शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

प्रभावी सादरीकरण ‘व्याकूळ संध्यासमयी’ राज्य नाट्य स्पर्धा

By admin | Updated: November 16, 2014 23:56 IST

भूमिकेला कलाकारांचा योग्य न्याय...

 मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी कौटुंबिक जीवन जगत असताना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा त्यावर परिाणाम होत असतो. ज्या घटनांमध्ये कुटुंबापेक्षा करीयरला महत्व दिले जात आहे. यातून घडणाऱ्या विभक्तपणाच्या आणि पुन्हा एकत्रित संसारासाठी मिळालेला ‘यु टर्न’ वेगळा संदेश देवून जातो. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाने सादर केलेल्या ‘या व्याकूळ संध्यासमयी’ एक तरल काव्यात्मक नाट्यानुभव होता. कलाकारांनीदेखील आपापल्या भूमिकेस योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. फ्लॅशबॅककरिता वापरण्यात आलेले संगीत व लाईटस्चा वापर प्रभावी ठरला. रत्नागिरीत पहिल्यांदाच फ्लॅशबॅक आधारीत नाटक सादर करण्याचा प्रयत्न सफल झाला. धकाधकीच्या जीवनात मानव इतका व्यस्त झाला आहे की, त्याला स्वत:च्या कुटुंबासाठीही फारसा वेळ देता येत नाही. स्वत:चे छंद जोपासताना, स्वत:च्या आवडीनिवडी पूर्ण करण्याकरिता, स्वत:ला वाहून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, या वृत्तीचा परिणाम वैवाहिक जीवनात अडकल्यानंतर जाणवायला लागतो. याच पद्धतीचे कथानक मांडण्याचा प्रयत्न लेखक एस. मनोहर यांनी ‘या व्याकूळ संध्यासमयी’ नाटकाद्वारे केले आहे. एकाचवेळी दोन प्रसंगाचे सादरीकरण करताना फ्लॅशबॅकचे माध्यम दिग्दर्शक श्रीकांत पाटील यांनी वापरले. नाटकात एकसारखे ‘ब्लॅक आऊट’ केल्याने नाटकातील रस कमी होवू शकतो, हे टाळण्यासाठी लाईटस्चा प्रभावी वापर केला गेला. नाटक सूत्रबद्ध बांधता आलं शिवाय संगीतामुळे तरलता आली. श्रीकांत गडकरी (मिनार पाटील) हा एक साहित्यिक तर मेघा (श्वेताराणी सावंत) एक समाजसेविका दोघांचे लग्न होते. मात्र लग्नानंतर श्रीकांत व मेघा यांच्या वैवाहिक जीवनात हळुहळु समस्या निर्माण होतात. एकमेकांना वेळ द्यायलाही मिळत नाही. उभयतांमध्ये खटके उडायला लागतात. अखेर दोघेही घटस्फोटाचा निर्णय घेवून विभक्त होतात. कालांतराने समाजसेवीका मेघा त्यांच्याच संस्थेत समाजसेवक असलेल्या वेदपाठक यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते. मेघाच्या नव्या कुटुंबात श्वेता (सायली सुर्वे) नावाची मुलगी जन्माला येते. श्रीकांतच्या जीवनात सरिता नावाची नवी जीवनसाथी मिळते. सरीताचा मुलगा शेखर (प्रथमेश भाटकर) याला सांभाळण्याचा निर्णय श्रीकांत घेतो. दरम्यान श्वेता व शेखर यांची ओळख होते. दोघांमध्ये प्रेम निर्माण होते. कालांतराने वेदपाठक यांचे निधन होते. मेघा विधवा होते. मेघा व श्रीकांत एका कार्यक्रमावेळी भेटतात. भेटी वाहून पुन्हा एकदा त्यांचे सूर जुळतात. मात्र त्यासाठी त्यांची मुले श्वेता व शेखर मदत करतात. परंतु, श्वेता व शेखर यांच्या प्रेमकहाणीचे सूर मात्र व्याकूळलेले रहातात, असे या नाटकाचे कथानक आहे. नाटकाचे कथानक गुंफलेले असले तरी प्रत्येक कलाकारांनी भूमिकेला साजेसा अभिनय सादर करताना घेतलेली मेहनत दिसून येते. वार्ताहराच्या भूमिकेत सुहास साळवी, मिलींद सावंत, दत्तात्रय सावंत, शंकर वरक, समिक्षा सावंत देसाई, नितेश धुलले यांनी नाटकामध्ये आपले अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शन व पार्श्वसंगीत श्रीकांत पाटील यांनी केले आहे. नेपथ्य चंद्रकांत गावडे, मिलींद सावंत, प्रकाश योजना विलास जाधव तर रंगभूषा दादा लोगडे यांनी पाहिली. रंगमंचाचा पुरेपूर वापर करुन श्रीकांत - मेघा याचं घर तर घटस्फोटानंतर मेघा याचं स्वतंत्र घर वेगवेगळी लोकेशन्स रंगमंचावर दाखविण्यात आली. त्यासाठी कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, दिलीप सागवेकर, मंगेश पवार, सुधाकर सुर्वे, संदीप सावंत यांनी प्रयत्न केले. साधं, सरळ कथानक मांडताना नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना यांचा योग्य विचार केला गेला. कथानकात सुसूत्रता आणण्यासाठी तरलतेला ब्रेक लागू नये याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी खुबीने केला. फ्लॅशबॅक दाखवितानादेखील नाटकाचा फ्लो अखंड राहिला. आज सादर होणारे नाटक.. - काळोख देत हुंकार- सादरकर्ते : महाकाली रंगविहार, नाणिज फ्लॅशबॅककरिता वापरण्यात आलेले संगीत व लाईटस्चा वापर प्रभावी. रत्नागिरीत पहिल्यांदाच फ्लॅशबॅक आधारीत नाटक. ‘या व्याकूळ संध्यासमयी’ एक तरल काव्यात्मक नाट्यानुभव. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाने सादर केले राज्य नाट्य स्पर्धेत नाटक. कौटुंबिक नाटकाव्दारे आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न.