शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

‘भू-विकास’चे अस्तित्त्व संपुष्टात

By admin | Updated: December 1, 2015 00:22 IST

केवळ तीनच कर्मचारी : तब्बल २५ कर्मचाऱ्यांना केले सेवामुक्त; वसुली सुरूच

रत्नागिरी : आर्थिक अडचणीत सापडल्याने रत्नागिरी जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँकेच्या (भू-विकास बॅँक) जिल्ह्यातील २५ कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बॅँकेच्या चार शाखा व मुख्य शाखा यामध्ये आता केवळ तीन कर्मचारी उरले आहेत. या बॅँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सुधीर मुनगंटीवार समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला. सेवामुक्त धोरणामुळे कर्मचारी आता बेकार झाले आहेत.जिल्ह्यात या बॅँकेच्या एकूण पाच शाखा कार्यरत आहेत. त्यात दापोली, चिपळूण, देवरूख व लांजा येथील चार तसेच रत्नागिरीतील मुख्य कार्यालय यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात राज्यभरातील जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँका आर्थिक संकटात सापडल्या. कर्जवाटपानंतर त्याची वसुलीच झाली नसल्याने हे आर्थिक संकट अधिक गडद झाले. अखेर या बॅँका शासनाकडून अवसायनात काढण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँक १४ फेब्रुवारी २०१३ला अवसायनात काढण्यात आली होती. त्यानंतर पावणेतीन वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. २० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेले २ शिपाई व एक लिपीक यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. कर्मचारी सेवामुक्त झाले तरी या बॅँकेचे काम हे कर्जवसुली होईपर्यंत सुरूच राहणार आहे. बॅँकेची स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी महिनाभरापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सेवामुुक्त करण्यात आले आहे. मात्र, या सेवामुक्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तीनंतरचे लाभ मिळणार की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य शिखर बॅँकेने काही निधी दिला, तर त्यातून काही प्रमाणात हे लाभ सेवामुक्त कर्मचाऱ्यांना मिळू शकतील. मात्र, असा निधी मिळेल की नाही, याबाबत कोणतीच शाश्वती सध्यातरी नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)येणे ३ कोटी, देणे १० कोटी६२८ कर्जदारांकडे बॅँकेचे ८ कोटी रुपये येणे होते. मात्र, काही काळापूर्वी एकाच वेळी कर्ज रक्कम भरण्याची योजना (वन टाईम सेटलमेंट स्किम) जाहीर करण्यात आली. त्यामुळे आठ कोटींचे येणे आता ३ कोटींवर आले आहे. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे देणे १० कोटींचे आहे. यात आर्थिक मेळ बसत नसल्याने अवसायनात असलेल्या या बॅँकेतील २० वर्षांवर अधिक सेवा झालेल्या २५ कर्मचाऱ्यांना २४ नोव्हेंबर २०१५ व ३० नोव्हेंबर २०१५ रोजी दोन टप्प्यात सेवामुक्त करीत असल्याचा लेखी निर्णय नोटीसीद्वारे कळविण्यात आला आहे. जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँक कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केलेले असले तरी ज्या ६२८ जणांकडे बॅँकेचे ८ कोटींचे कर्ज आहे ते वसूल केले जाणार आहे. एकाचवेळी कर्ज रक्कम भरणा योजनेत भाग घेणाऱ्यांनाच कर्ज रकमेत सवलत आहे. या कर्जवसुलीसाठी हंगामी कर्मचारी घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी सेवामुक्त कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.-राजेंद्र महाजन, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) रत्नागिरीसेवामुुक्तीनंतच्या लाभाची प्रतीक्षाकर्जवसुली करण्यासाठी बॅँकेचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. गेल्या अनेक महिन्यांत या कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे. आर्थिक ओढाताणीमुळे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या परिवाराची अवस्था हलाखीची आहे. त्यामुुळेच केलेल्या सेवेचे निवृत्तीनंतरचे लाभ मिळावेत, अशी मागणी आहे.