शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनातील सत्य कामगिरी लोकांसमोर मांडा

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

नीतेश राणे : कोकणाबद्दल राज्यसरकारची भूमिका चिंताजनक

कणकवली : विधिमंडळ अधिवेशनातील प्रत्येकाच्या कामकाजाची नोंद असते. जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडवल्याचे सांगून उगाचच सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेऊ नये. सत्ताधाऱ्यांना लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिले आहे. आता सिंधुदुर्गातील जनतेची दिशाभूल थांबवावी, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. कोकणाबद्दल राज्यशासनाची भूमिका चिंताजनक असून १० हजार ५०० कोटींच्या पॅकेजमध्ये कोकणचा उल्लेखही नाही, असेही ते म्हणाले. ५०० कोटींचा निधी आणल्याचे सांगणारे पालकमंत्री केसरकर आणि मच्छिमारांचा प्रश्न सोडवल्याबाबत सत्कार स्विकारणारे आमदार वैभव नाईक यांनी विधीमंडळात केलेल्या कामाची नोंद उपलब्ध आहे. पालकमंत्र्यांनी खोटी माहिती दिल्याबद्दल हक्कभंग आणण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील एखाद्या अधिवेशनात त्याची माहिती मिळेल. पालकमंत्री केसरकर यांनी ‘आणलेल्या’ निधीबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागितली आहे. पारंपरिक मच्छिमारांची भूमिका मी एकनाथ खडसे यांच्याकडे मांडली. मच्छिमारप्रश्नी मी खडसे यांना भेटल्यावर आमदार नाईक यांची धावपळ सुरू झाली. त्यांना सगळ्यांची चिंता असल्यासारखे ते दाखवतात. वास्तविक कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलवून घेऊन मच्छिमारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे संवेदनशील प्रश्नावर आमदारांनी बालिशपणा करू नये. पालकमंत्री केसरकर यांनी ५०० कोटींचा निधी आणल्याचे सांगितल्याने मोंड-वानिवडे पुलाचे काम त्या निधीतून घेतले जावे अशी मागणी केली असता आमदार नाईक यांनी त्यास नकार देत नाबार्डमधून पूलाचे काम घेण्यास सांगितले. स्वत:च्या पालकमंत्र्यांवर नाईक यांचा विश्वास नाही. कोकणाने सरकारला २३ आमदार देऊनही आंबा-काजू नुकसानभरपाई, शेतकरी याकडे शासनाने लक्ष जात नाही, असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता येत्या अधिवेशनात या प्रश्नी २ तास चर्चा होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गडचिरोलीत लवकरात लवकर डॉक्टर देण्याची भाषा केली. स्वत:चे गाव असणाऱ्या सिंधुदुर्गात जे वर्षभर डॉक्टर देऊ शकले नाहीत. ते मंत्री गडचिरोलीला तातडीने डॉक्टर देण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे, अशी टीका केली. (प्रतिनिधी)कणकवली पदाधिकाऱ्यांत बदलशहर संघटनेच्या बदलाचे संकेत दिल्याप्रमाणे आता शहर कॉँग्रेसची एक बैठक झाली असून शहराध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविण्यास सांगितली आहेत. पुढील टप्प्यात वॉर्डनिहाय बैठका होणार आहेत. लवकरच हे बदल दिसतील, असे नीतेश राणे यांनी सांगितले. दहा पट मोबदला हवाचौपदरीकरणात काही कुटुंबे आणि व्यावसायिक कायमचे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे त्यांना त्या पटीत मोबदला मिळायला हवा. चौपदरीकरणानंतर जमिनींचे भाव गगनाला भिडणार आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुंबईतील बैठकीत हवा तेवढा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. साडेतीन पट नाही तर दहा पट मोबदला मिळवून दिल्याशिवाय जमिनीला हात लावू देणार नाही, अशी भूमिका राणे यांनी मांडली.- नीतेश राणे, आमदार, कणकवली