शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पर्यटन निधीचा योग्य वापर करण्याची मागणी

By admin | Updated: March 30, 2015 00:26 IST

सिंधुदुर्ग पर्यटन विकास संस्थेच्या बैठकीत निर्णय

सावंतवाडी : पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्न करीत आहे. स्थानिक व्यापारी पर्यटन वाढविण्यासाठी त्यांना लागणाऱ्या सुविधा पुरवित असेल, तर शासन मालवणच्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल का करीत आहे? त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे रद्द करावेत व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी रविवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेण्याचा निर्णय सावंतवाडी येथे आयोजित सिंधुदुर्ग पर्यटन विकास संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनची बैठक नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात शनिवारी झाली. यावेळी डी. के. सावंत, फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जितेंद्र पंडित, दीनानाथ रावजी बांदेकर, नितीन तळवणेकर, बाळासाहेब परूळेकर, नकुल पार्सेकर, इप्तेश्वार इब्राहिशा राजगुरू, अशोक देसाई, शेखर गोवेकर, भाई देऊलकर, राजू लाड आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पर्यटकांसाठी चांगले प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र, सर्व प्रकल्प बंदावस्थेत असल्याने जिल्ह्यात पर्यटकांची संख्याही कमी होत चालली आहे. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजनांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना विविधा सुविधा देणे, तितकेच आवश्यक आहे. यासाठी लॉजिंग बोर्डींग, हॉटेलवरील टॅक्स कमी होणे, उभारलेल्या पर्यटन प्रकल्पांचे अनामत मासिक भाडे कमी करावे, स्वयंसंस्थांना उभारी अशा विविध मागण्यांसंदर्भात रविवारी सकाळी ९ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच मालवण तालुक्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा स्थानिक व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. गेली कित्येक वर्षे पर्यटक टिकविण्यासाठी अनेक सोयी सुविधा स्थानिक व्यापाऱ्यांनी पुरविलेल्या आहेत. मात्र, आता या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे म्हणजे अत्यंत चुकीचे असून पर्यटकांची संख्या कमी होऊ शकतो. यामुळे लादण्यात आलेले फौजदारी गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी पर्यटनस्थळांचा व त्याठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. यामुळे सर्व सोयी उपलब्ध होणे आवश्यक आहे. पर्यटन जिल्हा घोषित होऊन १८ वर्षे पूर्ण झाली. तरीही पर्यटन विकास म्हणावा, तेवढा जिल्ह्यात झालेला नाही. (वार्ताहर)