शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘गुरूप्रसाद’मुळे एडस्ग्रस्तांना सन्मानाचे जीवन

By admin | Updated: December 1, 2015 00:22 IST

रूग्णांना सन्मानाची वागणूक : जिल्ह्यातील २१४५ जणांना विविध सोयीसुविधांचा लाभ--जागतिक एड्स दिन

शोभना कांबळे-- रत्नागिरी -एचआयव्हीग्रस्त व्यक्तींकडे आता सहानुभूतीने बघितले जाते. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता बहुसंख्य रूग्ण सन्मानाने जगत आहेत. मात्र, एक काळ असा होता की, या रूग्णांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय प्रतिकूल असा होता. याच काळात या रूग्णांसाठी सहायभूत ठरलेल्या येथील ‘गुरूप्रसाद’ संस्थेने गेल्या ११ वर्षात २१४५ संसर्गित व्यक्तिंना वेगवेगळ्या सेवासुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. विविध समाजसेवी संस्थांच्या मदतीने आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य उंचावण्यास मदत केली आहे.पूर्वी एड्सग्रस्तांकडे संशयाने पाहिले जायचे. घरच्यांकडून अशा रूग्णांना उपेक्षित जीवन जगावे लागत असे. त्यांना मदत करण्याच्या हेतूने डॉ. देवदत्त गोरे यांनी रत्नागिरीत ५ आॅगस्ट २००४ रोजी गुरूप्रसाद संस्थेची स्थापना केली. प्रारंभी डॉ. गोरे यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेक प्रकल्पांसाठी डॉ. गोरे यांना त्यांच्या पत्नी तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इतर काही व्यक्तीचे सहकार्य लाभले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांतून या संस्थेला पहिलाच ‘ड्रॉप इन सेंटर’ हा प्रकल्प मिळाला. त्यानंतर अव्हर्ट सोसायटी, महाराष्ट्र शासन आणि सध्याचा अलायन्स सी. एस. सी. (एनएमपी+) या प्रकल्पाच्या माध्यमातून ही संस्था एच. आय. व्ही. संसर्गित व्यक्तींकरिता गेली ११ वर्षे कार्य करीत आहे.काही वर्षांपूर्वी डॉ. गोरे यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संस्थेची जबाबदारी उचचली. संस्थेतर्फे संसर्गित व्यक्तिंना समुपदेशन, आर्थिक, शैक्षणिक मदत, पौष्टिक आहार याचबरोबर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. आतापर्यंत संस्थेने तब्बल २१४५ सभासदांना शासनाच्या योजनांचा तसेच इतर सेवासुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. विधवा आणि गरजू महिलांना रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. अनेक महिला आज विविध व्यवसाय करून त्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. आज एचआयव्हीग्रस्तांना ‘गुरूप्रसाद’ संस्थेच्या मदतीचा हात मिळत आहे. सभासदांच्या संख्येत वाढ होत असल्याने संस्थेला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही ही संस्था या रूग्णांसाठी आधारवड म्हणून काम करीत आहे. या संस्थेचा भक्कम आधार वाटू लागला आहे.योग्य समुपदेशन झाल्यामुळेच आज समाजाचा एड्सरूग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. त्यामुळे आता अपवाद वगळले तर घरातील मंडळी या रूग्णांना स्वीकारून त्यांना आधार देऊ लागली आहेत. - प्रेरणा गोवेकर,व्यवस्थापिका, गुरूप्रसाद ट्रस्ट