शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

उत्खनन मार्ग अखेर मोकळा

By admin | Updated: December 23, 2014 23:44 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच तालुक्यातील व्यावसायिकांचा उत्खनन मार्ग मोकळा

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील अधिस्थगनाखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांतील उत्खननाच्या परवान्यांना अखेर काल सायंकाळी झालेल्या जिल्हा खाणकाम योजनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे आता पाच तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणाऱ्या २९२ गावांसह एकूण ९९६ गावांवर अधिस्थगन लागू करण्यात आले होते. इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणारी २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांना या बंदीचा २०१० सालापासून आर्थिकदृष्ट्या फटका बसला होता. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने अधिस्थगनाखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांवरील बंदी उठविण्याचा निकाल दिला. बंदी उठल्याने परवाने लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती चिरेखाण व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली काल (सोमवारी) सायंकाळी झालेल्या जिल्हा खाणकाम समितीच्या बैठकीत या पाच तालुक्यातील २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांमध्ये उत्खननासाठी परवानगी मिळाली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्यासह सदस्य सचिव जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभागाचे अधिकारी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या समितीने या पाच तालुक्यांतील गट क्रमांक आणि सर्व्हे नंबर यांना मंजुरी दिली.आता या व्यावसायिकांना ५०० ब्रास उत्खननासाठी तहसीलदारांची, तर २००० ब्रास उत्खननासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता या व्यावसायिकांकडून नव्याने प्रस्ताव दाखल होणार आहेत. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून बंदीत अडकलेल्या या पाच तालुक्यातील ६३४ गावांमधील व्यावसायिकांच्या व्यवसायातील अडसर दूर झाला असून, त्यांच्यावर अवंलबून असलेल्या कामगारांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे. आता लवकरच या तालुक्यातील चिरेखाणीही धडधडू लागणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांनाही सोपे जाणार आहे. (प्रतिनिधी)व्यावसायिकांचा निश्वास खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणाऱ्या २९२ गावांसह ९९६ गावांवर अधिस्थगन होता लागू.झोनमधील २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांना या बंदीचा २०१० सालापासून फटका.न्यायालयाने अधिस्थगनखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांवरील बंदी उठविण्याचा दिला निकाल.