शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाटळ तांबेवाडीतबिबट्याचा संचार

By admin | Updated: July 20, 2014 22:15 IST

पंधरा दिवसशेतकरी भयभीत

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ तांबेवाडी येथील शेतकरी रघुनाथ राणे यांचा एक बैल बिबट्याने ठार करून त्यांच्या गाईला जखमी केले आहे. येथील परिसरात गेले पंधरा दिवस बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने याबाबत दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.येथील तांबेवाडी ही जंगलमय भागापासूननजिक आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतो. मे महिन्यामध्ये येथील शेतकरी विठोबा गोविंद परब यांच्या गायीवर वाघाने झडप घालून जबर जखमी केले होते. दरवर्षी येथील शेतकऱ्यांच्या एक ना एक जनावरांवर बिबट्या हल्ला करतो. रघुनाथ राणे यांचा वाडा जंगलापासून जवळच आहे. नेहमीप्रमाणे राणे यांनी सकाळी आपली गुरे चरावयास सोडली. काहीवेळाने राणे न्याहरी करण्यासाठी घरी आले. न्याहरी करून पुन्हा जनावरे राखण्यासाठी गेले असता जनावरे सैरावैरा पळू लागली. एक बैल सोडून सर्व जनावरे असल्याचे राणे यांच्या लक्षात येताच त्यांनी बैलाचा शोध सुरू केला. जवळच्याच एका झुडपाखाली बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. राणे यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने पळ काढला. तसेच एका गायीलाही जखमी केले. राणे यांनी इतर जनावरे घेऊन घर गाठले. याबाबत त्यांनी शेजारी राहणारे प्रताप राणे यांना सांगितले. प्रताप राणे यांनी दूरध्वनीवरून घटनेची कल्पना वनविभागाला दिली. हे वृत्त समजताच वनविभागाचे कर्मचारी कांबळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून त्यांनी १५ हजार रूपये रकमेचा बैल असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. संबंधित खात्याने या घटनेची दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)