शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

उत्खनन मार्ग अखेर मोकळा

By admin | Updated: December 23, 2014 23:44 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच तालुक्यातील व्यावसायिकांचा उत्खनन मार्ग मोकळा

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील अधिस्थगनाखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांतील उत्खननाच्या परवान्यांना अखेर काल सायंकाळी झालेल्या जिल्हा खाणकाम योजनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे आता पाच तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणाऱ्या २९२ गावांसह एकूण ९९६ गावांवर अधिस्थगन लागू करण्यात आले होते. इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणारी २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांना या बंदीचा २०१० सालापासून आर्थिकदृष्ट्या फटका बसला होता. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने अधिस्थगनाखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांवरील बंदी उठविण्याचा निकाल दिला. बंदी उठल्याने परवाने लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती चिरेखाण व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली काल (सोमवारी) सायंकाळी झालेल्या जिल्हा खाणकाम समितीच्या बैठकीत या पाच तालुक्यातील २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांमध्ये उत्खननासाठी परवानगी मिळाली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्यासह सदस्य सचिव जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभागाचे अधिकारी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या समितीने या पाच तालुक्यांतील गट क्रमांक आणि सर्व्हे नंबर यांना मंजुरी दिली.आता या व्यावसायिकांना ५०० ब्रास उत्खननासाठी तहसीलदारांची, तर २००० ब्रास उत्खननासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता या व्यावसायिकांकडून नव्याने प्रस्ताव दाखल होणार आहेत. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून बंदीत अडकलेल्या या पाच तालुक्यातील ६३४ गावांमधील व्यावसायिकांच्या व्यवसायातील अडसर दूर झाला असून, त्यांच्यावर अवंलबून असलेल्या कामगारांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे. आता लवकरच या तालुक्यातील चिरेखाणीही धडधडू लागणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांनाही सोपे जाणार आहे. (प्रतिनिधी)व्यावसायिकांचा निश्वास खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणाऱ्या २९२ गावांसह ९९६ गावांवर अधिस्थगन होता लागू.झोनमधील २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांना या बंदीचा २०१० सालापासून फटका.न्यायालयाने अधिस्थगनखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांवरील बंदी उठविण्याचा दिला निकाल.