शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जैतापूरसारखे प्रकल्प विकासाला घातक

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

विनायक राऊत : दोडामार्ग महाविद्यालयात मार्गदर्शन

कसई दोडामार्ग : पश्चिम घाटाचे रक्षण करण्यासाठी ध्येयवेडी माणसे, शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे कोकणाला त्याचा फटका बसत आहे. जैतापूरसारखा घातक प्रकल्प कोकणाच्या विकासाला घातक आहे. असे असताना शासनकर्ते पश्चिम घाटाचे संवर्धन करण्यासाठी कमी पडत आहेत, असे मत खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम घाट- जागतिक वारसा’ याविषयी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. दोडामार्ग महाविद्यालयात ‘पश्चिम घाट-जागतिक वारसा’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, प्राध्यापक डॉ. व्ही. ए. पाटील, उद्योजक विवेकानंद नाईक, सुजन कोरगावकर, सूर्यकांत परमेकर, डॉ. राजेंद्र केरकर आदींसह विविध विषयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, पश्चिम घाटाचे रक्षण होणे आवश्यक आहे. घाट वाचला तर आपण वाचणार आहोत. माधव गाडगीळ यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. ते म्हणाले, ‘कोकणातील साधनसंपत्तीवरच व्यवसायांची निर्मिती झाल्यास कोकणाचा विकास होणार आहे. गौण खनिजावरील बंदी योग्य नाही. पर्यावरणाचे संतुलन टिकविणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर मानवाची उत्क्रांती अवलंबून आहे. समतोल ढासळल्यास त्याचे परिणाम मानवालाच भोगावे लागणार आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच तयार असते. जैतापूरसारख्या प्रकल्पांना विरोध होत नाही, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. प्रास्ताविकात अभिजीत हेगशेट्ये यांनी, माधव गाडगीळ कस्तुरीरंगन यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यासाठी जनतेने लढा देणे आवश्यक आहे. तरच नैसर्गिक साधनसंपत्ती वाचणार आहे, असे सांगितले. (वार्ताहर)