शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

सूक्ष्म नियोजनाकरीता समिती

By admin | Updated: December 5, 2015 00:19 IST

दीपक केसरकर : जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नैसर्गिक स्त्रोत विकासातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत सूक्ष्म नियोजन आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांच्या सूचना लक्षात घेवून जिल्हास्तरीय यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनाकरीता जिल्हास्तरीय यंत्रणांनी परिपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडे, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे, जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.दीपक केसरकर म्हणाले, सूक्ष्म आराखड्याच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागनिहाय चर्चा करण्यात आली आहे. सुक्ष्मच आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यालयातून सर्व टीम आलेली आहे. या टीमला सर्व विभागप्रमुखांनी सहकार्य करावे व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा सूक्ष्म आराखडा परिपूर्ण बनवावा, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक शासकीय योजनांमधील तफावत शोधून ती भरून काढण्यासाठी प्रत्येक विभागानी सूक्ष्म माहिती सादर करावी असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या संचालक लीना बनसोड यांनी केले. शासनाच्या प्रत्येक विभागाने पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबवता येतील याची माहिती या समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्या योजनांचे सादरीकरण करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच प्रत्येक विभागनिहाय राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समन्वय साधून विकास होणे गरजेचे आहे. ज्या योजनेसाठी शासनाचा निधी एखाद्या विभागाला प्राप्त होत नाही त्यासाठी या आराखड्याअंतर्गत तरतूद प्रस्तावित करावी, असेही संचालक लिना बनसोड यांनी सूचित केले.(प्रतिनिधी)घारे : नैसर्गिक साधन संपत्तीचे होणार जतनजिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व विकासासाठी सर्वदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा परिणामकारकरित्या उपयोग करण्यात येणार आहे, असे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या माध्यसमातून जिल्ह्यातील मृद व जलसंधारण, वन व जैव विविधतेचा अभ्यास, पिकक्षेत्र अंदाज, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन, सागर किनारा अभ्यास, शहर विकास त्याचबरोबर इको सिस्टीम संतुलनात होणाऱ्या बदल नोंदीसाठी दुहेरी लक्ष ठेवण्यात येणार आहे.एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवणारजिल्ह्यात या सेंटरची एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवण्याचाही विचार असल्याचे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे मुंंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी व्यक्त केले.