शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

‘नगरसेवका’साठी भाऊगर्दीने रंगत वाढली

By admin | Updated: March 27, 2016 01:00 IST

निवडणुकीत स्थानिकांसह युवावर्गाला प्राधान्य : अपक्ष, बंडखोरांमुळे राजकीय पक्षांची कसोटी, निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष

रजनीकांत कदम, कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची झालेल्या भाऊगर्दीचा फटका अनेकांना बसणार तर आहेच पण त्याचबरोबर पक्षांतर्गत बंडखोरीचे संकटही राजकीय पक्षांवर ओढवणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलीच सत्ता रहावी यासाठी राजकीय पक्षांची कसोटी नगरपंचायत निवडणुकीत लागली आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात आता ९१ अर्ज असून माघारीपर्यंत यामध्ये फार मोठा असा फरक पडणार नसल्याचेही उघड आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीची पहिली निवडणूक इच्छुकांच्या भाऊगर्दीसह अपक्ष व बंडखोर यांच्यामुळे रंगतदार बनली असून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत झालेल्या रूपांतराने प्रशासनाचा कुडाळकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. शिवाय शहराचा विकासही आता नगरप्रशासन खात्याकडून होणार असल्याने नगरपंचायतीचे रूपांतर शहराच्या विकासाला गती आणण्याची शक्यता आहे. साहजीकच गावातून शहराकडे वळलेल्या कुडाळात स्थानिक कार्यकर्त्यांचीही कॉलर ताठ झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार इतिहास जमा होत असताना, नगरपंचायतीच्या इतिहासात नवनगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. याची परिणीती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात ९१ उमेदवार उभे ठाकले आहेत. नगरसेवक पदासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची तशी तयारी गेल्या सहा महीन्यापासूनच सुरू होती. राजकीय पक्षांनीही त्यांचा वापर करण्याचा फंडा वापरल्यानेच एका प्रभागात अनेक उमेदवार निर्माण झाल्याचे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षातून इच्छुकांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची ही मोठी समस्या बनुन राहीली. त्यामुळे उमेदवारी देताना अनेक ठिकाणी वादावादी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक प्रभागात बंडखोरीचे संकट राजकीय पक्षांवर ओढवले आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणकीत भाजप व शिवसेना स्वबळाचे अस्त्र वापरून रिंंगणात उतरणार आहेत. काँग्रेसमध्ये आघाडी, युतीत बिघाडी अपक्षांसह बंडखोरीची तलवार छाननी नंतर ९१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघारीची तारीख ४ एप्रिल असून तोपर्यंत राजकीय पक्षांना वाढलेल्या उमेदवारांना आवर घालण्याची कसरत करावी लागणार आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे अनेक उमेदवार असून त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना देण्यात आलेली आश्वासने यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळता येणे अशक्य असल्याचे चित्र आहे. तर या निवडणुकीत अपक्षांचा झालेला शिरकावही सर्वच पक्षांना मारक ठरणारा असून यामुळे पक्षपदाधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. त्यामुळे बंडखोरी व अपक्षांची टांगती तलवार घेऊनच या निवडणुकीत राजकीय पक्षांना उतरावे लागणार आहे.