शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

अधिवेशनातील सत्य कामगिरी लोकांसमोर मांडा

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

नीतेश राणे : कोकणाबद्दल राज्यसरकारची भूमिका चिंताजनक

कणकवली : विधिमंडळ अधिवेशनातील प्रत्येकाच्या कामकाजाची नोंद असते. जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडवल्याचे सांगून उगाचच सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेऊ नये. सत्ताधाऱ्यांना लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिले आहे. आता सिंधुदुर्गातील जनतेची दिशाभूल थांबवावी, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. कोकणाबद्दल राज्यशासनाची भूमिका चिंताजनक असून १० हजार ५०० कोटींच्या पॅकेजमध्ये कोकणचा उल्लेखही नाही, असेही ते म्हणाले. ५०० कोटींचा निधी आणल्याचे सांगणारे पालकमंत्री केसरकर आणि मच्छिमारांचा प्रश्न सोडवल्याबाबत सत्कार स्विकारणारे आमदार वैभव नाईक यांनी विधीमंडळात केलेल्या कामाची नोंद उपलब्ध आहे. पालकमंत्र्यांनी खोटी माहिती दिल्याबद्दल हक्कभंग आणण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील एखाद्या अधिवेशनात त्याची माहिती मिळेल. पालकमंत्री केसरकर यांनी ‘आणलेल्या’ निधीबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागितली आहे. पारंपरिक मच्छिमारांची भूमिका मी एकनाथ खडसे यांच्याकडे मांडली. मच्छिमारप्रश्नी मी खडसे यांना भेटल्यावर आमदार नाईक यांची धावपळ सुरू झाली. त्यांना सगळ्यांची चिंता असल्यासारखे ते दाखवतात. वास्तविक कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलवून घेऊन मच्छिमारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे संवेदनशील प्रश्नावर आमदारांनी बालिशपणा करू नये. पालकमंत्री केसरकर यांनी ५०० कोटींचा निधी आणल्याचे सांगितल्याने मोंड-वानिवडे पुलाचे काम त्या निधीतून घेतले जावे अशी मागणी केली असता आमदार नाईक यांनी त्यास नकार देत नाबार्डमधून पूलाचे काम घेण्यास सांगितले. स्वत:च्या पालकमंत्र्यांवर नाईक यांचा विश्वास नाही. कोकणाने सरकारला २३ आमदार देऊनही आंबा-काजू नुकसानभरपाई, शेतकरी याकडे शासनाने लक्ष जात नाही, असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता येत्या अधिवेशनात या प्रश्नी २ तास चर्चा होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गडचिरोलीत लवकरात लवकर डॉक्टर देण्याची भाषा केली. स्वत:चे गाव असणाऱ्या सिंधुदुर्गात जे वर्षभर डॉक्टर देऊ शकले नाहीत. ते मंत्री गडचिरोलीला तातडीने डॉक्टर देण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे, अशी टीका केली. (प्रतिनिधी)कणकवली पदाधिकाऱ्यांत बदलशहर संघटनेच्या बदलाचे संकेत दिल्याप्रमाणे आता शहर कॉँग्रेसची एक बैठक झाली असून शहराध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविण्यास सांगितली आहेत. पुढील टप्प्यात वॉर्डनिहाय बैठका होणार आहेत. लवकरच हे बदल दिसतील, असे नीतेश राणे यांनी सांगितले. दहा पट मोबदला हवाचौपदरीकरणात काही कुटुंबे आणि व्यावसायिक कायमचे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे त्यांना त्या पटीत मोबदला मिळायला हवा. चौपदरीकरणानंतर जमिनींचे भाव गगनाला भिडणार आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुंबईतील बैठकीत हवा तेवढा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. साडेतीन पट नाही तर दहा पट मोबदला मिळवून दिल्याशिवाय जमिनीला हात लावू देणार नाही, अशी भूमिका राणे यांनी मांडली.- नीतेश राणे, आमदार, कणकवली