शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

द्रोणांचा कुटिरोद्योग धोक्यात

By admin | Updated: December 25, 2014 00:22 IST

प्लास्टिकचे अतिक्रमण : ग्रामीण भागात घरबसल्या रोजगाराचे साधन

वैभव साळकर - दोडामार्ग -केळीच्या सुकलेल्या पानांपासून तयार केल्या जाणाऱ्या द्रोणांचे अस्तित्व प्लास्टिकच्या अतिक्रमणामुळे धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला घरबसल्या रोजगार मिळवून देणारा हा कुटिरोद्योग संकटात सापडला आहे. केळीच्या सुकलेल्या पानांपासून द्रोण तयार केले जातात. या द्रोणांचा उपयोग पूजेच्यावेळी किंवा धार्मिक कार्यक्रमात प्रसाद देण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. केळीच्या पानांच्या द्रोणांच्या तुलनेत अतिशय अल्प दरात प्लास्टिकचे छोटे द्रोण बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे केळीच्या द्रोणांची मागणी घटली आहे. परिणामत: प्लास्टिकच्या अतिक्रमणाचा फटका ग्रामीण द्रोण व्यवसायाला बसला आहे.प्लास्टिकमुळे परिस्थिती बदललीदोडामार्ग तालुक्यात ग्रामीण भागात घरबसल्या हा उद्योग मोठ्या प्रमाणात महिलावर्ग करतात. तालुक्यातील तळकट, कुंब्रल, कोलझर, झोळंबे, फुकेरी परिसरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तेथे केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने केळीची सुकलेली पाने काढून त्यापासून द्रोण बनविले जातात. शंभर द्रोणांचा एक साचा बनविला जातो. असे चाळीस साचे एकत्र करून एक बंडल तयार केले जाते. म्हणजेच साधारणत: ३ ते ४ हजार द्रोण एका बंडलात असतात. किमान २५० ते ३०० रूपयांपर्यंत द्रोण तयार करणाऱ्या उत्पादकास दिले जाते. पाच वर्षापूर्वी एका बंडलास ४०० ते ४५० रूपये दिले जायचे, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. गोव्याप्रमाणे बंदी आवश्यकयेणाऱ्या काळात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देणारा हा कुटिरोद्योग नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. हा उद्योग वाचविण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. गोवा राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आल्याने तेथील बाजारपेठेत केळीच्या पानांच्या द्रोणांना चांगली मागणी आहे. त्याचे अनुकरण सिंधुदुर्गातही होणे गरजेचे आहे, असे ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे आहे.