शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

सूक्ष्म नियोजनाकरीता समिती

By admin | Updated: December 5, 2015 00:19 IST

दीपक केसरकर : जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नैसर्गिक स्त्रोत विकासातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत सूक्ष्म नियोजन आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांच्या सूचना लक्षात घेवून जिल्हास्तरीय यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनाकरीता जिल्हास्तरीय यंत्रणांनी परिपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडे, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे, जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.दीपक केसरकर म्हणाले, सूक्ष्म आराखड्याच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागनिहाय चर्चा करण्यात आली आहे. सुक्ष्मच आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यालयातून सर्व टीम आलेली आहे. या टीमला सर्व विभागप्रमुखांनी सहकार्य करावे व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा सूक्ष्म आराखडा परिपूर्ण बनवावा, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक शासकीय योजनांमधील तफावत शोधून ती भरून काढण्यासाठी प्रत्येक विभागानी सूक्ष्म माहिती सादर करावी असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या संचालक लीना बनसोड यांनी केले. शासनाच्या प्रत्येक विभागाने पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबवता येतील याची माहिती या समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्या योजनांचे सादरीकरण करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच प्रत्येक विभागनिहाय राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समन्वय साधून विकास होणे गरजेचे आहे. ज्या योजनेसाठी शासनाचा निधी एखाद्या विभागाला प्राप्त होत नाही त्यासाठी या आराखड्याअंतर्गत तरतूद प्रस्तावित करावी, असेही संचालक लिना बनसोड यांनी सूचित केले.(प्रतिनिधी)घारे : नैसर्गिक साधन संपत्तीचे होणार जतनजिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व विकासासाठी सर्वदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा परिणामकारकरित्या उपयोग करण्यात येणार आहे, असे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या माध्यसमातून जिल्ह्यातील मृद व जलसंधारण, वन व जैव विविधतेचा अभ्यास, पिकक्षेत्र अंदाज, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन, सागर किनारा अभ्यास, शहर विकास त्याचबरोबर इको सिस्टीम संतुलनात होणाऱ्या बदल नोंदीसाठी दुहेरी लक्ष ठेवण्यात येणार आहे.एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवणारजिल्ह्यात या सेंटरची एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवण्याचाही विचार असल्याचे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे मुंंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी व्यक्त केले.