शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘भू-विकास’चे अस्तित्त्व संपुष्टात

By admin | Updated: December 1, 2015 00:22 IST

केवळ तीनच कर्मचारी : तब्बल २५ कर्मचाऱ्यांना केले सेवामुक्त; वसुली सुरूच

रत्नागिरी : आर्थिक अडचणीत सापडल्याने रत्नागिरी जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँकेच्या (भू-विकास बॅँक) जिल्ह्यातील २५ कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बॅँकेच्या चार शाखा व मुख्य शाखा यामध्ये आता केवळ तीन कर्मचारी उरले आहेत. या बॅँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सुधीर मुनगंटीवार समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला. सेवामुक्त धोरणामुळे कर्मचारी आता बेकार झाले आहेत.जिल्ह्यात या बॅँकेच्या एकूण पाच शाखा कार्यरत आहेत. त्यात दापोली, चिपळूण, देवरूख व लांजा येथील चार तसेच रत्नागिरीतील मुख्य कार्यालय यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात राज्यभरातील जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँका आर्थिक संकटात सापडल्या. कर्जवाटपानंतर त्याची वसुलीच झाली नसल्याने हे आर्थिक संकट अधिक गडद झाले. अखेर या बॅँका शासनाकडून अवसायनात काढण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँक १४ फेब्रुवारी २०१३ला अवसायनात काढण्यात आली होती. त्यानंतर पावणेतीन वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. २० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेले २ शिपाई व एक लिपीक यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. कर्मचारी सेवामुक्त झाले तरी या बॅँकेचे काम हे कर्जवसुली होईपर्यंत सुरूच राहणार आहे. बॅँकेची स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी महिनाभरापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सेवामुुक्त करण्यात आले आहे. मात्र, या सेवामुक्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तीनंतरचे लाभ मिळणार की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य शिखर बॅँकेने काही निधी दिला, तर त्यातून काही प्रमाणात हे लाभ सेवामुक्त कर्मचाऱ्यांना मिळू शकतील. मात्र, असा निधी मिळेल की नाही, याबाबत कोणतीच शाश्वती सध्यातरी नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)येणे ३ कोटी, देणे १० कोटी६२८ कर्जदारांकडे बॅँकेचे ८ कोटी रुपये येणे होते. मात्र, काही काळापूर्वी एकाच वेळी कर्ज रक्कम भरण्याची योजना (वन टाईम सेटलमेंट स्किम) जाहीर करण्यात आली. त्यामुळे आठ कोटींचे येणे आता ३ कोटींवर आले आहे. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे देणे १० कोटींचे आहे. यात आर्थिक मेळ बसत नसल्याने अवसायनात असलेल्या या बॅँकेतील २० वर्षांवर अधिक सेवा झालेल्या २५ कर्मचाऱ्यांना २४ नोव्हेंबर २०१५ व ३० नोव्हेंबर २०१५ रोजी दोन टप्प्यात सेवामुक्त करीत असल्याचा लेखी निर्णय नोटीसीद्वारे कळविण्यात आला आहे. जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँक कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केलेले असले तरी ज्या ६२८ जणांकडे बॅँकेचे ८ कोटींचे कर्ज आहे ते वसूल केले जाणार आहे. एकाचवेळी कर्ज रक्कम भरणा योजनेत भाग घेणाऱ्यांनाच कर्ज रकमेत सवलत आहे. या कर्जवसुलीसाठी हंगामी कर्मचारी घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी सेवामुक्त कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.-राजेंद्र महाजन, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) रत्नागिरीसेवामुुक्तीनंतच्या लाभाची प्रतीक्षाकर्जवसुली करण्यासाठी बॅँकेचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. गेल्या अनेक महिन्यांत या कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे. आर्थिक ओढाताणीमुळे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या परिवाराची अवस्था हलाखीची आहे. त्यामुुळेच केलेल्या सेवेचे निवृत्तीनंतरचे लाभ मिळावेत, अशी मागणी आहे.