शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के भातकापणी पूर्ण

By admin | Updated: November 11, 2015 23:49 IST

नातू यांची माहिती : जिल्ह्यातील ४४ हजार हेक्टर क्षेत्रात प्रतिहेक्टरी ४४ क्विंटल उत्पन्न

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील म्हणजेच ७० टक्के भातकापणी पूर्ण केली आहे. पीककापणी प्रयोगाआधारे भातपिकाच्या उत्पन्नाचा विचार केल्यास प्रतिहेक्टरी ४४ क्विंटल एवढे उत्पन्न असल्याची माहिती राज्य माध्यमिक कृषी विभागातील सांखिक अधिकारी अरुण नातू यांनी दिली.जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली होती. त्यापैकी नोव्हेंबरअखेर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातकापणी पूर्ण झाली आहे. त्याची टक्केवारी ७० टक्के एवढी आहे. गणेशोत्सवला, घटस्थापनेला पडलेला पाऊस गरव्या भात जातींना उपयुक्त ठरला. तसेच नाचणी पिकाच्या कापण्यादेखील ४० ते ५० टक्के झाल्या आहेत. काही ठिकाणी भातामध्ये पळींज (पोल) भात आढळल्याने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल, जिल्हा परिषद कृषी व राज्य अधीक्षक कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा भात कापणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. पीक कापणीआधारे ज्या ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातकापणी पूर्ण झाली आहे. त्यात भाताचे उत्पन्न ४४ क्विंटल प्रतिहेक्टर एवढे आहे. त्यात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून समाधानकारक आहे. (प्रतिनिधी)विश्वास : उर्वरित कापणी २५ पर्यंत पूर्ण होणारपरतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या भातकापणीची कामे खोळंबली आहेत. काही जणांनी भातकापणी पूर्ण करून गंजीदेखील उभारल्या आहेत. उर्वरित ३० टक्के भात कापणी क्षेत्र नोव्हेंबर २२ ते २५ तारखेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. एकेक ाळी भात पिकाखालील क्षेत्र ८० ते ८५ हजार हेक्टर होते. आता कमी कमी होत ६३ हजार हेक्टरवर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.