध्यक्ष आमदार प्रमोद जठार, सचिव तहसीलदार जीवन कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले व अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत व उपलब्ध माहितीनुसार २०११ साली ३५ किलो प्रति कार्ड पुरवठ्याच्या निकषाच्या वेळी तालुक्याला २२६ मेट्रीक टन धान्य पुरवठा झाला होता. मात्र अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यावर तालुक्याला १९६ मेट्रीक टन धान्य पुरवठा झाला. म्हणजे प्रत्यक्षात ३० टन धान्यपुरवठा कमीच झाला असल्याची बाब यावेळी पुढे आली. म्हणजे ३० हजार किलो धान्य प्रत्यक्षात देवगडच्या जनतेला कमी मिळाले आहे. त्यामुळे आता या कायद्यात सुधारणा करून माणसी १० किलो तांदुळ व ५ किलो गहू असा १५ किलो धान्य पुरवठा व्हावा अशी सूचना करणारा ठराव सभेने मंजूर केला.यानंतर आंबा बागायतदारांच्या मागणीनुसार सफेद केरोसिनचा पुरवठा व्हावा व त्यासाठी ठेकेदाराची नेमणूक व अन्य बाबींसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे तहसीलदार जीवन कांबळे यांनी मान्य केले. तसेच आगामी गणेशोत्सवाची वाढीव मागणी लक्षात घेऊन अन्नधान्य पुरवठ्यात वाढ करण्याची सूचनाही आमदार प्रमोद जठार यांनी केली. (प्रतिनिधी)