शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जांभळाच्या मागणीला जोर

By admin | Updated: May 14, 2015 00:29 IST

रानमेव्याला सुगीचे दिवस : चांगल्या भावामुळे विक्रेत्यांमध्ये समाधान

बाळकृष्ण सातार्डेकर- रेडीउन्हाळ्याच्या दिवसात खाण्यात रेलचेल असते ती ग्रामीण भागातील रानमेव्याची. सध्या रानमेव्याला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या पर्यटक आणि सुटीच्या दिवसात गावाकडे वळलेले चाकरमानी जांभूळ या रानमेव्याची चव चाखत आहेत. जांभळाच्या हंगामी पिकाची रेडी, शिरोडा, आरोंदा या पंचक्रोशीतून निर्यात वाढली आहे. सध्या जांभळाला मिळणारा भावही विक्रेत्यांसाठी समाधानकाक असल्याने यावर्षी जांभूळ उत्पादक, मजूर व विक्रेते खूश आहेत.दरवर्षी जांंभळाला ७० ते ८० रुपये किलो दर मिळत होता; यावर्षी मात्र हा दर २०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एप्रिल व मे महिना म्हणजे सुटीचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर शहरी व विशेष करून चाकरमानी जांभूळ, करवंदे, या रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. बाजारात जांभळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे वाढलेल्या नफ्यामुळे उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. आंब्यापाठोपाठ जांभळाला मागणी जांभळाच्या सर्व गुणांमुळेच बाजारपेठेतील जांभळाची मागणी वाढत आहे. दरवर्षी सुमारे ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणाऱ्या जांभळाने यावर्षी मात्र २०० चा आकडा पार केला आहे. विकत घेऊन जांभूळ खाणे परवडणारे नसले तरी जांभळाची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे काळ्याभोर, टपोऱ्या तसेच रसरशीत जांभळांनी बाजारात आंब्यापाठोपाठ दर घेतला आहे. बहुपयोगी जांभूळजांभूळ हे तसे दुर्लक्षित फळ, परंतु जांभळाचा वापर मधुमेहावरच्या औषधांसाठी प्रामुख्याने केला जातो. तसेच या फळापासून उत्कृष्ट दर्जाचे मद्यही तयार केले जाते. जांभळाचा रस काढून त्याच्यापासून जांभूळ सरबत, स्क्वॅश, जेली तसेच औषधी सिरपही तयार केले जाते. त्यामुळे लघुउद्योजकांनाही जांभूळ उत्पादनाने रोजगार निर्मिती करून दिली आहे. जांभळाच्या बिया आयुर्वेदात अधिक उपयुक्त ठरत आल्या आहेत. जांभळाच्या रसाला तसेच बिया व भुकटीला औषधी गुणधर्म आहेत. जांभूळ सेवन केल्याने शरीरातील रक्ताच्या शुद्धिकरणास मदत होते. तसेच जांभूळ हे उत्तम पाचक असल्याने पचनशक्ती वाढविण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. निर्यात वाढलीस्थानिक भागातील विक्रीबरोबच जांभळाची निर्यातही वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जांभूळ आरामबस व अन्य वाहनांद्वारे परजिल्ह्यात, राज्यात व मंबईकडे पाठविली जात आहेत. एकूणच जांभळाची वाढलेली निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत मिळणारा चांगला भाव यामुळे उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.