शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

जैतापूरसारखे प्रकल्प विकासाला घातक

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

विनायक राऊत : दोडामार्ग महाविद्यालयात मार्गदर्शन

कसई दोडामार्ग : पश्चिम घाटाचे रक्षण करण्यासाठी ध्येयवेडी माणसे, शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे कोकणाला त्याचा फटका बसत आहे. जैतापूरसारखा घातक प्रकल्प कोकणाच्या विकासाला घातक आहे. असे असताना शासनकर्ते पश्चिम घाटाचे संवर्धन करण्यासाठी कमी पडत आहेत, असे मत खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम घाट- जागतिक वारसा’ याविषयी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. दोडामार्ग महाविद्यालयात ‘पश्चिम घाट-जागतिक वारसा’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, प्राध्यापक डॉ. व्ही. ए. पाटील, उद्योजक विवेकानंद नाईक, सुजन कोरगावकर, सूर्यकांत परमेकर, डॉ. राजेंद्र केरकर आदींसह विविध विषयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, पश्चिम घाटाचे रक्षण होणे आवश्यक आहे. घाट वाचला तर आपण वाचणार आहोत. माधव गाडगीळ यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. ते म्हणाले, ‘कोकणातील साधनसंपत्तीवरच व्यवसायांची निर्मिती झाल्यास कोकणाचा विकास होणार आहे. गौण खनिजावरील बंदी योग्य नाही. पर्यावरणाचे संतुलन टिकविणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर मानवाची उत्क्रांती अवलंबून आहे. समतोल ढासळल्यास त्याचे परिणाम मानवालाच भोगावे लागणार आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच तयार असते. जैतापूरसारख्या प्रकल्पांना विरोध होत नाही, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. प्रास्ताविकात अभिजीत हेगशेट्ये यांनी, माधव गाडगीळ कस्तुरीरंगन यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यासाठी जनतेने लढा देणे आवश्यक आहे. तरच नैसर्गिक साधनसंपत्ती वाचणार आहे, असे सांगितले. (वार्ताहर)