शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘नगरसेवका’साठी भाऊगर्दीने रंगत वाढली

By admin | Updated: March 27, 2016 01:00 IST

निवडणुकीत स्थानिकांसह युवावर्गाला प्राधान्य : अपक्ष, बंडखोरांमुळे राजकीय पक्षांची कसोटी, निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष

रजनीकांत कदम, कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची झालेल्या भाऊगर्दीचा फटका अनेकांना बसणार तर आहेच पण त्याचबरोबर पक्षांतर्गत बंडखोरीचे संकटही राजकीय पक्षांवर ओढवणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलीच सत्ता रहावी यासाठी राजकीय पक्षांची कसोटी नगरपंचायत निवडणुकीत लागली आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात आता ९१ अर्ज असून माघारीपर्यंत यामध्ये फार मोठा असा फरक पडणार नसल्याचेही उघड आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीची पहिली निवडणूक इच्छुकांच्या भाऊगर्दीसह अपक्ष व बंडखोर यांच्यामुळे रंगतदार बनली असून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत झालेल्या रूपांतराने प्रशासनाचा कुडाळकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. शिवाय शहराचा विकासही आता नगरप्रशासन खात्याकडून होणार असल्याने नगरपंचायतीचे रूपांतर शहराच्या विकासाला गती आणण्याची शक्यता आहे. साहजीकच गावातून शहराकडे वळलेल्या कुडाळात स्थानिक कार्यकर्त्यांचीही कॉलर ताठ झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार इतिहास जमा होत असताना, नगरपंचायतीच्या इतिहासात नवनगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. याची परिणीती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात ९१ उमेदवार उभे ठाकले आहेत. नगरसेवक पदासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची तशी तयारी गेल्या सहा महीन्यापासूनच सुरू होती. राजकीय पक्षांनीही त्यांचा वापर करण्याचा फंडा वापरल्यानेच एका प्रभागात अनेक उमेदवार निर्माण झाल्याचे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षातून इच्छुकांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची ही मोठी समस्या बनुन राहीली. त्यामुळे उमेदवारी देताना अनेक ठिकाणी वादावादी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक प्रभागात बंडखोरीचे संकट राजकीय पक्षांवर ओढवले आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणकीत भाजप व शिवसेना स्वबळाचे अस्त्र वापरून रिंंगणात उतरणार आहेत. काँग्रेसमध्ये आघाडी, युतीत बिघाडी अपक्षांसह बंडखोरीची तलवार छाननी नंतर ९१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघारीची तारीख ४ एप्रिल असून तोपर्यंत राजकीय पक्षांना वाढलेल्या उमेदवारांना आवर घालण्याची कसरत करावी लागणार आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे अनेक उमेदवार असून त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना देण्यात आलेली आश्वासने यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळता येणे अशक्य असल्याचे चित्र आहे. तर या निवडणुकीत अपक्षांचा झालेला शिरकावही सर्वच पक्षांना मारक ठरणारा असून यामुळे पक्षपदाधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. त्यामुळे बंडखोरी व अपक्षांची टांगती तलवार घेऊनच या निवडणुकीत राजकीय पक्षांना उतरावे लागणार आहे.