शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

धाऊलवल्लीत बिबट्या जेरबंद

By admin | Updated: August 28, 2015 00:00 IST

फासकीत अडकला : वनविभागाने सुरक्षितस्थळी सोडले

राजापूर/ जैतापूर : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गयाळ कोकरी येथे डुकराच्या शिकारीकरिता लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला गुरुवारी वनविभागाने सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद करुन नैसर्गिक अधिवासात सोडले.गयाळ कोकरी येथील सुनील सखाराम राणे यांच्या आंबा कलमाच्या बागेत लावलेल्या फासकीत हा बिबट्या अडकला होता. सुनील राणे यांच्या बागेत काम करणारे कामगार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामासाठी बागेत गेले असताना बिबट्या फासकीत अडकल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ सुनील राणे यांना खबर दिली. राणे यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने फासकीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद केले. चिपळूण विभागीय वनअधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी वनक्षेत्रपाल बी. आर. पाटील, राजापूर वनपाल सु. ग. गुरव, वनरक्षक सागर गोसावी, रत्नागिरी वनरक्षक गावडे यांच्यासह विजय म्हादये, दीपक म्हादये, दीपक चव्हाण, आदींनी मेहनत घेतली. बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी नम्रता नाकोड यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, मादी जातीचा बिबट्या असून, ती सुमारे चार वर्षे वयाची आहे, तर बिबट्याची लांबी १५५ सेंमी. व रुंदी ६५ सेंमी. असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)कारवाई होणार ?शासनाने काही महिन्यांपूर्वी फासकी लावलेली आढळल्यास संबंधित जागामालक आणि फासकी लावणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे होतच नाही. राजापुरातील प्रकरणही असेच थंड होणार की काय? असा सवाल केला जात आहे.पोलिसांचा उद्धटपणायाबाबत वनपाल सुधाकर गुरव यांनी सांगितले की, याबाबत नाटे ग्रामीण पोलीस ठाण्यालाही रीतसर कळविण्यात आले होते. मात्र, ग्रामीण पोलीस ठाण्याचा कही अधिकारी वा पोलीस हजर झाला नाही. उलट आम्ही पाठविलेल्या प्रतिनिधीला वाईट वागणूक देण्यात आली, असे ते म्हणाले.