शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात शेतकरी भरपाईला मुकले

By admin | Updated: August 19, 2015 23:40 IST

पंचायत समिती सभा : पंचनामे अवेळी केल्याचा आरोप

चिपळूण : महसूल विभागाने पंचनामे करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक शेतकरी आंबा व काजू नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. पंचनामे करण्याची जबाबदारी महसूल खात्यावर असताना त्यांनी कृषी खात्याला नाहक वेठीस धरले आणि त्यामुळेच पंचनामे वेळेवर होऊ शकले नाहीत. तरीही सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सभापती समीक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. सभेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी केले. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान त्याचे रितसर पंचनामे कृषी विभागाने केले. २८०० पंचनामे झाले असताना महसूल विभागाने १७०० हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे देण्यास सांगितले. त्यामुळे उर्वरित पंचनामे कृषी विभागाकडेच राहिले आहेत. ३१ मार्चपर्यंत मुदत देऊन पंचनामे स्वीकारण्यात न आल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याबाबत दिलीप मोरे, अभय सहस्त्रबुध्दे, चंद्रकांत जाधव, संतोष चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. कृषी सहाय्यक जगताप यांनी समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मुळात पंचनामा करणे हे महसूल विभागाचे काम आहे. अल्प कालावधीत आम्ही पंचनामे केले व सादर करताना ते घेतले गेले नाहीत, त्यामुळे २३ मार्चपर्यंतची यादी ग्राह्य धरुन नुकसान भरपाई देण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. लोकांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांचे हाल झाले आहेत. गावागावात अर्ध्या लोकांना नुकसान भरपाई मिळाल्याने वाद निर्माण झाले आहेत. नाहक भांडणे लावण्याचे काम झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल आहे. महसूल विभागाने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच येगाव शाळेतील झाडांची चोरी झाल्याचा विषय संतोष चव्हाण यांनी मांडला. मात्र, तसे झाले नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. ढाकमोली, चिंचवाडी, गुळवणे ही वाहतूक वळवण्यात आली आहे, तर गोवळकोट एस. टी. बंद असल्याने तेथील मिडीबस सुरु करावी. तसेच चिपळूण - लोटे - आवाशी ही शटल सेवा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली. कुटरे येथे डिझेल चोरीप्रकरणी एस. टी.च्या चालक व वाहकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या चालक वाहकाला ग्रामस्थांनी मदत केल्याने ते दंड भरु शकले. परंतु, ओसाड माळरानावर राहून प्रवाशांना सेवा देणाऱ्या चालक, वाहकांवर अशी कारवाई करु नये. डिझेल चोरीप्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी. याप्रकरणी पंचनामा झाला असून, त्यानुसार कारवाई करावी. परंतु, चालक वाहकांना यात नाहक त्रास देऊ नये, अशी मागणी सदस्य चव्हाण, सहस्त्रबुध्दे, मोरे यांनी केली. (प्रतिनिधी)भरपाईवरुन वाद वाढले...गोवळकोट मिडीबस सुरु करण्याची मागणी.आवाशी शटल सेवा सुरु करावी. नुकसान भरपाईवरुन गावागावात वाद वाढले.अनेक शेतकरी नुकसानीपासून वंचित. येगाव शाळेत झाडांची चोरी.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान.नुकसानाचे अल्प कालावधीतच पंचायत समितीच्या कृषी विभागाने केले पंचनामे.