शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

राणेंच्या गौप्यस्फोटाबाबत उत्सुकता

By admin | Updated: July 18, 2014 23:14 IST

राजकीय वातावरण तापले : जिल्ह्यात आगमन, दोन दिवसांचा दौरा

महेश सरनाईक : कणकवली गेली २५ वर्षे सिंधुदुर्ग आणि कोकणच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले नारायण राणे सोमवारी कोणता निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता आता सिंधुदुर्गातील जनतेबरोबरच सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा करून नारायण राणे शुक्रवारी रात्री कणकवलीत दाखल झाले असून शनिवारी ते प्रत्येक तालुक्यात भेटीगाठींचा कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळे राणेंच्या आगामी वाटचालीबाबतच्या चर्चेने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेली २५ वर्षे सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणे यांचा मोठा दबदबा राहिला आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील ७0 टक्के सत्तास्थाने राणेंच्या अधिपत्याखाली आहेत. त्यामुळे कोणताही राजकीय निर्णय घेताना राणे यांना येथील जनतेला पर्यायाने त्यांच्या समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे नारायण राणे आपल्या राजकीय जीवनातील नवीन निर्णय घेण्यापूर्वी येथील समर्थकांना भेटण्यासाठी आजपासून जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करणार असून यातूनच आपल्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांना आवाहन करूनच ते सोमवारी भूमिका जाहीर करणार आहेत. दहा वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीदेखील त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सिंधुदुर्गातील आपल्या समर्थकांसमवेत बैठका घेतल्या होत्या. त्यांना आपल्यावर शिवसेना पक्षनेतृत्वाने त्यावेळी केलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली होती. तसेच कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळविल्यानंतरच त्यांनी काँग्रेसमध्ये दिमाखदार प्रवेश केला होता. तसेच त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या समर्थक आमदारांनाही काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला होता. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला यश मिळवून दिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाचा म्हणजे खासदार नीलेश राणे यांचा झालेला दारूण पराभव झाल्यानंतर ते व्यथीत झाले होते. त्यातच काँग्रेस नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री बनविणार असल्याचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवायचे असेल तर काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र, तसे कोणतेही निर्णय काँग्रेस पक्षाकडून घेतले जात नसल्यानेच नाराज नारायण राणे सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे