शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनावर अंकुश नसल्याने विकास ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 00:35 IST

कणकवली नगरपंचायत : विरोधी नगरसेवकांचा आरोप

कणकवली : कणकवली शहरातील अनेक विकासकामे रखडली असून नागरिकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. घरपट्टी वाढीचा निर्णय घेणारे सत्ताधारी जनतेच्या सुविधांमध्ये वाढ करणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच नगराध्यक्षा तसेच सत्ताधाऱ्यांचा नगरपंचायत प्रशासनावर अंकुश नसल्यानेच कारभारात ताळमेळ नसल्याची टिका विरोधी नगरसेवक सुशांत नाईक व राजश्री धुमाळे यांनी केली आहे. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सोमवारी अवधूत तावडे यांनी स्वीकारला. नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत विरोधी नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर या नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका नंदिनी धुमाळे उपस्थित होत्या. सुशांत नाईक व राजश्री धुमाळे म्हणाले, नगरपंचायतीकडून शहरातील घरपट्टी वाढविण्यात येणार आहे. मात्र शहरातील नागरिकांना अपुऱ्या सुविधा मिळत आहेत. या सुविधांमध्ये घरपट्टी वाढीनंतर वाढ होणार का? हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी आपल्या घरासमोरील दगडी कुंपण हटवून पुन्हा त्याच ठिकाणी बांधले आहे. रस्त्यासाठी जागा सोडल्याचे त्यांनी नाटक केले आहे, असा आरोप करतानाच विरोधी नगरसेवक म्हणाले की, सत्ताधारी नगरसेवक प्रशासनाला विकासकामांसाठी सहकार्य करीत नसतील तर इतरांनी तरी का करावे? असा प्रश्न निर्माण होतो. या रस्त्यासाठी भूसंपादन करताना सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटार न खोदल्यास रस्ता खराब होणार आहे, याचीही दक्षता घेण्यात यावी. शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प अपूर्ण असून भुयारी गटार योजनेच्या सर्व्हेक्षणानंतर हा प्रश्न पुढे सरकलेला नाही. भुयारी गटार योजनेमुळे कणकवलीच्या विकासावरही परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असून त्याबाबत पत्रक देऊनही नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शिवशक्तीनगर रस्त्यालाही विलंब होत असल्याचे विरोधी नगरसेवकांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)