शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

प्रशासनावर अंकुश नसल्याने विकास ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 00:35 IST

कणकवली नगरपंचायत : विरोधी नगरसेवकांचा आरोप

कणकवली : कणकवली शहरातील अनेक विकासकामे रखडली असून नागरिकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. घरपट्टी वाढीचा निर्णय घेणारे सत्ताधारी जनतेच्या सुविधांमध्ये वाढ करणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच नगराध्यक्षा तसेच सत्ताधाऱ्यांचा नगरपंचायत प्रशासनावर अंकुश नसल्यानेच कारभारात ताळमेळ नसल्याची टिका विरोधी नगरसेवक सुशांत नाईक व राजश्री धुमाळे यांनी केली आहे. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सोमवारी अवधूत तावडे यांनी स्वीकारला. नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत विरोधी नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर या नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका नंदिनी धुमाळे उपस्थित होत्या. सुशांत नाईक व राजश्री धुमाळे म्हणाले, नगरपंचायतीकडून शहरातील घरपट्टी वाढविण्यात येणार आहे. मात्र शहरातील नागरिकांना अपुऱ्या सुविधा मिळत आहेत. या सुविधांमध्ये घरपट्टी वाढीनंतर वाढ होणार का? हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी आपल्या घरासमोरील दगडी कुंपण हटवून पुन्हा त्याच ठिकाणी बांधले आहे. रस्त्यासाठी जागा सोडल्याचे त्यांनी नाटक केले आहे, असा आरोप करतानाच विरोधी नगरसेवक म्हणाले की, सत्ताधारी नगरसेवक प्रशासनाला विकासकामांसाठी सहकार्य करीत नसतील तर इतरांनी तरी का करावे? असा प्रश्न निर्माण होतो. या रस्त्यासाठी भूसंपादन करताना सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटार न खोदल्यास रस्ता खराब होणार आहे, याचीही दक्षता घेण्यात यावी. शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प अपूर्ण असून भुयारी गटार योजनेच्या सर्व्हेक्षणानंतर हा प्रश्न पुढे सरकलेला नाही. भुयारी गटार योजनेमुळे कणकवलीच्या विकासावरही परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असून त्याबाबत पत्रक देऊनही नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शिवशक्तीनगर रस्त्यालाही विलंब होत असल्याचे विरोधी नगरसेवकांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)