शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कॉँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळेच राज्य दिवाळखोरीत : जठार

By admin | Updated: March 23, 2016 00:19 IST

नारायण राणे, छगन भुजबळ यांचे असे कुठले व्यवसाय होते ज्यामुळे त्यांच्याकडे अमाप संपत्ती निर्माण झाली. धरणांना अब्जोवधी निधी दिला गेला.

कणकवली : कॉँग्रेसच्या काळातील मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केला. त्यामुळे राज्यावर साडेतीन लाख कर्जाचा बोजा पडला आहे. त्यामुळेच राज्य दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत असून कॉँग्रेसच्या नारायण राणेंना कोणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र शेटये उपस्थित होते. नारायण राणे, छगन भुजबळ यांचे असे कुठले व्यवसाय होते ज्यामुळे त्यांच्याकडे अमाप संपत्ती निर्माण झाली. धरणांना अब्जोवधी निधी दिला गेला. त्यातील कंत्राटदारांना दिल्या जाणाऱ्या रकमेपैकी बहुतांश निधी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या घशात गेला. कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी पुन्हा कर्जे काढण्यात आली. एकूण अर्थसंकल्पापैकी साडेतीन लाख पूर्वीचे कर्ज असून त्याचे व्याज आणि मुद्दल फेडण्यातच ६०-६५ हजार कोटी रूपये जातात. २.६० लाख कोटींचे बजेट आहे. त्यातील २० टक्के रक्कम अशी जाते. ४८ ते ५० टक्के रक्कम पगारावर खर्च होते. उर्वरित ३० टक्के बजेटपैकी १० ते १५ टक्के निधी अनियोजित बाबींसाठी जातो. उरलेल्या १०-१५ टक्के निधीतून नियोजित गोष्टींना तरतूद होते, असे जठार यांनी सांगितले. मोंड-वानिवडे पूलाला निधी मंजूरीचे श्रेय कोणीही घेत असेल. मात्र सभागृहात फक्त विषय मांडला म्हणजे काम होत नाही. त्याचा पाठपुरावा योग्य ठिकाणी करावा लागतो. आमच्या मंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा केल्यानेच मोंड-वानिवडे पूलासाठी निधी मंजूर झाला आहे. एवढी वर्षे पूलासाठी निधी का मंजूर झाला नाही? याचीही उत्तरे श्रेय घेणाऱ्यांनी द्यावीत, असे जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नदीसंवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी४जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या पुढाकारातून कोकणातील नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी जलपरिषद घेण्यात आली. याच्या फलस्वरूप राज्यसरकारने वेगळा ‘नदी पुनरूज्जीवन’ शीर्ष तयार केला आहे. जलयुक्त शिवार अािण नदीसंवर्धनासाठी ठोक १ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली.