शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी परिसरात हत्तींचा धुमाकूळ

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

कोटींचे नुकसान : चोख बंदोबस्त करण्याची मागणी

कसई दोडामार्ग : गेल्या १५-२० दिवसांपासून बाबरवाडी तिलारी परिसरात धुमाकूळ घालत बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना कंगाल केले असतानाही जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यास वनविभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने बाबरवाडीतील संतप्त शेतकरी व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली कोनाळ येथील वनअधिकाऱ्यांना घेराव घालून हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी केल्यानंतर बाबरवाडी व तिलारी कर्मचाऱ्यांना तैनात करून हत्तींना रोखले जाईल, असे आश्वासन वनपाल देसाई यांनी दिले. गेल्या १५-२० दिवसांपासून बाबरवाडीत १०-१५ शेतकऱ्यांच्या तसेच तिलारी धरण परिसरात राजेंद्र म्हापसेकर यांच्या बागायतीत घुसून जंगली हत्तींनी केळी-माड बागायती, सुपारी, फणस व इतर झाडांचे मिळून क ोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. जवळ जवळ सर्वच बागायती हत्तींच्या कळपाने पूर्णपणे भुईसपाट केल्याने शेतकरी भिकेकंगाल झाले आहेत. असे असताना वन विभागाकडून या हत्तींचा बंदोबस्त करण्यास पूर्णत: दुर्लक्ष केले जात असल्याने बाबरवाडीतील ३० ते ३५ शेतकरी, बागायतदार व राजेंद्र म्हापसेकर यांनी मंगळवारी सकाळी कोनाळ वन विभागाचे एम. डी. देसाई व इतर कर्मचाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. जंगली हत्तींना रोखून शेतकऱ्यांना जगू द्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या रक्षणाची व पालनपोषणाची जबाबदारी तुम्ही घ्या, अशा शब्दात कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. गेल्या महिन्यापासून हत्तींकडून नुकसान होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलिकडे वनविभाग काही करू शकला नाही, हे सर्व आमच्या सहन करण्यापलिकडे गेले आहे, असे सांगून वनकर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. अखेर आजपासून बाबरवाडीत व तिलारीत वनकर्मचारी तैनात केले जातील, असे आश्वासनवन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. (वार्ताहर)