शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नगरसेवका’साठी भाऊगर्दीने रंगत वाढली

By admin | Updated: March 27, 2016 01:00 IST

निवडणुकीत स्थानिकांसह युवावर्गाला प्राधान्य : अपक्ष, बंडखोरांमुळे राजकीय पक्षांची कसोटी, निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष

रजनीकांत कदम, कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची झालेल्या भाऊगर्दीचा फटका अनेकांना बसणार तर आहेच पण त्याचबरोबर पक्षांतर्गत बंडखोरीचे संकटही राजकीय पक्षांवर ओढवणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलीच सत्ता रहावी यासाठी राजकीय पक्षांची कसोटी नगरपंचायत निवडणुकीत लागली आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात आता ९१ अर्ज असून माघारीपर्यंत यामध्ये फार मोठा असा फरक पडणार नसल्याचेही उघड आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीची पहिली निवडणूक इच्छुकांच्या भाऊगर्दीसह अपक्ष व बंडखोर यांच्यामुळे रंगतदार बनली असून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत झालेल्या रूपांतराने प्रशासनाचा कुडाळकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. शिवाय शहराचा विकासही आता नगरप्रशासन खात्याकडून होणार असल्याने नगरपंचायतीचे रूपांतर शहराच्या विकासाला गती आणण्याची शक्यता आहे. साहजीकच गावातून शहराकडे वळलेल्या कुडाळात स्थानिक कार्यकर्त्यांचीही कॉलर ताठ झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार इतिहास जमा होत असताना, नगरपंचायतीच्या इतिहासात नवनगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. याची परिणीती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात ९१ उमेदवार उभे ठाकले आहेत. नगरसेवक पदासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची तशी तयारी गेल्या सहा महीन्यापासूनच सुरू होती. राजकीय पक्षांनीही त्यांचा वापर करण्याचा फंडा वापरल्यानेच एका प्रभागात अनेक उमेदवार निर्माण झाल्याचे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षातून इच्छुकांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची ही मोठी समस्या बनुन राहीली. त्यामुळे उमेदवारी देताना अनेक ठिकाणी वादावादी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक प्रभागात बंडखोरीचे संकट राजकीय पक्षांवर ओढवले आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणकीत भाजप व शिवसेना स्वबळाचे अस्त्र वापरून रिंंगणात उतरणार आहेत. काँग्रेसमध्ये आघाडी, युतीत बिघाडी अपक्षांसह बंडखोरीची तलवार छाननी नंतर ९१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघारीची तारीख ४ एप्रिल असून तोपर्यंत राजकीय पक्षांना वाढलेल्या उमेदवारांना आवर घालण्याची कसरत करावी लागणार आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे अनेक उमेदवार असून त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना देण्यात आलेली आश्वासने यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळता येणे अशक्य असल्याचे चित्र आहे. तर या निवडणुकीत अपक्षांचा झालेला शिरकावही सर्वच पक्षांना मारक ठरणारा असून यामुळे पक्षपदाधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. त्यामुळे बंडखोरी व अपक्षांची टांगती तलवार घेऊनच या निवडणुकीत राजकीय पक्षांना उतरावे लागणार आहे.