शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

चिपळुणात शेतकरी भरपाईला मुकले

By admin | Updated: August 19, 2015 23:40 IST

पंचायत समिती सभा : पंचनामे अवेळी केल्याचा आरोप

चिपळूण : महसूल विभागाने पंचनामे करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक शेतकरी आंबा व काजू नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. पंचनामे करण्याची जबाबदारी महसूल खात्यावर असताना त्यांनी कृषी खात्याला नाहक वेठीस धरले आणि त्यामुळेच पंचनामे वेळेवर होऊ शकले नाहीत. तरीही सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सभापती समीक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. सभेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी केले. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान त्याचे रितसर पंचनामे कृषी विभागाने केले. २८०० पंचनामे झाले असताना महसूल विभागाने १७०० हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे देण्यास सांगितले. त्यामुळे उर्वरित पंचनामे कृषी विभागाकडेच राहिले आहेत. ३१ मार्चपर्यंत मुदत देऊन पंचनामे स्वीकारण्यात न आल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याबाबत दिलीप मोरे, अभय सहस्त्रबुध्दे, चंद्रकांत जाधव, संतोष चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. कृषी सहाय्यक जगताप यांनी समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मुळात पंचनामा करणे हे महसूल विभागाचे काम आहे. अल्प कालावधीत आम्ही पंचनामे केले व सादर करताना ते घेतले गेले नाहीत, त्यामुळे २३ मार्चपर्यंतची यादी ग्राह्य धरुन नुकसान भरपाई देण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. लोकांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांचे हाल झाले आहेत. गावागावात अर्ध्या लोकांना नुकसान भरपाई मिळाल्याने वाद निर्माण झाले आहेत. नाहक भांडणे लावण्याचे काम झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल आहे. महसूल विभागाने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच येगाव शाळेतील झाडांची चोरी झाल्याचा विषय संतोष चव्हाण यांनी मांडला. मात्र, तसे झाले नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. ढाकमोली, चिंचवाडी, गुळवणे ही वाहतूक वळवण्यात आली आहे, तर गोवळकोट एस. टी. बंद असल्याने तेथील मिडीबस सुरु करावी. तसेच चिपळूण - लोटे - आवाशी ही शटल सेवा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली. कुटरे येथे डिझेल चोरीप्रकरणी एस. टी.च्या चालक व वाहकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या चालक वाहकाला ग्रामस्थांनी मदत केल्याने ते दंड भरु शकले. परंतु, ओसाड माळरानावर राहून प्रवाशांना सेवा देणाऱ्या चालक, वाहकांवर अशी कारवाई करु नये. डिझेल चोरीप्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी. याप्रकरणी पंचनामा झाला असून, त्यानुसार कारवाई करावी. परंतु, चालक वाहकांना यात नाहक त्रास देऊ नये, अशी मागणी सदस्य चव्हाण, सहस्त्रबुध्दे, मोरे यांनी केली. (प्रतिनिधी)भरपाईवरुन वाद वाढले...गोवळकोट मिडीबस सुरु करण्याची मागणी.आवाशी शटल सेवा सुरु करावी. नुकसान भरपाईवरुन गावागावात वाद वाढले.अनेक शेतकरी नुकसानीपासून वंचित. येगाव शाळेत झाडांची चोरी.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान.नुकसानाचे अल्प कालावधीतच पंचायत समितीच्या कृषी विभागाने केले पंचनामे.