शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

कडक नियमांमुळे वाहन अपघातांचे प्रमाण होणार कमी

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

गेल्या पाच वर्षांत मुंबई - गोवा महामार्गासह अन्य राज्य मार्ग व अंतर्गत ग्रामीण मार्गावरही मोठ्या प्रमाणात अपघात

रत्नागिरी : वाहतूक नियमांचा भंग करणे वाहनचालकांच्या आता चांगलेच अंगाशी येणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात वाहन चालवताना जे चालक अपघाती मृत्यूस कारण ठरले आहेत, त्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात यावेत, असा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे वाहन अपघातांची संख्या कमी होणे शक्य आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. गेल्या पाच वर्षांच्या काळात मुंबई - गोवा महामार्गासह अन्य राज्य मार्ग व अंतर्गत ग्रामीण मार्गावरही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यात वाहने बेदरकारपणे चालविणे, मद्य प्राशन करून वाहने चालविणे तसेच अन्य वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने हाकणे, यामुळे घडलेल्या अपघातात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. या अपघातांचा आढावा घेतल्यानंतर त्याची गंभीर दखल जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. या संपूर्ण अपघातांच्या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळावरच घाव घातल्याशिवाय समस्येची उकल होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत ज्यांच्या बेपर्वाईमुळे महामार्ग, राज्यमार्गावर अपघात झाले व त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, अशा प्रकरणांची वर्गवारी पोलिसांकडून केली जात आहे. त्यात दोषी असलेल्या वाहनचालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव तातडीने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जिल्हा पोलिसांकडून पाठवला जाणार आहे. सन २०१३मध्ये झालेल्या ५८३ रस्ते अपघातात १५३ जणांचा बळी गेला. २०१४ या वर्षात जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर झालेल्या ७७५ रस्ते अपघातात एकूण १५२ लोकांना प्राण गमवावे लागले. गेल्या पाच वर्षांचा रस्ते अपघातांचा आलेख लक्षात घेता त्यात सातत्याने वाढ होत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण येत्या दोन वर्षाच्या काळात होणार आहे. (प्रतिनिधी)सध्यस्थितीत वाढलेले अपघात रोखणे अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यासाठीच जिल्हा पोलिसांनी आता गंभीरपणे पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याबाबत लवकरच कठोर उपाययोजना अमलात येणार आहे.- डॉ. संजय शिंदे, पोलीस अधीक्षक वाहतूक कोंडी रोखणारमहामार्गावरील वाहतूक कोंडीचे प्रकार कमी करण्यासाठी खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या शहरांचा मास्टर प्लॅन बनविला जाणार आहे. त्यामुळे या शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येची उकल करणे शक्य होणार आहे. शहरात रस्त्यांची रूंदी कमी असून, वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे.