शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

स्वतंत्र पाली तालुक्याची मागणी

By admin | Updated: September 24, 2015 23:51 IST

नाडकर्णी अहवाल : कोकण, घाट यांना जोडणारा परिसर

पाली : रत्नागिरी तालुक्यातील मौजे पाली हे गाव कोकण व घाट यांना जोडणारा एक महत्वाचा परिसर आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित होऊ शकणाऱ्या पाली गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत एक सदस्यीय होकारार्थी नाडकर्णी अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे.  आंबाघाट उतरुन आल्यावर निसर्गाची खास अदाकारी आंबाघाट, साखरपा, पाली परिसर पाहिल्यावर दृष्टीस पडते. वास्तविक हा भाग पर्यटनक्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित व्हायला पाहिजे होता. यासाठीही पाली भागातील सामाजिक कार्यकर्ते कै. विश्वनाथ सावंत यांची पूर्वीपासूनची मागणी होती. परंतु, त्या मागणीकडे दुर्लक्ष करणेत आले असून, गेली कित्येक वर्ष पाली हा एक टूमदार तालुका व्हावा यासाठीही येथील जुने-जाणते दलितमित्र समाजसेवक कै. मुकुंदराव सावंत व त्यांचे पुत्र कै. विश्वनाथ सावंत, सिद्धराज सावंत यांचे अनेक वर्ष शासनदरबारी प्रयत्न सुरु होते व आजही सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले असताना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा झाला. त्याचवेळी वैभववाडी हा तालुका झाला. सुमारे ३० ते ३५ गावांचा हा छोटा तालुका त्यावेळी निर्माण झाला. तसेच त्यानंतरही काही तालुक्यांची निर्मिती झाली. पाली तालुका अथक प्रयत्न करुनही अद्याप झालेला नाही. वास्तविक वैभववाडी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांपेक्षाही जादा गावे पाली तालुक्याच्या निर्मितीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. पाली तालुक्यात येणारी गावे क्षेत्रफळाने मोठी असतानाही तसेच उत्पन्नाने व महसुलाने मोठी असताना देखील अद्याप पाली हा तालुका झालेला नाही. नव्या सरकारने पाली तालुका निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)पाली येथे महसूल खात्याची स्वत:च्या मालकीची जागा असून, सर्कल कार्यालय आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचीही पाली येथे जागा आहे. महावितरणचीही येथे जागा असून, तेथे त्यांचे युनिट, कार्यालय आहे. एस. टी.चेही येथे टूमदार बसस्थानक आहे. पोस्ट कार्यालय, वनखाते, बँका, सोसायट्या, पतसंस्था, पोलीस स्टेशन, बाजारपेठ आदी असून, येथे आठवडा बाजारही भरतो.