शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

कोकण पर्यटन विकासासाठी समित्या!

By admin | Updated: November 27, 2015 00:06 IST

शासनाची योजना : समित्यांचे अधिकार, कार्यकक्षाही निश्चित; ग्रामीण पर्यटनाला मिळणार चालना

शेखर धोंगडे ल्ल कोल्हापूरकोकणातील ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण पर्यटन विकास प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करून ते मंजूर करण्याची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी शासकीय अथवा सार्वजनिक प्राधिकरणामार्फतच केली जाणार आहे. कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना त्यांच्याच गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तेथील विकासकामांची गती वाढविण्यासाठी आणि पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, पर्यायाने गावांचा विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासन कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम ही योजना राबविणार आहे.या कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय अणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याबरोबरच या योजनेंतर्गत निश्चितपणे कोणती कामे हाती घ्यावीत. सुविधांचा प्राधान्यक्रम कसा असावा तसेच देण्यात येणाऱ्या सेवासुविधांची देखभाल दुरुस्ती कोणामार्फत करावी, याबाबतही राज्य शासनाने याबाबत काही निर्णय घेतले आहेत. राज्यस्तरीय समितीचे अधिकार असेजिल्हास्तरीय कार्यकारिणी समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना प्रथम तत्त्वत: मान्यता, त्यानंतर त्या प्रस्तावांची छाननी करून त्यास आवश्यकतेनुसार सुधारणा करून अंतिम मान्यता देईल. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कोकण कृषी विद्यापीठ इत्यादी प्रकल्प प्रस्ताव तत्त्वत: व अंतिम मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करू शकतील. जिल्हास्तरीय कार्यकारिणी समिती प्रथम तत्त्वत: मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर करणे व प्रकल्प प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन करेल.प्रस्तावांची रुपरेषा जिल्हास्तरीय समितीचे प्रस्ताव हे जिल्हा किंवा विभागीय स्तरावर असतील. ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तयार केलेल्या बृहत आराखड्यानुरुप वा सुसंगत असावा. त्यावर जिल्हा समितीच्या शिफारशी असाव्यात. त्यात किमान ५ प्रकल्पांची (५ ते ६ गावांचा समूह विकास व २ समुद्र किनाऱ्यांची गावे ) शिफारस असावी. निधीचे वाटप खासगी यंत्रणेला करता येणार नाही. पर्यटनाच्यादृष्टीने प्रचलित असा एखादा गावांचा समूह अस्तित्वात असल्यास त्या समूहाच्या पर्यटनविकासास प्राधान्य देण्यात यावे. याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांना पर्यटन विकासासाठी सक्षम करावे. कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पाठ्यक्रम आयोजित करणे, प्रशिक्षण देणे, तसेच कोकण कृषी विद्यापीठास कोकण पर्यटनास उपयुक्त प्रशिक्षण उभारण्यास सहकार्य करावे. १ कोटीपेक्षा कमी किमतीच्या छोट्याछोट्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात यावे. अधिकाधिक ३ कोटी रुपयांचा प्रकल्प असावा पण ५ कोटीपेक्षा जास्त किमतीचा प्रस्ताव नसावा. तसेच ग्रामविकासाच्या कामकाजाशी सुसंगत न ठरणारी कोणतीही कामे सुचवू नयेत. पर्यटनविषयक सोयी सुविधांच्या बांधकामावर जास्तीत जास्त ८० टक्के पर्यंतचा खर्च करण्यात यावा. पर्यटनदृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या गावांच्या सौंदर्यस्थळांची सुधारणा/ बळकटीकरणासाठी संकल्पचित्र व वास्तुविशारद यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी करावा.राज्यस्तरीय समिती अशीराज्यमंत्री, ग्रामविकास हे पदसिद्ध अध्यक्ष असतील तर सदस्य म्हणून प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायत राज, सचिव पर्यटन विभाग, विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुख्य वास्तुविशारद, सार्वजनिक बांधकाम विभाग, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच आमंत्रित सदस्य म्हणून जिल्हाधिकारी/जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत राहतील.जिल्ह्यांसाठी कार्यकारिणी समिती जिल्हाधिकारी, जिल्हा ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग हे अध्यक्षपदी असतील.मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग - सदस्यअधीक्षक अभियंता (संकल्प चित्र) सार्वजनिक बांधकाम विभाग - सदस्यमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे जिल्हा प्रतिनिधी - सदस्यअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद हे सदस्य सचिव आहेत.