शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जैतापूरसारखे प्रकल्प विकासाला घातक

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

विनायक राऊत : दोडामार्ग महाविद्यालयात मार्गदर्शन

कसई दोडामार्ग : पश्चिम घाटाचे रक्षण करण्यासाठी ध्येयवेडी माणसे, शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे कोकणाला त्याचा फटका बसत आहे. जैतापूरसारखा घातक प्रकल्प कोकणाच्या विकासाला घातक आहे. असे असताना शासनकर्ते पश्चिम घाटाचे संवर्धन करण्यासाठी कमी पडत आहेत, असे मत खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम घाट- जागतिक वारसा’ याविषयी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. दोडामार्ग महाविद्यालयात ‘पश्चिम घाट-जागतिक वारसा’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, प्राध्यापक डॉ. व्ही. ए. पाटील, उद्योजक विवेकानंद नाईक, सुजन कोरगावकर, सूर्यकांत परमेकर, डॉ. राजेंद्र केरकर आदींसह विविध विषयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, पश्चिम घाटाचे रक्षण होणे आवश्यक आहे. घाट वाचला तर आपण वाचणार आहोत. माधव गाडगीळ यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. ते म्हणाले, ‘कोकणातील साधनसंपत्तीवरच व्यवसायांची निर्मिती झाल्यास कोकणाचा विकास होणार आहे. गौण खनिजावरील बंदी योग्य नाही. पर्यावरणाचे संतुलन टिकविणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर मानवाची उत्क्रांती अवलंबून आहे. समतोल ढासळल्यास त्याचे परिणाम मानवालाच भोगावे लागणार आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच तयार असते. जैतापूरसारख्या प्रकल्पांना विरोध होत नाही, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. प्रास्ताविकात अभिजीत हेगशेट्ये यांनी, माधव गाडगीळ कस्तुरीरंगन यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यासाठी जनतेने लढा देणे आवश्यक आहे. तरच नैसर्गिक साधनसंपत्ती वाचणार आहे, असे सांगितले. (वार्ताहर)