शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

स्वतंत्र पाली तालुक्याची मागणी

By admin | Updated: September 24, 2015 23:51 IST

नाडकर्णी अहवाल : कोकण, घाट यांना जोडणारा परिसर

पाली : रत्नागिरी तालुक्यातील मौजे पाली हे गाव कोकण व घाट यांना जोडणारा एक महत्वाचा परिसर आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित होऊ शकणाऱ्या पाली गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत एक सदस्यीय होकारार्थी नाडकर्णी अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे.  आंबाघाट उतरुन आल्यावर निसर्गाची खास अदाकारी आंबाघाट, साखरपा, पाली परिसर पाहिल्यावर दृष्टीस पडते. वास्तविक हा भाग पर्यटनक्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित व्हायला पाहिजे होता. यासाठीही पाली भागातील सामाजिक कार्यकर्ते कै. विश्वनाथ सावंत यांची पूर्वीपासूनची मागणी होती. परंतु, त्या मागणीकडे दुर्लक्ष करणेत आले असून, गेली कित्येक वर्ष पाली हा एक टूमदार तालुका व्हावा यासाठीही येथील जुने-जाणते दलितमित्र समाजसेवक कै. मुकुंदराव सावंत व त्यांचे पुत्र कै. विश्वनाथ सावंत, सिद्धराज सावंत यांचे अनेक वर्ष शासनदरबारी प्रयत्न सुरु होते व आजही सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले असताना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा झाला. त्याचवेळी वैभववाडी हा तालुका झाला. सुमारे ३० ते ३५ गावांचा हा छोटा तालुका त्यावेळी निर्माण झाला. तसेच त्यानंतरही काही तालुक्यांची निर्मिती झाली. पाली तालुका अथक प्रयत्न करुनही अद्याप झालेला नाही. वास्तविक वैभववाडी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांपेक्षाही जादा गावे पाली तालुक्याच्या निर्मितीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. पाली तालुक्यात येणारी गावे क्षेत्रफळाने मोठी असतानाही तसेच उत्पन्नाने व महसुलाने मोठी असताना देखील अद्याप पाली हा तालुका झालेला नाही. नव्या सरकारने पाली तालुका निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)पाली येथे महसूल खात्याची स्वत:च्या मालकीची जागा असून, सर्कल कार्यालय आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचीही पाली येथे जागा आहे. महावितरणचीही येथे जागा असून, तेथे त्यांचे युनिट, कार्यालय आहे. एस. टी.चेही येथे टूमदार बसस्थानक आहे. पोस्ट कार्यालय, वनखाते, बँका, सोसायट्या, पतसंस्था, पोलीस स्टेशन, बाजारपेठ आदी असून, येथे आठवडा बाजारही भरतो.