शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कुर्लीतील जखमी सांबराचा अखेर मृत्यू

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

वनरक्षक, वनपाल यांचा संप : मुक्या प्राण्याला गमवावा लागला जीव

कणकवली : कुर्ली भातडेवाडी येथे डोंगरालगतच्या मानवी वस्तीत जखमी अवस्थेत शिरलेल्या सांबराचा गुरुवारी जानवली येथील वन विभागाच्या कार्यालयात अखेर मृत्यू झाला. वनरक्षक तसेच वनपालांच्या संपामुळे या जखमी सांबरावर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे या मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.कुर्ली गावच्या पूर्व दिशेस दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात गवा रेडे, हरिण, सांबर, बिबटे आदी वन्य प्राणी आढळून येतात. बुधवारी कुर्ली भातडेवाडी या डोंगरालगतच्या नर जातीच्या सांबरावर चार ते पाच रानकुत्र्यांनी (कोळसुंद्ये) जोरदार हल्ला केला. या रानकुत्र्यांपासून जीव वाचविण्यासाठी ते सांबर मानवी वस्तीत शिरले. हे सांबर दीपक कदम तसेच चंदू कदम यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावून घेतले. तसेच त्या सांबराची रानकुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. शाहू कदम, बाबू कदम आदी ग्रामस्थांनी त्या सांबराला दोरखंडाच्या सहाय्याने झाडाला बांधून ठेवले होते. सरपंच अंबाजी हुंबे, उपसरपंच सूर्यकांत पाटील, पोलीस पाटील प्रदीप पाटील आदी ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. या जखमी सांबराचे एक शिंग मोडून पडले होते. तर पुढच्या पायाला व मानेखाली जखम झाली होती. मागच्या दोन्ही पायांनाही रानकुत्र्यांनी चावा घेतल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मात्र, वन मजूरांव्यतिरिक्त तेथे कोणीही फिरकले नाहीत. वनरक्षक तसेच वनपालांचा संप असल्यामुळे ते याठिकाणी आले नसल्याचे समजते. जखमी अवस्थेतील सांंबरावर गुरुवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. ग्रामस्थांच्या मदतीने वनमजूरांनी या सांबराला डोंगरमय भागातून खाली आणून ट्रॅक्टरमध्ये घातले. तसेच दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरानजिक असलेल्या जानवली येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. मात्र, काही वेळातच या सांबराचा मृत्यू झाला. या सांबराचे शुक्रवारी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दरम्यान, या जखमी सांबरावर वेळीच उपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते. वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मानवी चुकांमुळे वन्य प्राण्यांना जीवास मुकावे लागत असल्याने कणकवली तालुक्यासह परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)