शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे उपोषण

By admin | Updated: February 3, 2015 23:54 IST

तिलारी वनटाईम सेटलमेंटप्रश्नी प्रकल्पग्रस्त आक्रमक

दोडामार्ग : तिलारी धरणग्रस्तांच्या वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा, यासाठी मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस यांनी येथील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह उपोषण केले. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मणेरी येथून तिलारीचे पाणी वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम बंद ठेवण्यात यावे, अशी आग्रही मागणीदेखील यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त पुढाकारातून साकारलेल्या तिलारी धरणासाठी पाल, पाटये, सरगवे, आयनोडे, केंद्रेखुर्द, बुदु्रक, शिरंगे या गावातील लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. शासनाने या जमिनी ताब्यात घेताना धरणग्रस्तांना घरटी एक नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रकल्प पूर्ण झाला, तरी त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. या आपल्या प्रमुख मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी धरणग्रस्तांनी कालव्यातच उतरून ठिय्या आंदोलन करीत गोव्याला जाणारे पाणी अडविले होते. त्या आंदोलनाची दखल घेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी तिलारीत येऊन धरणग्रस्तांशी चर्चा केली होती. यावेळी नोकरीऐवजी धरणग्रस्तांना वनटाईम सेटलमेंट म्हणून एक विशिष्ट रक्कम देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या कंट्रोल बोर्डाची बैठक होऊन वनटाईम सेटलमेंटच्या पर्यायावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु त्यानंतर एक वर्ष झाले, तरी अद्याप धरणग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. एका बाजूला तिलारी धरणाच्या धरणग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे, तर दुसरीकडे मात्र ज्या नदीवर धरण उभे आहे, त्या तिलारी नदीचे पाणी मणेरी येथून उपसा करून ते वेंगुर्लेपर्यंत नेण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने आखली आहे. सध्या या योजनेचे काम सुरू असून पाईपलाईन टाकली जात आहे. ही पाईपलाईन टाकत असताना भराव व्यवस्थित होत नसल्याने पावसाळ्यात माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता दाट शक्यता आहे. त्यामुळे या पाईप लाईनचे काम निर्धोक करण्यात यावेच. परंतु त्यापूर्वी तिलारी धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी गोपाळ गवस यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत ललिता भोळे, माजी तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर, अभिषेक गवस, नंदकिशोर गवस, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेखा कदम, तानाजी भोळे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा न केल्याने धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत गोपाळ गवस यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे उशिरापर्यंत उपोषण सुरू होते. (प्रतिनिधी)